शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

महाविकास आघाडीत पुन्हा धुसफूस; आरोग्य मंत्री राजेश टोपे शिवसेनेवर नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 16:51 IST

राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची फोडाफोडी करू नका. महाविकास आघाडीचा धर्म पाळावा असं राजेश टोपेंनी सांगितले.

मुंबई – महाविकास आघाडीत कुठलीही नाराजी नाही असं वारंवार तिन्ही पक्षाचे नेते सांगत असले तरी अनेकदा महाविकास आघाडीतील धुसफूस बाहेर येत आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर व्यासपीठावरून शिवसेनेच्या मंत्र्यांवर नाराजी व्यक्त केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. मंत्री संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांच्याकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची फोडाफोडी होतेय असा आरोप राजेश टोपेंनी करत नाराजी व्यक्त केली आहे.

मंत्री राजेश टोपे म्हणाले की, शिवसेनेच्या मंत्र्यांकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला जातो हे सत्य आहे. त्यामुळे भुमरे असतील वा सत्तार असतील त्यांना एकच सांगतो, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची फोडाफोडी करू नका. महाविकास आघाडीचा धर्म पाळावा असं त्यांनी म्हटलं. राजेश टोपेंचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राजेश टोपेंनी नाराजी व्यक्त केली.

अलीकडेच कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत शिवसेनेने हक्काची जागा सोडत काँग्रेस उमेदवारासाठी न लढण्याचा निर्णय घेतला. मात्र २०२४ निवडणुकीत तेव्हाचं तेव्हा बघू असं सांगत या जागेवर दावा करणार असल्याचेही सूचित केले होते. राज्यात सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आले असले तरी आजही स्थानिक पातळीवर तिन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर कुरघोडी करत असल्याचं दिसून येते. आता मंत्री राजेश टोपे यांनी नाराजी व्यक्त केल्यानं महाविकास आघाडीत सगळं काही आलबेल असल्याचं दाखवून देण्यात येत असले तरी स्थानिक स्तरावर कुठेतरी नाराजी समोर येत असल्याचं दिसून येते.   

काँग्रेस आमदाराची शिवसेना मंत्र्यांवर नाराजी

अलीकडेच वांद्रे पूर्व येथील काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी(Zeeshan Siddique) यांनी मंत्री अनिल परबांना खोचक सल्ला दिला होता. झिशान सिद्दीकी म्हणाले की, वांद्रे पूर्व मतदारसंघातील गोळीबार एसआरए योजनेमुळे अनेक लोकं शिवालीक बिल्डर्समुळे नाराज आहेत. वर्षोनुवर्षे हक्काचं घर मिळवण्यासाठी लोकं धडपड करत आहेत. विधानसभेतही मी हा प्रश्न विचारला. दुर्दैवाने आजपर्यंत हे उत्तर मिळालं नाही. शिवालीक बिल्डर्सवर कारवाई न करण्यासाठी कुणाचा दबाव आहे का? असा सवाल करत नुकतेच मंत्री अनिल परब स्वत:च्या हाताने २०-२५ लोकांना चाव्या वाटत आहे. मग त्या हजारो लोकांचे काय ज्यांना अद्याप घरं मिळालं नाही. जर विकासकाला चाव्या वाटायच्या असतील तर मंत्र्यांच्या हातातून वाटल्या जातात. आम्ही एसआरएसोबत बैठक घेतो तेव्हा विकासक येत नाही असा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेShiv Senaशिवसेना