शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
2
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
3
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
4
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
5
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
6
जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा
7
"मला मावशीच्या मिठीतच शांतता मिळते"; पतीचं बोलणं मनाला लागलं, नवविवाहितेनं टोकाचं पाऊल उचललं!
8
रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द
9
श्रीसंतची दुखापत अन् RR फ्रँचायझीचा ८२ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा! विमा कंपनीची सर्वोच्च न्यायालयात धाव
10
Manoj Jarange: मनोज जरांगे आजच उपोषण सोडणार? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली...
11
Pitru Paksha 2025: गणेशोत्सवानंतर लगेचच पितृपक्ष का? ९० टक्के लोकांना माहीतच नाही खरे कारण!
12
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
13
मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! अंतिम मसुदा घेऊन सरकारचे ४ मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला
14
Viral Video : गर्लफ्रेंडचा फोन सतत लागत होता व्यस्त, संतापलेल्या बॉयफ्रेंडनं काय केलं बघाच!
15
Maratha Protest: मनोज जरांगे यांच्या पत्नी आणि मुलांचाही अन्नत्याग; मुलगी म्हणाली...
16
८ वर्षांपूर्वी गायब झालेला 'रीलस्टार' पती, सतत शोध घेत होती पत्नी! आता समोर आलं धक्कादायक सत्य
17
शेअर बाजारापेक्षा जास्त परतावा देणारी सरकारी योजना; EPF का ठरत आहे सरस? संपूर्ण गणित समजून घ्या
18
Video: आझाद मैदान परिसरात तणावाची स्थिती, आंदोलकांनी वाट अडवली; पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली
19
Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीला का बांधला जातो अनंताचा धागा? हे व्रत गणेशाचे नाही तर... 
20
नाशिकच्या राहुल धोत्रे हत्या प्रकरणातील फरार दोघांना बेड्या, पोलीस माजी नगरसेवक निमसेच्या मागावर

महापौरपदाचा घोळ सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2017 04:24 IST

महापालिकेतील बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी शिवसेना आणि भाजपाने राजकीय समीकरणे जुळविण्याची कसरत सुरू केली असली तरी सत्तेसाठी काँग्रेससोबत जाणार नसल्याचे

- गौरीशंकर घाळे, मुंबई

महापालिकेतील बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी शिवसेना आणि भाजपाने राजकीय समीकरणे जुळविण्याची कसरत सुरू केली असली तरी सत्तेसाठी काँग्रेससोबत जाणार नसल्याचे भाजपाने शनिवारी जाहीर केले. तर महापौरपदासाठी शिवसेनेने संपर्क साधला होता. मात्र आम्ही शिवसेनेला पाठिंबा देणार नसल्याचे मुंबई काँग्रेसच्या नेत्यांनी स्पष्ट केले. तसेच काँग्रेसने महापौरपदासाठी आम्ही अन्य पक्षांच्या साह्याने आपला उमेदवार उभा करू, असेही संकेत दिले. त्यामुळे महापौरपदासाठीचा घोळ मतदानाच्या तारखेबाबत सुरूच राहण्याची शक्यता दिसत आहे. कोण कोणासोबत जाणार, युती होणार की नवीन राजकीय समीकरण तयार होणार, याचे गूढ वाढले आहे.मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या नवनिर्वाचित ८४ नगरसेवकांची बैठक शिवसेना भवनात पार पडली. या वेळी शिवसेनेला पाठिंबा देणारे चार अपक्ष नगरसेवक असे एकूण ८८ नगरसेवक या बैठकीला उपस्थित होते. महापौरपदाबाबत या वेळी काही चर्चा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, महापौरपदासाठी संभाव्य युती, आघाडी याविषयी बोलण्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट नकार दिला. आज भूमिका ठरवणार नाही. नव्या नगरसेवकांना तांत्रिक बाबींबद्दल मार्गदर्शन करावे लागणार आहे. बरेच जण नवीन आहेत. त्यामुळे पुढच्या काही गोष्टी करताना तांत्रिक चुका होऊ नयेत यासाठी ही बैठक बोलावली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. महापौरपदाचे नंतर काय ते बघू, असे उद्धव म्हणाले.मुंबईत आम्ही क्रमांक एकचा पक्ष आहोत. तेव्हा महापौर आमचाच होईल, असा दावा शिवसेनेचे आ. अनिल परब यांनी पुन्हा एकदा केला. मात्र, त्यासाठी शिवसेना कोणाची मदत घेणार यावर त्यांनी मौन बाळगले. शिवसेनेने संपर्क साधला होता, मात्र आम्ही पाठिंबा देण्यास त्यांना स्पष्ट नकार दिला आहे. धर्मनिरपेक्ष व छोट्या पक्षांना घेऊन आम्ही (पान ५ वर)ठाणेकरांना दंडवत!युती व आघाडीबाबत नितीन गडकरी, अशोक चव्हाण आणि नारायण राणे यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता उद्धव यांनी हात जोडत ‘जय महाराष्ट्र’ केला. एवढी घाई का करता, योग्य वेळेला सांगतो, असेही ते म्हणाले. ठाणे महापालिकेत शिवसेनेला घवघवीत यश मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर ठाणेकरांचा शिवसेनेवरचा विश्वास यत्किंचितही कमी झाला नाही उलट यंदा तो वाढला आहे. हे विश्वासाचे नाते दुसरा कुठलाच पक्ष या शहराशी स्थापन करू शकला नाही. ठाणेकरांना माझा साष्टांग दंडवत. मी ठाण्यात लवकरच जाणार आहे, असेही ते म्हणाले.