शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

...हा तर करकरेंचा अवमान

By admin | Updated: May 14, 2016 02:47 IST

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींना क्लीन चिट देण्याचा प्रकार म्हणजे शहीद हेमंत करकरे यांचा अवमान असून, केंद्र व राज्यातील भाजपा सरकार सत्तेचा दुरुपयोग करून अशा महत्त्वाच्या खटल्यात ढवळाढवळ करीत

मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींना क्लीन चिट देण्याचा प्रकार म्हणजे शहीद हेमंत करकरे यांचा अवमान असून, केंद्र व राज्यातील भाजपा सरकार सत्तेचा दुरुपयोग करून अशा महत्त्वाच्या खटल्यात ढवळाढवळ करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.याबाबत प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात मलिक यांनी म्हटले आहे, की तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांनी २००८ साली घडलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करून साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहितसह इतर लोकांना अटक केली होती. त्यावेळी या प्रकरणातील आरोपींच्या सुटकेसाठी भाजपा नेते लालकृष्ण आडवाणी व सध्याचे गृहमंत्री हे पंतप्रधानांना साकडे घालत होते. त्यावेळी हेमंत करकरे यांनी या सर्व प्रकरणाचा खुलासा पंतप्रधान कार्यालयासमोर केला होता. करकरे हे या प्रकरणाचा तपास करीत असताना या बॉम्बस्फोटातील आरोपींवर पुष्पवृष्टी करण्याचे काम भाजपाचे लोक करीत होते. केंद्रातील सत्ता आल्यानंतर सध्याच्या एनआयएच्या प्रमुखांना १ वर्षाची मुदतवाढ देत सत्तेचा दुरुपयोग करून या प्रकरणातील आरोपींना क्लीन चिट देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. हे कृत्य म्हणजे या देशातील एक कर्तबगार अधिकारी, जे २६/११ च्या हल्ल्यात शहीद झाले, त्या हेमंत करकरे यांनी केलेल्या तपासावर अविश्वास दाखविण्याचा प्रकार असून, हा त्यांचा अपमान आहे. सरकारच्या दबावानेच हे कृत्य घडले असून, ते देशाच्या दृष्टीने घातक असल्याचे मलिक यांनी म्हटले आहे. (विशेष प्रतिनिधी)