शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

तस्लीमा नसरीन यांचा महाराष्ट्र दौरा रोखण्यामागे षडयंत्र ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2017 14:27 IST

बांगलादेशमधील वादग्रस्त लेखिका तस्लीमा नसरीन शनिवारी जेव्हा औरंगाबादला पोहोचल्या तेव्हा त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यामुळे त्यांना विमानतळावरुनच पुन्हा माघारी पाठवण्यात आलं.

ठळक मुद्देतस्लीमा नसरीन 30 जुलै रोजी जेव्हा औरंगाबादला पोहोचल्या तेव्हा विमानतळावरुनच पुन्हा माघारी पाठवण्यात आलं तस्लीमा यांचा दौरा पुर्णपणे खासगी होता, ज्याची माहिती फक्त पोलिसांना होती. अशा परिस्थितीत ही माहिती लीक कशी झाली असा प्रश्न विचारला जात आहेशहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आम्हाला हा निर्णय घ्यावा लागल्याची माहिती पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी सांगितले होते.

मुंबई, दि. 1 - बांगलादेशमधील वादग्रस्त लेखिका तस्लीमा नसरीन शनिवारी 30 जुलै रोजी जेव्हा औरंगाबादला पोहोचल्या तेव्हा त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यामुळे त्यांना विमानतळावरुनच पुन्हा माघारी पाठवण्यात आलं. तस्लीमा यांचा दौरा रद्द झाल्याने सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. तस्लीमा यांचा दौरा पुर्णपणे खासगी होता, ज्याची माहिती फक्त पोलिसांना होती. अशा परिस्थितीत ही माहिती लीक कशी झाली असा प्रश्न विचारला जात आहे.   

शनिवारी औरंगाबादेत आलेल्या वादग्रस्त बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन यांना पोलिसांनी प्रवेश नाकारत चिकलठाणा विमानतळावरून परत पाठविले होते. जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ लेण्यांना भेट देण्यासाठी तीन दिवसांच्या दौ-यानिमित्त तस्लीमा नसरीन औरंगाबादमध्ये आल्या होत्या. शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आम्हाला हा निर्णय घ्यावा लागल्याची माहिती पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी सांगितले होते.

जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ लेण्यांना भेट देण्यासाठी  वादग्रस्त बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन औरंगाबादेत विमानाने येत असून त्या हॉटेल ताज येथे मुक्कामी थांबणार आहेत,अशी माहिती शहरात पसरताच एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी हॉटेल ताज आणि चिकलठाणा विमानतळावर मोठ्या संख्येने गर्दी केली आणि घोषणाबाजी करण्यास सुरवात केली होती. 

मात्र हे सर्व जाणुनबुजून करण्यात आल्याचा आरोप तस्लीमा नसरीन यांच्या निकटवर्तीयांनी केला आहे. तस्लीमा नसरीन यांच्या दौ-याची माहिती बाहेर कशी आली याची माहिती पोलीस सध्या घेत आहेत. नसरीन यांनी यासंबंधी ट्विट करत लिहिलं होतं की, 'औरंगाबाद पोलिसांशिवाय माझ्या हॉटेल बुकिंग आणि दौ-याची माहिती कोणालाच माहिती नव्हती. मग कट्टरपथियांना ही सगळी माहिती कशी मिळाली याचं आश्चर्य वाटतं'. 

तस्लीमा यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचा-यांपैकी एकाने दिलेल्या माहितीनुसार, तस्लीमा यांची फ्लाईट डिटेल्स, हॉटेल बुकिंग आणि चार दिवसांच्या दौ-यासंबंधी माहितीचे कागदपत्र प्रोटोकॉलनुसार दिल्ली पोलिसांकडे सोपवण्यात आले होते. दिल्लीमध्ये तस्लीमा नसरीन यांच्या सुरक्षेसाठी तैनात पोलीस कर्मचा-याने दिलेल्या माहितीनुसार, 'दिल्ली पोलीस अशा दौ-यांवेळी स्थानिक पोलिसांवर सुरक्षेची जबाबदारी सोपवतं. 27 जुलै रोजी औरंगाबाद पोलिसांना सुरक्षा पुरवण्याचा आदेश देण्यात आला होता. इतकंच नाही हॉटेलचं बुकिंगही दुस-या नावे करण्यात आलं होतं'.

काय झालं होतं नेमकं -आमदार इम्तियाज जलील यांनी पोलीस उपायुक्तांशी संपर्क साधून तस्लीमा यांना शहरात प्रवेश दिल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, प्रेषितांबद्दल अपशब्द लिहिणा-या या लेखिकेला शहराच्या पवित्र भूमित पाय ठेवता येणार नाही, असा इशारा दिला होता. एअर इंडियाच्या विमानाने रात्री साडेसात वाजता तस्लीमा विमातळावर येताच पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांनी तिची भेट घेतली आणि मॅडम तुम्हाला शहरात प्रवेश नाकारण्यात येत असल्याचे त्यांना स्पष्टपणे सांगितले होते. यावेळी तस्लीमा  यांनी त्यांचा नियोजित दौरा अत्यंत गुप्त असल्याचे पो.नि.परोपकारी यांना सांगितले होते. तेव्हा परोपकारी यांनी त्यांना तुमचा दौरा गुप्त राहिलेला नाही.तुम्ही कोणत्या हॉटेलमध्ये थांबणार आहात,कोठे जाणार आहात,याबाबतची माहिती संपूर्ण शहरात पसरली असून शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे तुम्ही परत जा,अशी विनंती केली. एवढेच नव्हे तर विमानतळ अधिका-यांशी संपर्क साधून तस्लीमा आणि त्यांच्या मुलीला परत घेऊन जाण्याची विनंती केली होती.