शहरं
Join us  
Trending Stories
1
एकजूटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
2
Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
3
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
4
'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
5
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर
6
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली
7
७५ बसस्थानकांवर मोफत 'वाचन कट्टा'; PM मोदींच्या 'पंचाहत्तरी'निमित्त एसटीचा अनोखा उपक्रम!
8
माझं तुझ्यावर प्रेम नाहीये..; तरूणीने दिला नकार; संतापलेल्या तरूणाने मग भररस्त्यातच...
9
महाराष्ट्र सरकारने गौमातेला दिलेला राज्य मातेचा दर्जा कागदावरच, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची टीका 
10
दिवाळीत ट्राय करा या फोटोशूट पोझ, दिसाल एकदम खास, प्रत्येक पोस्टवर होईल लाईक्सची बरसात
11
लाल दहशतीचा अंत! छत्तीसगडमध्ये 210 माओवाद्यांचे आत्मसमर्पण; बस्तर नक्षलमुक्त...
12
Gujarat Cabinet Reshuffle: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
13
Ajit Agarkar: शमी टीम इंडियामधून का बाहेर? रोहित- कोहली वर्ल्डकप खेळतील का? आगरकर म्हणाले.
14
विदर्भ हादरला! पतीसोबत पूजाचं बिनसलं, एक्स बॉयफ्रेंड शुभमसोबत पुन्हा प्रेमसंबंध अन् झाला भयंकर शेवट
15
'तिच्या'आवाजाला भुलला अन् दोन कोटी गमावून बसला; नाशिकच्या उद्योजकासोबत फेसबुकवर काय घडले?
16
IND vs AUS : कॅप्टन्सीवरून हटवण्यात आल्यावर रोहित शर्मा पहिल्यांदाच कोच गंभीर यांना भेटला अन्.... (VIDEO)
17
१८ कोटी घरातील माणसांच्या खात्यात वळवली; प्रशांत हिरेंसह कुटुंबीयांवर गुन्हा
18
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्त जिल्ह्यांना १३५६ कोटींची मदत; राज्य सरकारचा शासन निर्णय
19
VIDEO: महिला जीपमागे लपून काढत होती फोटो, अचानक मागून आला चित्ता अन् मग जे झालं...
20
Dhanteras 2025: धनत्रयोदशीला पूजा कशी करावी? 'या' शुभ मुहूर्तावर मंत्रांनी करा धन्वंतरीसह लक्ष्मी-कुबेराची विधिवत पूजा!

महाविकास आघाडीत पुन्हा धुसफूस; आरोग्य मंत्री राजेश टोपे शिवसेनेवर नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 16:51 IST

राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची फोडाफोडी करू नका. महाविकास आघाडीचा धर्म पाळावा असं राजेश टोपेंनी सांगितले.

मुंबई – महाविकास आघाडीत कुठलीही नाराजी नाही असं वारंवार तिन्ही पक्षाचे नेते सांगत असले तरी अनेकदा महाविकास आघाडीतील धुसफूस बाहेर येत आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर व्यासपीठावरून शिवसेनेच्या मंत्र्यांवर नाराजी व्यक्त केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. मंत्री संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांच्याकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची फोडाफोडी होतेय असा आरोप राजेश टोपेंनी करत नाराजी व्यक्त केली आहे.

मंत्री राजेश टोपे म्हणाले की, शिवसेनेच्या मंत्र्यांकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला जातो हे सत्य आहे. त्यामुळे भुमरे असतील वा सत्तार असतील त्यांना एकच सांगतो, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची फोडाफोडी करू नका. महाविकास आघाडीचा धर्म पाळावा असं त्यांनी म्हटलं. राजेश टोपेंचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राजेश टोपेंनी नाराजी व्यक्त केली.

अलीकडेच कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत शिवसेनेने हक्काची जागा सोडत काँग्रेस उमेदवारासाठी न लढण्याचा निर्णय घेतला. मात्र २०२४ निवडणुकीत तेव्हाचं तेव्हा बघू असं सांगत या जागेवर दावा करणार असल्याचेही सूचित केले होते. राज्यात सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आले असले तरी आजही स्थानिक पातळीवर तिन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर कुरघोडी करत असल्याचं दिसून येते. आता मंत्री राजेश टोपे यांनी नाराजी व्यक्त केल्यानं महाविकास आघाडीत सगळं काही आलबेल असल्याचं दाखवून देण्यात येत असले तरी स्थानिक स्तरावर कुठेतरी नाराजी समोर येत असल्याचं दिसून येते.   

काँग्रेस आमदाराची शिवसेना मंत्र्यांवर नाराजी

अलीकडेच वांद्रे पूर्व येथील काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी(Zeeshan Siddique) यांनी मंत्री अनिल परबांना खोचक सल्ला दिला होता. झिशान सिद्दीकी म्हणाले की, वांद्रे पूर्व मतदारसंघातील गोळीबार एसआरए योजनेमुळे अनेक लोकं शिवालीक बिल्डर्समुळे नाराज आहेत. वर्षोनुवर्षे हक्काचं घर मिळवण्यासाठी लोकं धडपड करत आहेत. विधानसभेतही मी हा प्रश्न विचारला. दुर्दैवाने आजपर्यंत हे उत्तर मिळालं नाही. शिवालीक बिल्डर्सवर कारवाई न करण्यासाठी कुणाचा दबाव आहे का? असा सवाल करत नुकतेच मंत्री अनिल परब स्वत:च्या हाताने २०-२५ लोकांना चाव्या वाटत आहे. मग त्या हजारो लोकांचे काय ज्यांना अद्याप घरं मिळालं नाही. जर विकासकाला चाव्या वाटायच्या असतील तर मंत्र्यांच्या हातातून वाटल्या जातात. आम्ही एसआरएसोबत बैठक घेतो तेव्हा विकासक येत नाही असा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेShiv Senaशिवसेना