शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

महापौरपदाचा घोळ सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2017 04:24 IST

महापालिकेतील बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी शिवसेना आणि भाजपाने राजकीय समीकरणे जुळविण्याची कसरत सुरू केली असली तरी सत्तेसाठी काँग्रेससोबत जाणार नसल्याचे

- गौरीशंकर घाळे, मुंबई

महापालिकेतील बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी शिवसेना आणि भाजपाने राजकीय समीकरणे जुळविण्याची कसरत सुरू केली असली तरी सत्तेसाठी काँग्रेससोबत जाणार नसल्याचे भाजपाने शनिवारी जाहीर केले. तर महापौरपदासाठी शिवसेनेने संपर्क साधला होता. मात्र आम्ही शिवसेनेला पाठिंबा देणार नसल्याचे मुंबई काँग्रेसच्या नेत्यांनी स्पष्ट केले. तसेच काँग्रेसने महापौरपदासाठी आम्ही अन्य पक्षांच्या साह्याने आपला उमेदवार उभा करू, असेही संकेत दिले. त्यामुळे महापौरपदासाठीचा घोळ मतदानाच्या तारखेबाबत सुरूच राहण्याची शक्यता दिसत आहे. कोण कोणासोबत जाणार, युती होणार की नवीन राजकीय समीकरण तयार होणार, याचे गूढ वाढले आहे.मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या नवनिर्वाचित ८४ नगरसेवकांची बैठक शिवसेना भवनात पार पडली. या वेळी शिवसेनेला पाठिंबा देणारे चार अपक्ष नगरसेवक असे एकूण ८८ नगरसेवक या बैठकीला उपस्थित होते. महापौरपदाबाबत या वेळी काही चर्चा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, महापौरपदासाठी संभाव्य युती, आघाडी याविषयी बोलण्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट नकार दिला. आज भूमिका ठरवणार नाही. नव्या नगरसेवकांना तांत्रिक बाबींबद्दल मार्गदर्शन करावे लागणार आहे. बरेच जण नवीन आहेत. त्यामुळे पुढच्या काही गोष्टी करताना तांत्रिक चुका होऊ नयेत यासाठी ही बैठक बोलावली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. महापौरपदाचे नंतर काय ते बघू, असे उद्धव म्हणाले.मुंबईत आम्ही क्रमांक एकचा पक्ष आहोत. तेव्हा महापौर आमचाच होईल, असा दावा शिवसेनेचे आ. अनिल परब यांनी पुन्हा एकदा केला. मात्र, त्यासाठी शिवसेना कोणाची मदत घेणार यावर त्यांनी मौन बाळगले. शिवसेनेने संपर्क साधला होता, मात्र आम्ही पाठिंबा देण्यास त्यांना स्पष्ट नकार दिला आहे. धर्मनिरपेक्ष व छोट्या पक्षांना घेऊन आम्ही (पान ५ वर)ठाणेकरांना दंडवत!युती व आघाडीबाबत नितीन गडकरी, अशोक चव्हाण आणि नारायण राणे यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता उद्धव यांनी हात जोडत ‘जय महाराष्ट्र’ केला. एवढी घाई का करता, योग्य वेळेला सांगतो, असेही ते म्हणाले. ठाणे महापालिकेत शिवसेनेला घवघवीत यश मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर ठाणेकरांचा शिवसेनेवरचा विश्वास यत्किंचितही कमी झाला नाही उलट यंदा तो वाढला आहे. हे विश्वासाचे नाते दुसरा कुठलाच पक्ष या शहराशी स्थापन करू शकला नाही. ठाणेकरांना माझा साष्टांग दंडवत. मी ठाण्यात लवकरच जाणार आहे, असेही ते म्हणाले.