शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

आता चित्रांतून उलगडणार गडसंवर्धनाच्या वाटा, पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 03:25 IST

सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत येणाऱ्या पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाने राज्यातील १४ किल्ले निवडून त्याचे जतन संवर्धन करण्याचा पहिला टप्पा पार पाडला. हा टप्पा पुरातत्व विभागाने कशा पध्दतीने पार केला याबाबत ‘गडसंवर्धनाच्या मार्गावर’ हे सचित्र पुस्तक प्रसिध्द केले

मुंबई : सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत येणाऱ्या पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाने राज्यातील १४ किल्ले निवडून त्याचे जतन संवर्धन करण्याचा पहिला टप्पा पार पाडला. हा टप्पा पुरातत्व विभागाने कशा पध्दतीने पार केला याबाबत ‘गडसंवर्धनाच्या मार्गावर’ हे सचित्र पुस्तक प्रसिध्द केले असल्याने वाचकांना चित्रातून गंडसवंर्धनाच्या वाटा समजण्यास मदत होणार आहे. राज्यातील गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी कशा पध्दतीने प्रयत्न करण्यात येत आहे याचा सचित्र अनुभवच ‘गड संवर्धनाच्या मार्गावर’ या पुस्तक रुपातून वाचकांना वाचायला मिळणार आहे.राज्य शासनाकडे संरक्षित असलेल्या ४९ गडांपैकी २८ दुर्गांच्या जतनासाठी संचालनालयाने शासनाच्य साहाय्याने पुढाकार घेतला आहे. दुर्गसंवर्धन टप्पा-१ योजनेंतर्गत पार पडलेले कार्य पहिल्यांदाच पुस्तकरुपाने वाचकांच्या समोर येणार आहे. राज्यात अंशात्मक टिकून राहिलेले, थोडेफार अवशेष असलेले, फक्त तटबंदीच्या स्वरुपात शिल्लक आणि बºयापैकी टिकून असलेले असे सर्व मिळून ३५० किल्ले आहेत. यापैकी ४७ किल्ले राष्ट्रीय संरक्षित स्मारक असून ते केंद्र शासनाच्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या आखत्यारित आहेत तर ४९ किल्ले राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित झाले आहेत. महाराष्ट्रातील राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित झालेल्या किल्ल्यांचे रक्षण करणे त्यांचे जतन करण्याचे काम पुरातत्व विभाग करीत आहे.या किल्ल्यांचा समावेशया पुस्तकात रत्नागिरीतील शिरगाव किल्ला, नाशिक जिल्हयातील खर्डा किल्ला, गाळणा किल्ला, पुणे जिल्ह्यातील तोरणा आणि भूदरगड किल्ला, औरंगाबादमधील अंतूर, परांडा आणि धारुर किल्ला, नांदेड मधील औसा, कंधार आणि माहूर किल्ला, नागपूरच्या नगरधन, अंबागड आणि माणिकगड येथील जतन आणि दुरुस्ती कशी करण्यात आली याबाबतची माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे जतन-दुरुस्ती कामापूर्वी आणि जतन- दुरुस्ती कामानंतर या गड किल्ल्यांचे स्वरुप कसे बदलले आहे हे या पुस्तकात दाखवले आहे.

टॅग्स :Fortगड