शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

५०० कोटींची कंत्राटे वादाच्या भोवऱ्यात

By admin | Updated: January 21, 2016 03:48 IST

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळामार्फत अन्नधान्याची वाहतूक करण्याच्या कंत्राटांमध्ये कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झाले असून प्राथमिक माहितीनुसार वर्षाकाठी दिलेली सुमारे ५०० कोटींची

यदु जोशी, मुंबईमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळामार्फत अन्नधान्याची वाहतूक करण्याच्या कंत्राटांमध्ये कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झाले असून प्राथमिक माहितीनुसार वर्षाकाठी दिलेली सुमारे ५०० कोटींची कंत्राटे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. वखार महामंडळातील वाहतूक घोटाळ्याचे बिंग फोडणारे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर ‘लोकमत’कडे तक्रारींचा अक्षरश: पाऊस पडला. जळगाव, लातूर, परभणीच नव्हे तर नंदुरबार, बारामती, सातारा, चंद्रपूर, अकोला, पुणे, कोल्हापूर, सोलापुरातून असंख्य तक्रारी लोकमतकडे आल्या. वर्षाकाठी चार-पाचशे कोटी रुपयांची कंत्राटे दिली जात होती आणि त्यात आधारभूत दराच्या तीन-चारशे पट वाहतूक दर विशिष्ट कंत्राटदारांना देण्यात आल्याचा सर्व तक्रारींचा सूर होता. आम्ही अनेकदा अनेक ठिकाणी दाद मागितली, पण कंत्राटदारांचे कडबोळे अधिकाऱ्यांशी संगनमताने सगळे काही मॅनेज करीत होते, अशी व्यथा अनेकांनी मांडली. गेल्या पाच वर्षांमधील तक्रारी थेट मुख्यमंत्री दरबारी गेल्यामुळे आता ताकही फुंकून पिण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे. केंद्रीय अन्न महामंडळामार्फत (एफसीआय) रेल्वे वा अन्य मार्गे आलेले अन्नधान्य राज्य वखार महामंडळाच्या गोदामापर्यंत पोहोचविण्याचे काम कंत्राटदार करायचे. त्यांना तीनचारशे टक्के जादा दराने कंत्राटे दिली जात. हेच धान्य वखार महामंडळाच्या गोदामांमधून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गावोगावी रेशनसाठी पोहोचविण्यासाठीचे वाहतूक दर त्या मानाने अगदीच कमी होते. ही तफावत कोणासाठी आणि का करण्यात आली, असा नवा प्रश्न या निमित्ताने पुढे आला आहे. वखार महामंडळामार्फत वाहतुकीचे कंत्राट हे दोन वर्षांसाठी दिले जाते. मात्र, निविदेत एक वर्षात निविदा किमतीच्या २५ टक्के रकमेइतकी उलाढाल असावी, अशी अट कोणाला झुकते माप देण्यासाठी होती याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.