शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

बंधने उठली की कायम?

By admin | Updated: November 5, 2014 04:37 IST

या निकालाविरुद्ध अमित जमनादास सरैया व विशाल भागुजी शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केल्या होत्या.

मुंबई: श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी मुंबईसह राज्याच्या इतरही भागांत मोठ्या प्रमाणावर साजऱ्या होणाऱ्या दहीहंडी उत्सवासंबंधीची अपिले निकाली काढताना सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात दिलेल्या निकालाने दहीहंडीच्या थरांची उंची आणि त्यातील अल्पवयीन मुलांचा सहभाग याविषयीचे निर्बंध कायम झाले आहेत की उठले आहेत, याबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे.काही समाजसेवकांनी केलेल्या जनहित याचिकांवर १४ आॅगस्ट २०१४ रोजी निकाल देताना मुंबई उच्च न्यायालयाने दहीहंडीमध्ये १८ वर्षांखालील मुलांनी सहभागी होण्यास तसेच हंडी फोडण्यासाठी २० फुटांहून अधिक उंचीचा मानवी मनोरा रचण्यास मनाई करण्याखेरीज  इतर बंधने घातली होती. या निकालाविरुद्ध अमित जमनादास सरैया व विशाल भागुजी शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकांवर यंदाच्या जन्माष्टमीच्या चार दिवस आधी म्हणजे १४ आॅगस्ट रोजी अंतरिम आदेश देताना उच्च न्यायालयाच्या निकालातील परिच्छेद ४, ५, ७ आणि ८ या परिच्छेदांमधील निर्देशांची अंमलबजावणी प्रलंबित केली होती. त्यानुसार १८ वर्षांखालील मुलांचा दहीदंडीतील सहभाग, हंडीच्या थरांची कमाल उंची २० फूट आणि मुंबई पोलीस कायद्यात दुरुस्ती करून दहीहंडीचा ‘धोकादायक खेळ’ म्हणून समावेश करणे इत्यादी बाबींचा अंमल स्थगित झाला होता. २७ आॅक्टोबर रोजी सरैया व शिंदे यांच्या या विशेष अनुमती याचिकांवर न्या. अनिल आर. दवे, न्या. कुरियन जोसेफ व न्या. आर. के. अगरवाल यांच्या खंडपीठापुढे अंतिम सुनावणी झाली. त्या वेळी दिलेल्या निकालात खंडपीठाने आधी १४ आॅगस्ट रोजी दिलेला अंतरिम आदेश शब्दश: उद््धृत केला व त्या अंतरिम आदेशामुळे विशेष अनुमती याचिका निरर्थक ठरत असल्याने त्या आम्ही निकाली काढत आहोत, असे नमूद केले. उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाने समाधान झाले नाही म्हणून सरैया व शिंदे सर्वोच्च न्यायालयात गेले होते व त्यांचे म्हणणे सकृतदर्शनी पटले म्हणून त्या न्यायालयाने १४ आॅगस्ट रोजी उच्च न्यायालयाच्या निकालास अंशत: स्थगिती दिली होती. या पार्श्वभूमीवर, आधीच्या अंतरिम आदेशाने विशेष अनुमती याचिका आता निरर्थक ठरल्या आहेत, असे जेव्हा सर्वोच्च न्यायालय म्हणते त्याचा नेमका अर्थ काय? तसेच हे मत नोंदवून याचिका निकाली काढल्या जाण्याने उच्च न्यायालयाने घातलेल्या निर्बंधांवर आधी दिलेली अंतरिम स्थगिती कायम झाली आहे की ती उठली आहे, या मुद्द्यांवर संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. (विशेष प्रतिनिधी)