शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

बदलापूरमधील कोंडेश्वर धबधब्यावर तीन दिवसांसाठी जमावबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 10:21 IST

पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या बदलापूरमधील कोंडेश्वर धबधब्यावर तीन दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत

बदलापूर, दि. 21-  पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या बदलापूरमधील कोंडेश्वर धबधब्यावर तीन दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. वीकेंड, गटारी तसंच पावसामुळे होणारी पर्यटकांची गर्दी या पार्श्वभूमीवर तहसीलदारांनी हा निर्णय घेतला आहे. यामुळे पर्यटकांचा मात्र हिरमोड होणार आहे. श्रावण महिना सुरु होण्यापुर्वीचा हा वीकेंड आहे. त्यामुळे मोठी गर्दी होऊन दुर्घटना होण्याची शक्यता आहे. यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून २१ ते २३ जुलैदरम्यान कोंडेश्वरला जमावबंदी आदेश लागू करण्यात आली आहे. या जमावबंदीनुसार कोणालाही कोंडेश्वर धबधव्यावर जाता येणार नाही. त्यामुळे या विकेण्डला कोंडेश्वर धबधब्यावर जाण्याचं प्लॅनिंग करणाऱ्यांचा चांगलाच हिरमोड होणार आहे. 
 
मुंबईपासून जवळच असणाऱ्या कोंडेश्वरला पर्यटक दरवर्षी तुफान गर्दी करतात. मागच्या आठवड्यात इथं एका पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला होता, तर पोलिसांनी तब्बल २५ पर्यटकांना बुडताना वाचवलं होतं.
 
मध्य रेल्वेच्या बदलापूर स्थानकापासून पूर्वेला साधारण १५ किलोमीटर अंतरावर असलेला हा धबधबा अतिशय लोकप्रिय पिकनिक पॉईंट आहे. तिथे शंकर व गणपतीचे मंदिरही असून शंकराच्या मंदिरामुळचे त्या धबधब्याला कोंडेश्वर हे नाव पडल आहे. पंधरा फुटांवरून अधिक उंचीवरून कोसळणा-या या धबधब्याखाली भिजण्याची मजा लुटण्यासाठी फक्त स्थानिकच नव्हे तर मुंबई व बाहेरूनही अनेक पर्यटक येत असतात