शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

महाविकास आघाडीत पुन्हा धुसफूस; आरोग्य मंत्री राजेश टोपे शिवसेनेवर नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 16:51 IST

राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची फोडाफोडी करू नका. महाविकास आघाडीचा धर्म पाळावा असं राजेश टोपेंनी सांगितले.

मुंबई – महाविकास आघाडीत कुठलीही नाराजी नाही असं वारंवार तिन्ही पक्षाचे नेते सांगत असले तरी अनेकदा महाविकास आघाडीतील धुसफूस बाहेर येत आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर व्यासपीठावरून शिवसेनेच्या मंत्र्यांवर नाराजी व्यक्त केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. मंत्री संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांच्याकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची फोडाफोडी होतेय असा आरोप राजेश टोपेंनी करत नाराजी व्यक्त केली आहे.

मंत्री राजेश टोपे म्हणाले की, शिवसेनेच्या मंत्र्यांकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला जातो हे सत्य आहे. त्यामुळे भुमरे असतील वा सत्तार असतील त्यांना एकच सांगतो, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची फोडाफोडी करू नका. महाविकास आघाडीचा धर्म पाळावा असं त्यांनी म्हटलं. राजेश टोपेंचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राजेश टोपेंनी नाराजी व्यक्त केली.

अलीकडेच कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत शिवसेनेने हक्काची जागा सोडत काँग्रेस उमेदवारासाठी न लढण्याचा निर्णय घेतला. मात्र २०२४ निवडणुकीत तेव्हाचं तेव्हा बघू असं सांगत या जागेवर दावा करणार असल्याचेही सूचित केले होते. राज्यात सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आले असले तरी आजही स्थानिक पातळीवर तिन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर कुरघोडी करत असल्याचं दिसून येते. आता मंत्री राजेश टोपे यांनी नाराजी व्यक्त केल्यानं महाविकास आघाडीत सगळं काही आलबेल असल्याचं दाखवून देण्यात येत असले तरी स्थानिक स्तरावर कुठेतरी नाराजी समोर येत असल्याचं दिसून येते.   

काँग्रेस आमदाराची शिवसेना मंत्र्यांवर नाराजी

अलीकडेच वांद्रे पूर्व येथील काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी(Zeeshan Siddique) यांनी मंत्री अनिल परबांना खोचक सल्ला दिला होता. झिशान सिद्दीकी म्हणाले की, वांद्रे पूर्व मतदारसंघातील गोळीबार एसआरए योजनेमुळे अनेक लोकं शिवालीक बिल्डर्समुळे नाराज आहेत. वर्षोनुवर्षे हक्काचं घर मिळवण्यासाठी लोकं धडपड करत आहेत. विधानसभेतही मी हा प्रश्न विचारला. दुर्दैवाने आजपर्यंत हे उत्तर मिळालं नाही. शिवालीक बिल्डर्सवर कारवाई न करण्यासाठी कुणाचा दबाव आहे का? असा सवाल करत नुकतेच मंत्री अनिल परब स्वत:च्या हाताने २०-२५ लोकांना चाव्या वाटत आहे. मग त्या हजारो लोकांचे काय ज्यांना अद्याप घरं मिळालं नाही. जर विकासकाला चाव्या वाटायच्या असतील तर मंत्र्यांच्या हातातून वाटल्या जातात. आम्ही एसआरएसोबत बैठक घेतो तेव्हा विकासक येत नाही असा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेShiv Senaशिवसेना