शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

ग्रामीण पेयजल योजनेचा निधी खर्च करण्यात कंजुषी

By admin | Updated: June 1, 2014 00:56 IST

राज्यातीन तीन जिल्ह्यांनीच केला संपूर्ण निधीचा विनीयोग

अकोला : राज्याच्या ग्रामीण भागात पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी राबविल्या जाणार्‍या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजेनचा निधी मोठय़ा प्रमाणावर पडून आहे. राज्यातील वर्धा, गोंदिया व नांदेड या तीन जिल्ह्यांनीच या निधीचा पुरेपुर वापर केला. इतर जिल्हे मात्र अद्याप अर्धाही निधी खर्च करु शकलेले नाहीत. मार्च अखेर पर्यंत सरासरी ४७ टक्के निधी या योजनेतुन खर्च झाला असल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी अनेक ग्रामीण भागात पिण्याचा पाण्याच्या योजना कार्यान्वित होऊ शकलेल्या नाहीत. देशातील ग्रामीण भागातील जनतेला पिण्यासाठी स्वच्छ व शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे यासाठी केंद्र शासनाने ह्यराष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनाह्ण सुरु केली. ही योजना मागणीवर आधारित आहे. ज्या गावांमध्ये पाणीटंचाईची भीषण समस्या आहे अशी गावे आणि ज्या ग्रामपंचायती पाणीपट्टी वसूल करुन देखभाल व दुरुस्ती करण्यास सक्षम आहेत अशा गावांची निवड या योजनेसाठी केली जाते. राज्य शासनाच्या मार्फत निधीचे वाटप करुन ही योजना गावांमध्ये राबविण्यात येते. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेसाठी केंद्र शासनाने राज्य शासनाला वर्ष २0१३-१४ करिता ७२७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. सुरुवातीला ३ हजार ८३५ गावे या योजनेसाठी निवडण्यात आली होती. त्यात वाढ होऊन गावांची संख्या ४ हजार ५00 इतकी झाली. या योजनेचा मार्च अखेरीस आढावा घेतला असता या योजनेवर ४७.२३ टक्के खर्च झाला असल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक जिलंनी तर २५ टक्यांपेक्षा कमी निधी खर्च केला असल्याचे आढळून आले आहे. संपूर्ण निधी खर्च करण्यात विदर्भातील वर्धा आणि गोंदिया तर मराठवाड्यातील नांदेड या जिलंचा समावेश आहे. विदर्भात यवतमाळ, मराठवाड्यात बीड तर कोकणात रायगड या जिलंनी सर्वात कमी म्हणजेच ४५ टक्यांच्या खाली निधी खर्च केल्याचे आढळून आले आहे. निधी खर्च करण्यात वर्धा, गोंदिया आणि नांदेड यांनी बाजी मारली आहे. त्यांनी शंभर टक्के निधी खर्च केला आहे. या खालोखाल भंडारा, कोल्हापूर व नाशिक हे जिल्हे निधी खर्च करण्यात आघाडीवर आहेत. सर्वात कमी म्हणजे २५ टक्कयापेक्षा कमी निधी खर्च करणारे वाशिम, गडचिरोली आणि नंदुरबार हे तीन जिल्हे आहेत. इतर जिलंची निधी खर्च करण्याची टक्केवारी २५ ते ७0 टक्कयां दरम्यान आहे