शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

रेशनिंग दुकानातील काळाबाजारावर डिजिटायझेशनच्या माध्यमातून नियंत्रण

By admin | Updated: June 14, 2017 18:17 IST

राज्यातील प्रत्येक रेशनकार्ड आधारशी संलग्न करण्याची मोहीम सध्या सुरू आहे. याद्वारे अधिकृत रेशनिंग दुकानदारांना

राजू काळे/ ऑनलाईन लोकमतभार्इंदर, दि. 14 - राज्यातील प्रत्येक रेशनकार्ड आधारशी संलग्न करण्याची मोहीम सध्या सुरू आहे. याद्वारे अधिकृत रेशनिंग दुकानदारांना विविध योजनांतर्गत पुरविण्यात आलेल्या धान्यावर थेट डिजिटायझेशनच्या माध्यमातून पॉज मशिनमार्फत नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे रेशनिंगचा काळाबाजार लवकरच संपुष्टात येणार असल्याची माहिती राज्य ग्राहक आयोग तसेच अन्न सुरक्षा आयोगाचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी लोकमतला दिली.मीरा-भार्इंदर महापालिका क्षेत्रातील ग्राहकांसंबंधी उपलब्ध योजना व सोईसुविधांचा आढावा घेण्यासाठी देशपांडे बुधवारी पालिका मुख्यालयात प्रथमच आले होते. त्यांनी पालिकेसह पुरवठा कार्यालयासह, अन्न प्रशासन, वजने व मापे महामंडळातील अधिकाऱ्यांद्वारे नागरिकांसाठी उपलब्ध योजनांचा आढावा घेतला. यावेळी केंद्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत नागरीकांना देण्यात येणाऱ्या सुविधांचा अहवाल त्यांना सादर करण्यात आला. यावर माहिती देताना त्यांनी राज्यातील प्रत्येक रेशनकार्ड धारकांना धान्य मिळविण्यात येणारी अडचण व त्यात होणारा भ्रष्टाचार लवकरच संपुष्टात येणार असल्याचे सांगितले. प्रत्येक रेशनकार्ड आधारशी संलग्न करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक योजनेंतर्गत अधिकृत रेशनिंग दुकानदारांना मिळणाऱ्या धान्य पुरवठ्यावर वरिष्ठ स्तरावरून पॉज मशिनद्वारे नियंत्रण ठेवले जाणार आहे. त्यामुळे त्यात घोटाळा होणे अशक्य ठरणार आहे. राज्य सरकारकडून दुकानदारांना पॉज मशिन पुरविण्यात येणार आहे. यामुळे दुकानदारांना धान्य पुरवठ्याची कागदोपत्री नोंद ठेवणे आवश्यक ठरणार नाही. मशिनद्वारे रेशनकार्डधारकांचे थम्ब इम्प्रेशन संग्रहित केले जाणार आहेत. नोंदणीकृत ग्राहकाने रेशनचे धान्य खरेदी केल्यास त्याची नोंद त्या मशिनद्वारे थेट रेशनिंग कार्यालयासह राज्याच्या पुरवठा विभागाकडे उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रत्येक योजनेंतर्गत दुकानदाराने विकलेल्या धान्य पुरवठ्याचे प्रमाण वेळीच तपासले जाणार आहे. तरीदेखील दुकानदाराने काळाबाजार करण्याचा प्रयत्न केल्यास त्याची माहिती मशिनद्वारे मिळुन दुकानदारावर त्वरीत कारवाई केली जाणार आहे. तसेच एखाद्या वस्तूचा दर, दुकानदाराकडून अधिकतम मूल्यापेक्षा (एमआरपी) जास्त वसूल केल्यास तो गुन्हा ठरतो. अनेकदा शीतपेटीतील (फ्रिज) मिनरल वॉटरच्या बाटल्या ग्राहकांना एमआरपीपेक्षा जास्त दराने विकल्या जातात. हे बेकायदेशीर असुन त्याप्रकरणी विक्रीदारावर गुन्हा दाखल करण्याचा अधिकार ग्राहकांना देण्यात आला आहे. ग्राहकांनी त्याची तक्रार (०२२) २२८८६६६६ या क्रमांकावर करावी, असे आवाहन त्यांनी केले. कारवाईचा अधिकार वजने व मापे महामंडळाकडे असल्याची माहिती देण्यात आली.