शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आदिवासींसाठी कंत्राटदारधार्जिणा प्रस्ताव!, थेट बँक खात्यात पूर्ण रक्कम देण्याऐवजी निम्माच रोख लाभ

By यदू जोशी | Updated: July 17, 2020 06:53 IST

पूर्वी आदिवासींना सरकार खावटी कर्ज द्यायचे आणि निवडणुकीच्या आधी ते माफ करायचे. यंदा कर्जाऐवजी अनुदान देणार आहेत.

- यदु जोशीमुंबई : लॉकडाऊनच्या काळात आदिवासींना ७९२ कोटी रुपयांची मदत देताना तब्बल ३९६ कोटी रुपये किमतीच्या रेशनचा पुरवठा करण्याचा कंत्राटदारधार्जिणा प्रस्ताव राज्य सरकारने तयार केला आहे. मात्र या विभागाचे मंत्री के. सी. पाडवी यांनी हे संपूर्ण रक्कम आदिवासींच्या खात्यात टाकावी, अशी भूमिका घेतल्याची माहिती आहे.पूर्वी आदिवासींना सरकार खावटी कर्ज द्यायचे आणि निवडणुकीच्या आधी ते माफ करायचे. यंदा कर्जाऐवजी अनुदान देणार आहेत. १७ लाख ८० हजार आदिवासी कुटुंबाना प्रत्येकी एक हजार रुपयांची मदत थेट बँक खात्यात दिली जाईल तर एक हजार रुपयांत आठ किलो धान्य, चार किलो डाळ, चार किलो साखर, एक किलो मसाला, चार किलो मीठ, एक किलो चहापत्ती देण्यात येईल, असे प्रस्तावित आहे.रेशन पुरवठा योजनेत भ्रष्टाचार होतोच हा पूर्वानुभव आहे. तसेच आता निविदा काढल्या तर आदिवासींपर्यंत रेशन पोहोचायला किमान दीड महिना लागेल. तरीही दोन बड्या मंत्र्यांच्या मर्जीतील कंत्राटदारांचं चांगभलं या निमित्ताने केले जात असल्याची चर्चा आहे.अमृत आहार योजनेअंतर्गत मार्चपासून अन्नाऐवजी धान्य दिले जात आहे. मात्र, दुर्गम भागात ते पोहचलेले नाही, काही भागात एप्रिलचे धान्य आता जुलैमध्ये वितरित होत आहे. नव्या निर्णयाचीही तशीच वाट लागण्याची शक्यता आहे.आदिवासींना मदत करण्याची योजना चांगली आहे; पण पूर्ण रक्कम थेट बँक खात्यात जमा करा. आदिवासींना इतर योजनांमध्ये धान्य दिले जाते ते दोन-दोन महिने विलंबाने मिळतेय. आता तर पावसाळा आहे. दुर्गम आदिवासी भागात सरकारची मदत कधी पोहोचेल. त्यापेक्षा डीबीटी हाच उत्तम पर्याय आहे.- मेधा पाटकर,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्याआदिवासींनाआर्थिक मदत देण्याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. पूर्ण मदत थेट बँक खात्यात टाकावी की निम्म्या रकमेचे रेशन द्यावे या बाबतचा निर्णयदेखील झालेला नाही.- के. सी. पाडवी,आदिवासी विकास मंत्री

टॅग्स :bankबँक