शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे 
3
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
4
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
5
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
6
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
7
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
8
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
9
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
10
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
11
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
12
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
13
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
14
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
15
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
16
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
17
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
18
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
19
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
20
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू

रेशनिंग दुकानातील काळाबाजारावर डिजिटायझेशनच्या माध्यमातून नियंत्रण

By admin | Updated: June 14, 2017 18:17 IST

राज्यातील प्रत्येक रेशनकार्ड आधारशी संलग्न करण्याची मोहीम सध्या सुरू आहे. याद्वारे अधिकृत रेशनिंग दुकानदारांना

राजू काळे/ ऑनलाईन लोकमतभार्इंदर, दि. 14 - राज्यातील प्रत्येक रेशनकार्ड आधारशी संलग्न करण्याची मोहीम सध्या सुरू आहे. याद्वारे अधिकृत रेशनिंग दुकानदारांना विविध योजनांतर्गत पुरविण्यात आलेल्या धान्यावर थेट डिजिटायझेशनच्या माध्यमातून पॉज मशिनमार्फत नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे रेशनिंगचा काळाबाजार लवकरच संपुष्टात येणार असल्याची माहिती राज्य ग्राहक आयोग तसेच अन्न सुरक्षा आयोगाचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी लोकमतला दिली.मीरा-भार्इंदर महापालिका क्षेत्रातील ग्राहकांसंबंधी उपलब्ध योजना व सोईसुविधांचा आढावा घेण्यासाठी देशपांडे बुधवारी पालिका मुख्यालयात प्रथमच आले होते. त्यांनी पालिकेसह पुरवठा कार्यालयासह, अन्न प्रशासन, वजने व मापे महामंडळातील अधिकाऱ्यांद्वारे नागरिकांसाठी उपलब्ध योजनांचा आढावा घेतला. यावेळी केंद्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत नागरीकांना देण्यात येणाऱ्या सुविधांचा अहवाल त्यांना सादर करण्यात आला. यावर माहिती देताना त्यांनी राज्यातील प्रत्येक रेशनकार्ड धारकांना धान्य मिळविण्यात येणारी अडचण व त्यात होणारा भ्रष्टाचार लवकरच संपुष्टात येणार असल्याचे सांगितले. प्रत्येक रेशनकार्ड आधारशी संलग्न करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक योजनेंतर्गत अधिकृत रेशनिंग दुकानदारांना मिळणाऱ्या धान्य पुरवठ्यावर वरिष्ठ स्तरावरून पॉज मशिनद्वारे नियंत्रण ठेवले जाणार आहे. त्यामुळे त्यात घोटाळा होणे अशक्य ठरणार आहे. राज्य सरकारकडून दुकानदारांना पॉज मशिन पुरविण्यात येणार आहे. यामुळे दुकानदारांना धान्य पुरवठ्याची कागदोपत्री नोंद ठेवणे आवश्यक ठरणार नाही. मशिनद्वारे रेशनकार्डधारकांचे थम्ब इम्प्रेशन संग्रहित केले जाणार आहेत. नोंदणीकृत ग्राहकाने रेशनचे धान्य खरेदी केल्यास त्याची नोंद त्या मशिनद्वारे थेट रेशनिंग कार्यालयासह राज्याच्या पुरवठा विभागाकडे उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रत्येक योजनेंतर्गत दुकानदाराने विकलेल्या धान्य पुरवठ्याचे प्रमाण वेळीच तपासले जाणार आहे. तरीदेखील दुकानदाराने काळाबाजार करण्याचा प्रयत्न केल्यास त्याची माहिती मशिनद्वारे मिळुन दुकानदारावर त्वरीत कारवाई केली जाणार आहे. तसेच एखाद्या वस्तूचा दर, दुकानदाराकडून अधिकतम मूल्यापेक्षा (एमआरपी) जास्त वसूल केल्यास तो गुन्हा ठरतो. अनेकदा शीतपेटीतील (फ्रिज) मिनरल वॉटरच्या बाटल्या ग्राहकांना एमआरपीपेक्षा जास्त दराने विकल्या जातात. हे बेकायदेशीर असुन त्याप्रकरणी विक्रीदारावर गुन्हा दाखल करण्याचा अधिकार ग्राहकांना देण्यात आला आहे. ग्राहकांनी त्याची तक्रार (०२२) २२८८६६६६ या क्रमांकावर करावी, असे आवाहन त्यांनी केले. कारवाईचा अधिकार वजने व मापे महामंडळाकडे असल्याची माहिती देण्यात आली.