शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

सी-सॅट परीक्षेचा प्रश्न न सोडविताच भरती सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 04:06 IST

राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेअंतर्गत घेतल्या जाणाऱ्या सी-सॅटचा पेपर यूपीएससीप्रमाणे केवळ पात्रतेसाठीच ग्राह्य धरावा, या विद्यार्थ्यांच्या मागणीवर विचार करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्यात आली आहे

पुणे : राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेअंतर्गत घेतल्या जाणाऱ्या सी-सॅटचा पेपर यूपीएससीप्रमाणे केवळ पात्रतेसाठीच ग्राह्य धरावा, या विद्यार्थ्यांच्या मागणीवर विचार करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्यात आली आहे; मात्र त्याबाबतचा निर्णय घेण्यापूर्वीच महाराष्टÑ लोकसेवा आयोगाकडून ३४२ पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली आहे.महाराष्टÑ लोकसेवा आयोगाकडून पदांची जाहिरात प्रकाशित करण्यापूर्वी सी-सॅटच्या परीक्षा पद्धतीमध्ये बदल करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. याबाबत तज्ज्ञांच्या समितीकडून निर्णय घेतला जाईल असे आयोगाचे प्रभारी अध्यक्ष चंद्रशेखर ओक यांनी स्पष्ट केले होते; मात्र त्याबाबतचा कोणताही निर्णय न होताच राज्यसेवेची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.गुणवत्ता यादी तयार करताना सी-सॅट परीक्षेचे गुण धरले जात असल्याने त्याचा इंजिनिअरिंग, मेडिकल व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना मोठा फायदा होत आहे, तर कला व वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना याचा फटका बसत आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) ही बाब लक्षात आल्यानंतर, त्यांनी सी-सॅट परीक्षेचे गुण केवळ पात्रतेसाठी धरण्यात येतील असा निर्णय घेतला आहे. महाराष्टÑ लोकसेवा आयोगाकडूनही त्याच धर्तीवर सी-सॅट परीक्षेचे गुण केवळ पात्रतेसाठी ग्राह्य धरावेत अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.सी-सॅटच्या पेपरमध्ये गणित व विज्ञान विषयांच्या प्रश्नांचा भरणा अधिक असतो. त्यामुळे कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी या पेपरची काठिण्यपातळी अधिक असते. उतारा सोडविण्यासाठी वेळ अधिक जातो. हा पेपर अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना तुलनेने सोपा जातो. क्लिष्ट प्रश्नांमुळे कला व वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून, इंजिनिअरिंगचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उत्तीर्ण होत असल्याची तक्रार स्पर्धा परीक्षेच्या अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे.सर्वांना समान न्याय हवापरीक्षेसाठी सर्वांना समान संधी व समान न्याय हवा. राज्यसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेमध्ये सी-सॅटचा पेपर इंजिनिअरिंग, मेडिकल व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी अधिक सोपा जातो, तर कला व वाणिज्यच्या विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसतो आहे. यूपीएससीप्रमाणे महाराष्टÑ लोकसेवा आयोगानेही ही असमानता तातडीने दूर करणे आवश्यक आहे. राज्यसेवेची जाहिरात प्रकाशित करताना याबाबतचा निर्णय घेतला जाईल असे अपेक्षित होते, मात्र आमची निराशा झाली आहे.- कैलास देशमुख, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षा