शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
2
Delhi Blast: आत्मघाती हल्ला करणाऱ्या उमर नबीला आश्रय देणारा सापडला, एनआयएने फरिदाबामध्ये केली अटक
3
धक्कादायक! बास्केटबॉलचा सराव करताना छातीवर पोल पडला; खेळाडूचा जागीच मृत्यू, व्हिडीओ व्हायरल
4
स्मृती मानधना की पलाश मुच्छल दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत? कमाईत कोण आघाडीवर जाणून घ्या
5
भाकरी खाता की नोटा? नांदेडचं लंडन झालेलं दिसलं नाही म्हणत शिरसाटांचा अशोक चव्हाणांवर थेट हल्ला
6
STचा शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी हेल्पलाइन क्रमांक सुरू: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
7
IND vs SA: "भारतानं अक्षरशः आमच्यासमोर लोटांगण..." द. आफ्रिकेच्या प्रशिक्षकाची जीभ घसरली!
8
पाकिस्तानने पुन्हा गरळ ओकली; श्रीराम मंदिराच्या धार्मिक ध्वजावरुन संयुक्त राष्ट्रांना केलं आवाहन
9
Swiggy, Zomato आणि ओला-उबर महागणार? नवीन कायद्यामुळे ग्राहकांना सोसावा लागणार भुर्दंड!
10
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
11
Tata Sierra : २२ वर्षांनंतर 'लेजेंड इज बॅक'... Tata नं लाँच केली मोस्ट अवेटेड Sierra; कोणते मिळणार फीचर्स, किंमत किती?
12
इथिओपियातून दिल्लीत आली ज्वालामुखीची राख; तब्बल १२ वर्षांनंतर हेली गुब्बी ज्वालामुखीचा उद्रेक 
13
"…तर मी अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या"; पंकजा मुंडेंनी गौरी पालवेंच्या आईवडिलांना काय सांगितलं?
14
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: मार्गशीर्षातले ४ गुरुवार 'अशी' करा स्वामी उपासना; दुप्पट लाभ होईल!
15
Sheikh Hasina: नऊ किलो सोनं, महागड्या आणि मौल्यवान वस्तू; शेख हसीना यांच्या लॉकरमध्ये सापडलं मोठं घबाड!
16
'नॅशनल क्रश' गिरीजा ओकला येतायेत विचित्र मेसेज; म्हणाली, "मला रेट विचारला जात आहे..."
17
IND vs SA : टीम इंडियानं घरच्या मैदानात गुडघे टेकल्यावर नेटकऱ्यांना आठवला विराट; गंभीर होतोय ट्रोल
18
"प्रभू श्रीराम सगळ्यांचे... मी दलित म्हणून मला बोलवलं नाही"; अयोध्या खासदाराचा नाराजीचा सूर
19
तुमचा मेंदू बनतोय रीलचा ‘गुलाम’! स्मृती अन् मानसिक आरोग्यासाठी ठरतोय हानिकारक
20
Ahilyanagar: मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून बेदम मारहाण!
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगडकरांना दूषित पाणी

By admin | Updated: July 23, 2016 03:10 IST

पावसाळ्यात दरवर्षीप्रमाणे विक्रमगडकरांना नगरपंचायतीकडून होणारा पाणीपुरवठा दूषित पद्धतीने सुरु झाला

