शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

मध्य महाराष्ट्र, विदर्भात उष्णतेची लाट कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 04:44 IST

देशात चंद्रपूर सर्वाधिक तापलेलेच; मान्सून अजून अंदमानच्या समुद्रातच

पुणे : मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट कायम आहे़ सलग दुसऱ्या दिवशी चंद्रपूर येथे नोंदविलेले गेलेले ४५़८ अंश सेल्सिअस हे देशातील सर्वाधिक तापमान ठरले आहे़ राज्यात रविवारी सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर येथे ४५़६ अंश सेल्सिअस तर, सर्वात कमी किमान तापमान पुणे येथे २१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे़ कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे़

मान्सून आगमन दक्षिण अंदमानच्या समुद्र, निकोबार बेट येथे झाल्याचे हवामान विभागाने शनिवारी जाहीर केले होते़ रविवारी मान्सून अंदमानच्या समुद्रातच असून अंदमान बेट, दक्षिण बंगालचा उपसागर परिसरात २ ते ३ दिवसांत दाखल होण्याच्या दृष्टीने अनुकूल वातावरण असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे़पुढील दोन तीन दिवस अंदमान बेट व परिसरात जोरदार पावसाची शक्यता आहे़ मराठवाड्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या किंचित वाढ झाली आहे़ मध्य महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणचे कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे़ मराठवाड्यातील कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे़

२१ ते २३ मे दरम्यान कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे़ २० मे रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे़ २१ ते २३ मे दरम्यान विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़

राज्यातील प्रमुख शहरातील कमाल तापमान (अंश सेल्सिअस) : पुणे ४०, लोहगाव ४१, जळगाव ४२़६, कोल्हापूर ४१़२, महाबळेश्वर ३५़५, मालेगाव ४१़४, नाशिक ३९़२, सांगली ४२, सातारा ४०़४, सोलापूर ४३़८, मुंबई ३४़२, सांताक्रुझ ३६, अलिबाग ३३़८, रत्नागिरी ३५़४, पणजी ३३़८, डहाणू ३४़४, औरंगाबाद ४०़८, परभणी ४४, नांदेड ४२़५, बीड ४२़७, अकोला ४३़८, अमरावती ४३़६, बुलढाणा ४०़७, ब्रम्हपुरी ४५़५, चंद्रपूर ४५़६, गोंदिया ४३, नागपूर ४४़१, वाशिम ४२़८, वर्धा ४४़५, यवतमाळ ४२़५़