शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पोलीस भरतीत मराठा तरुणांना दिलासा; खुल्या प्रवर्गात टाकणारा जीआर रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2021 06:38 IST

Police recruitment: पोलीस शिपाई भरती २०१९ करीता ज्या एसईबीसी उमेदवारांनी अर्ज केले होते त्यांना ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ देण्याच्या दृष्टिकोनातून सुधारित शासन निर्णय गृह विभागाकडून लवकरच निर्गमित करण्यात येणार आहे, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील पोलीस भरती २०१९ करिता अर्ज केलेल्या तरुणांना खुल्या प्रवर्गात टाकणारा ४ जानेवारीचा शासन निर्णय (जीआर) रद्द करण्यात आल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी केली. लवकरच यासंदर्भात शुद्धीपत्रक जारी केले जाणार असून भरती प्रक्रियेत मराठा तरुणांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी (ईडब्ल्यूएस) असलेले लाभ, सवलती देण्यात येणार आहेत.

राज्यात रखडलेली साडेबारा हजार पोलीस शिपाई पदांची भरती प्रक्रिया आता पूर्ण केली जाणार आहे. त्यासाठी ४ जानेवारी रोजी गृह विभागाने काढलेल्या आदेशात एसईबीसी आरक्षण रद्द झाल्याने मराठा तरुणांना खुल्या प्रवर्गात टाकण्यात आले होते. मात्र त्यांना ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ देण्यात आला नव्हता. आरक्षणाचा फायदा मिळत नसल्याने अनेक उमेदवारांची वयोमर्यादा ओलांडली जात होती. त्यावर मराठा संघटनांचे पदाधिकारी आणि मराठा क्रांती मोर्चा, मराठा ठोक मोर्चाच्या समन्वयकांनी गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीमध्ये गृह विभागाच्या आदेशाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत हा आदेश मराठा उमेदवारांवर अन्याय करणारा असल्याचे सांगितले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी आदेश रद्द करण्याच्या सूचना गृहमंत्री देशमुख यांना दिल्या.

पोलीस शिपाई भरती २०१९ करीता ज्या एसईबीसी उमेदवारांनी अर्ज केले होते त्यांना ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ देण्याच्या दृष्टिकोनातून सुधारित शासन निर्णय गृह विभागाकडून लवकरच निर्गमित करण्यात येणार आहे, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.

हिंमत होतेच कशी ?पोलीस भरतीमध्ये एसईबीसीच्या तरुणांचा विचार न करताच जीआर काढण्याची हिंमत केलीत यावरुन सरकारची नियत आणि इरादे स्पष्ट होत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, तरुणांना नोकऱ्या, शिक्षणात संधी मिळावी असे तिघाडी सरकारला वाटत नाही. आता जीआर रद्द केला पण अजून कितीवेळा मराठा समाजाच्या भावनेला अशी नख लावणार आहात?    - आशिष शेलार, भाजप नेते

टॅग्स :Policeपोलिसgovernment jobs updateसरकारी नोकरी