शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

लोणार सरोवरातील अतिसंवेदनशील क्षेत्रात पुन्हा खोदकाम सुरू

By admin | Updated: July 24, 2016 21:52 IST

वनविभागाच्या आशीर्वादाने अतिसंवेदनशील क्षेत्रात वारंवार सरोवर काठावरील गौणखनिजाचे उत्खनन करून रस्ते बनविले जात आहे.

मयूर गोलेच्छा/ऑनलाइन लोकमत लोणार, दि. 24 -  पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टिकोनातून केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने लोणार सरोवरालगतच्या वन्यजीव अभयारण्यापासून १०० मीटरचा परिसर चारही बाजूने अतिसंवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केल्यानंतरही वनविभागाच्या आशीर्वादाने अतिसंवेदनशील क्षेत्रात वारंवार सरोवर काठावरील गौणखनिजाचे उत्खनन करून रस्ते बनविले जात आहे. यामुळे सरोवराच्या पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टिकोनातून होणाऱ्या प्रयत्नांना वन विभागाकडून सातत्याने खीळ घालण्याचा प्रकार होत आहे.पर्यावरणाचे संरक्षण होण्याच्या हेतूने सरोवरालगतच्या अतिसंवेदनशील क्षेत्रातील १०० मीटर परिसरात गौण खनिज उत्खननासह पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या बाबींवर पायबंद घालण्यात आला आहे परंतु ज्या वन विभागावरसरोवर आणि पर्यावरण संरक्षणाची मुख्य जबाबदारी आहे त्याच वन विभागाकडून सातत्याने शासनाच्या नियमाची पायमल्ली केली जात आहे. यापुर्वीही एकदा अशाच प्रकारे वन विभागाने सरोवर काठावरील गौण खनिजाचे नियमबाह्यपणेउत्खनन करून रस्ता तयार केला होता. त्यावेळीही कोणतीच कारवाई संबंधित विभागाकडून यास कारणीभूत वनपरिक्षेत्र अधिकारी चव्हाण यांच्यावर करण्यात आली नाही. त्यामुळेच की काय पुन्हा एकदा कायदा तोडून आणि पर्यावरणाचेनियम धाब्यावर बसवून वन विभागाने सरोवर काठाला क्षतीग्रस्त करण्याची हिंम्मत दाखवली आहे. पर्यावरण विभागाने सरोवरालगतचा चारही बाजूचा १०० मीटर परिसर अतिसंवेदनशील क्षेत्र घोषित केल्यामुळे या क्षेत्रात नवीन बांधकाम, रासायनिक शेती, वृक्षतोड, प्लास्टीक पिशव्यांचा वापर, जल, वायू, आणि ध्वनीप्रदूषण करणाऱ्या सर्वच बाबींवर निर्बंध घातले असतांनाही सर्वसामान्यांकडून नियमांची पायमल्ली झाल्यानंतर कारवाई आणि तत्पर राहणाऱ्या वनविभागाने नियम धाब्यावरबसवून केलेल्या कृत्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई होणार काय? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित होत आहे.अतिसंवेदनशील क्षेत्रातील १०० मीटर परिसरातच वन विभागाने दोन भव्य प्रवेशव्दाराचे बांधकाम सुरू केले आहे. १०० मीटर परिसरात वनविभागाच्या आशिर्वादाने गावठी दारूच्या हातभट्टया उभारल्या जात आहे तसेच प्लास्टीकचा वापरही होतांना दिसून येतो. त्यामुळे पर्यावरण संरक्षणासाठी घेतलेला निर्णय कुचकामी ठरू पाहत आहे.