शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
3
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
4
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
5
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
6
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
7
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
8
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
9
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
10
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
11
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
12
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
13
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
14
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
15
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
16
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
17
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
18
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
19
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
20
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर

५०० कोटींची कंत्राटे वादाच्या भोवऱ्यात

By admin | Updated: January 21, 2016 03:48 IST

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळामार्फत अन्नधान्याची वाहतूक करण्याच्या कंत्राटांमध्ये कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झाले असून प्राथमिक माहितीनुसार वर्षाकाठी दिलेली सुमारे ५०० कोटींची

यदु जोशी, मुंबईमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळामार्फत अन्नधान्याची वाहतूक करण्याच्या कंत्राटांमध्ये कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झाले असून प्राथमिक माहितीनुसार वर्षाकाठी दिलेली सुमारे ५०० कोटींची कंत्राटे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. वखार महामंडळातील वाहतूक घोटाळ्याचे बिंग फोडणारे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर ‘लोकमत’कडे तक्रारींचा अक्षरश: पाऊस पडला. जळगाव, लातूर, परभणीच नव्हे तर नंदुरबार, बारामती, सातारा, चंद्रपूर, अकोला, पुणे, कोल्हापूर, सोलापुरातून असंख्य तक्रारी लोकमतकडे आल्या. वर्षाकाठी चार-पाचशे कोटी रुपयांची कंत्राटे दिली जात होती आणि त्यात आधारभूत दराच्या तीन-चारशे पट वाहतूक दर विशिष्ट कंत्राटदारांना देण्यात आल्याचा सर्व तक्रारींचा सूर होता. आम्ही अनेकदा अनेक ठिकाणी दाद मागितली, पण कंत्राटदारांचे कडबोळे अधिकाऱ्यांशी संगनमताने सगळे काही मॅनेज करीत होते, अशी व्यथा अनेकांनी मांडली. गेल्या पाच वर्षांमधील तक्रारी थेट मुख्यमंत्री दरबारी गेल्यामुळे आता ताकही फुंकून पिण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे. केंद्रीय अन्न महामंडळामार्फत (एफसीआय) रेल्वे वा अन्य मार्गे आलेले अन्नधान्य राज्य वखार महामंडळाच्या गोदामापर्यंत पोहोचविण्याचे काम कंत्राटदार करायचे. त्यांना तीनचारशे टक्के जादा दराने कंत्राटे दिली जात. हेच धान्य वखार महामंडळाच्या गोदामांमधून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गावोगावी रेशनसाठी पोहोचविण्यासाठीचे वाहतूक दर त्या मानाने अगदीच कमी होते. ही तफावत कोणासाठी आणि का करण्यात आली, असा नवा प्रश्न या निमित्ताने पुढे आला आहे. वखार महामंडळामार्फत वाहतुकीचे कंत्राट हे दोन वर्षांसाठी दिले जाते. मात्र, निविदेत एक वर्षात निविदा किमतीच्या २५ टक्के रकमेइतकी उलाढाल असावी, अशी अट कोणाला झुकते माप देण्यासाठी होती याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.