राहूल वाडेकर,

विक्रमगड- पावसाळ्यात दरवर्षीप्रमाणे विक्रमगडकरांना नगरपंचायतीकडून होणारा पाणीपुरवठा दूषित पद्धतीने सुरु झाला असून, या मातीमिश्रित पाण्यामुळे साथीचे आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. नव्याने राबविण्यात आलेली फिल्टर योजनाही पावसाळ्यात कुचकामी ठरल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.डॉक्टर नेहमीच सांगत असतात की,पाणी उकळून व गाळून प्यावे. परंतु नळाद्वारे येणारे पाणीच मातीमिश्रित असल्याने त्यावर कितीही प्रक्रिया केली तरी ते आरोग्याचे दृष्टीने धोकादायक आहे. अशुद्ध पाण्याचा प्रश्न दरपावसाळ्यातील असल्याने प्रशासन कोणतीही उपाययोजना आखतांना दिसत नाही. नगरपंचायतीकडून पाणीपट्टी वसुली नियमित असल्याने पाण्याचा प्रश्न उद्भवतोच कसा, असा प्रश्न गावकरी विचारत आहेत.नगरपंचायतीकडून पूर्वी ग्रामपंचायत काळात लाखो रुपयांची सुधारित फिल्टर योजना राबविण्यात आलेली आहे. परंतु या फिल्टर योजनेत फक्त उन्हाळ्यातच स्वच्छ पाणी पहावयास मिळते. कारण तेव्हा ते स्वच्छच असते मात्र पावसाळा सुरु होताच नळाद्वारे येणारे पाणी गढूळ व मातीमिश्रीत असल्याने तोंडातही घ्यावेसे वाटत नाही.त्यातच इतर तालुक्यांच्या ग्रामपंचायती अगर जव्हार नगरपरिषद यांच्या तुलनेत विक्रमगड ग्रामपंचायतीची व सध्याची नगरपंचायतीची मासिक पाणीपट्टी जास्त म्हणजे १७५ रुपये आहे. सध्यस्थितीत विक्रमगड ही नगरपंचायत झाली असल्याने तिचा कारभार आणि जबाबदारी वाढली आहे. तसेच पाणीपुरवठ्यात लोकसंख्या वाढल्याने अजून भर पडली आहे. त्यामुळे आता नवीन सुधारित फिल्टर पाणीपुरवठा योजनेची मंजुरी मिळावी तसेच त्याची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी होत आहे.नगरपंचायत काय म्हणते...सध्यस्थितीत पाणीपुरवठ्यामध्ये साडेचार लाख लीटर पाण्याची आवश्कता आहे. तर फिल्टर प्लॅनमध्ये फक्त दीड लाख लीटर पाणी मर्यादा असल्याने दिवसातून चार वेळेस सोडण्यात येणारे पाणी पावसाळ्यात गढूळ व मातीमिश्रीत स्थितीत नळाला येते. त्यामुळे साडेचार लाख लीटर पाणी फिल्टर करण्याची क्षमता असलेला फिल्टर प्लॅन हवा तरच गढूळ पाणीपुरवठ्यामध्ये उपाययोजना करता येणार आहे. नवीन फिल्टर व पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव पाठवलेला आहे. आम्ही सध्यस्थितीत आलामचा (तुरटी) वापर पाणी शुद्ध करणासाठी करीत आहोत. असे नगरपंचायत प्रशासनाने सांगितले.विक्रमगड नगरपंचायतीमधील असलेल्या गावपाडयांना होणारा पाणीसाठा हा साडेचार लाख लीटरचा आहे. मात्र, पाणी फिल्टर प्लॅनची क्षमता दीड लाख लीटर असल्याने एवढे पाणी फिल्टर होऊ शकत नाही. त्यामुळेच दरवर्षी अशुद्ध पाणीपुरवठयाचा प्रश्न उद्भवत आहे. तरीही आम्ही पाण्यामध्ये आलाम टाकून शुध्दीकरणाचा प्रयत्न करतो!- सुरेश सोनवणे, तहसीलदार तथा प्रशासक नगरपंचायत>सध्या नळाला येणारे पाणी गढूळ व मातीमिश्रीत असल्याने आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. फिल्टर योजना असून नसल्यासारखी आहे. अव्वाचे सव्वा १७५ रुपये इतर तालुक्यांच्या मानाने जास्त अशी पाणीपट्टी असतानाही गढूळ पाणी का सेवन करायचे, असा सवाल आहे.-रवींद्र आयरे, ग्रामस्थ, विक्रमगड