शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

जत तालुक्याला ‘रब्बी’चा दिलासा

By admin | Updated: February 16, 2015 23:11 IST

शेती बहरली : हेक्टरी उत्पादन वाढल्यामुळे शेतकरी सुखावला; शिवारात काढणीची लगबग

संख : जत तालुक्यातील रब्बी हंगामातील ज्वारी, मका आदी पिकांच्या काढणीस सुरूवात झाली आहे. अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण यांचा पिकावर थोडाफार परिणाम झाला असून, अपवाद वगळता पीक चांगले आले आहे. दर हेक्टरी उत्पादनात वाढ होण्याच्या अपेक्षेमुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.रब्बी हा तालुक्यातील शेतीचा मुख्य हंगाम आहे. या हंगामात ९४ हजार ९०० हेक्टर क्षेत्रात ज्वारीचे पीक घेतले जाते. यंदा पाऊस चांगला झाल्याने ७२ टक्के पेरणी झाली होती. यावर्षी ६८ हजार २०० हेक्टर ज्वारी, २ हजार ३०० हेक्टर गहू, २ हजार हेक्टरवर हरभरा, २ हजार हेक्टरवर करडई, ३ हजार १०० हेक्टर, ४ हजार हेक्टर मका लागवड झाली आहे. तीन वर्षानंतर प्रथमच यंदा खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हाती लागला. त्यानंतर पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने रब्बीचीही पेरणी चांगली झाली. अनुकूल, हवामान आक्टोबर नोव्हेंबरमध्ये झालेला अवकाळी पाऊस, यामुळे उगवणही चांगली झाली. शिवारभर पिके बहरल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. अनुकूल स्थितीमुळे दर हेक्टरी उत्पादनात वाढ होणार आहे. ज्वारीचे दाणे भरण्याच्या कालावधीमध्ये ढगाळ वातावरण व पश्चिम-पूर्व वाऱ्यांमुळे दाणे टपोरे भरले आहेत. त्यानंतर फुलोऱ्यात असलेल्या ज्वारीला मात्र अवकाळीचा फटका बसला. कणसातील दाणे काळे पडले आहेत. फुलोराही गळून गेला आहे. मका मात्र जोमाने आला आहे. शेतकऱ्यांनी संकरित वाण वापरल्याने हेक्टरी उत्पादनात वाढ झाली आहे. सध्या बाजारात मक्याला बऱ्यापैकी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची काढणीची सुरू झाली आहे. (वार्ताहर)मजुरांचा तुटवडातालुक्यातून दरवर्षीप्रमाणे यंदाही सुमारे ४५ हजार मजूर ऊस तोडणीसाठी बाहेर पडले आहेत. तसेच शेतीकामाच्या धांदलीमुळे गावकट्टे ओस पडलेले दिसत आहेत. सध्या द्राक्ष काढणी तसेच बेदाणा शेडवर वेचणीचीही कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. यामुळे इतर शेतीच्या कामांसाठी मजुरांचा तुटवडा निंर्माण झाला आहे. परिणामी मजुरीच्या दरातही वाढ झाली असून सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पुरूषांना २५०, तर महिलांना २०० रूपये मजुरी द्यावी लागत आहे. दोन्ही हंगाम यशस्वीयंदा १७ वर्षानंतर प्रथमच शेतकऱ्यांना खरीप व रब्बी दोन्ही हंगाम हाताशी आले आहेत. कायम दुष्काळी असलेल्या या तालुक्यात कायमचा दुष्काळ, प्रतिकूल हवामान यामुळे कधी खरीप, तर कधी रब्बी हंगामावर पाणी सोडावे लागत होते. दुबार पेरणीचा उपद्व्याप करावा लागत होता. यंदा मात्र शेवटच्या टप्प्यातील अवकाळीचा फटका वगळता खरीप व रब्बी दोन्ही हंगामात यशस्वी उत्पादन मिळाले आहे. जूनमध्ये मान्सूनच्या हजेरीने खरिपातील बाजरी, सूर्यफूल, मका, इतर कडधान्ये, गळीत धान्ये, तेलबियाची पिके चांगली मिळाली. रब्बीतही अवकाळीचा तडाखा वगळता परतीचा पाऊस, अनुकूल हवामान यामुळे पिके बहरली आहेत.