शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
6
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
7
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
8
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
11
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
12
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
13
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
14
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
15
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
16
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
17
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
18
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
19
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
20
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

जत तालुक्याला ‘रब्बी’चा दिलासा

By admin | Updated: February 16, 2015 23:11 IST

शेती बहरली : हेक्टरी उत्पादन वाढल्यामुळे शेतकरी सुखावला; शिवारात काढणीची लगबग

संख : जत तालुक्यातील रब्बी हंगामातील ज्वारी, मका आदी पिकांच्या काढणीस सुरूवात झाली आहे. अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण यांचा पिकावर थोडाफार परिणाम झाला असून, अपवाद वगळता पीक चांगले आले आहे. दर हेक्टरी उत्पादनात वाढ होण्याच्या अपेक्षेमुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.रब्बी हा तालुक्यातील शेतीचा मुख्य हंगाम आहे. या हंगामात ९४ हजार ९०० हेक्टर क्षेत्रात ज्वारीचे पीक घेतले जाते. यंदा पाऊस चांगला झाल्याने ७२ टक्के पेरणी झाली होती. यावर्षी ६८ हजार २०० हेक्टर ज्वारी, २ हजार ३०० हेक्टर गहू, २ हजार हेक्टरवर हरभरा, २ हजार हेक्टरवर करडई, ३ हजार १०० हेक्टर, ४ हजार हेक्टर मका लागवड झाली आहे. तीन वर्षानंतर प्रथमच यंदा खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हाती लागला. त्यानंतर पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने रब्बीचीही पेरणी चांगली झाली. अनुकूल, हवामान आक्टोबर नोव्हेंबरमध्ये झालेला अवकाळी पाऊस, यामुळे उगवणही चांगली झाली. शिवारभर पिके बहरल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. अनुकूल स्थितीमुळे दर हेक्टरी उत्पादनात वाढ होणार आहे. ज्वारीचे दाणे भरण्याच्या कालावधीमध्ये ढगाळ वातावरण व पश्चिम-पूर्व वाऱ्यांमुळे दाणे टपोरे भरले आहेत. त्यानंतर फुलोऱ्यात असलेल्या ज्वारीला मात्र अवकाळीचा फटका बसला. कणसातील दाणे काळे पडले आहेत. फुलोराही गळून गेला आहे. मका मात्र जोमाने आला आहे. शेतकऱ्यांनी संकरित वाण वापरल्याने हेक्टरी उत्पादनात वाढ झाली आहे. सध्या बाजारात मक्याला बऱ्यापैकी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची काढणीची सुरू झाली आहे. (वार्ताहर)मजुरांचा तुटवडातालुक्यातून दरवर्षीप्रमाणे यंदाही सुमारे ४५ हजार मजूर ऊस तोडणीसाठी बाहेर पडले आहेत. तसेच शेतीकामाच्या धांदलीमुळे गावकट्टे ओस पडलेले दिसत आहेत. सध्या द्राक्ष काढणी तसेच बेदाणा शेडवर वेचणीचीही कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. यामुळे इतर शेतीच्या कामांसाठी मजुरांचा तुटवडा निंर्माण झाला आहे. परिणामी मजुरीच्या दरातही वाढ झाली असून सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पुरूषांना २५०, तर महिलांना २०० रूपये मजुरी द्यावी लागत आहे. दोन्ही हंगाम यशस्वीयंदा १७ वर्षानंतर प्रथमच शेतकऱ्यांना खरीप व रब्बी दोन्ही हंगाम हाताशी आले आहेत. कायम दुष्काळी असलेल्या या तालुक्यात कायमचा दुष्काळ, प्रतिकूल हवामान यामुळे कधी खरीप, तर कधी रब्बी हंगामावर पाणी सोडावे लागत होते. दुबार पेरणीचा उपद्व्याप करावा लागत होता. यंदा मात्र शेवटच्या टप्प्यातील अवकाळीचा फटका वगळता खरीप व रब्बी दोन्ही हंगामात यशस्वी उत्पादन मिळाले आहे. जूनमध्ये मान्सूनच्या हजेरीने खरिपातील बाजरी, सूर्यफूल, मका, इतर कडधान्ये, गळीत धान्ये, तेलबियाची पिके चांगली मिळाली. रब्बीतही अवकाळीचा तडाखा वगळता परतीचा पाऊस, अनुकूल हवामान यामुळे पिके बहरली आहेत.