शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपटगृहांत बाहेरील खाद्याला मनाईबाबत विचार करा - उच्च न्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 04:35 IST

मल्टिप्लेक्सच्या संघटनांकडून सूचना घेऊन प्रेक्षकांना चित्रपटगृहांत बाहेरील खाद्यपदार्थ नेऊ देण्याबाबत ठोस भूमिका घ्या, अशी सूचना उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारला केली.

मुंबई : मल्टिप्लेक्सच्या संघटनांकडून सूचना घेऊन प्रेक्षकांना चित्रपटगृहांत बाहेरील खाद्यपदार्थ नेऊ देण्याबाबत ठोस भूमिका घ्या, अशी सूचना उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारला केली.प्रेक्षकांना बाहेरील पदार्थ चित्रपटगृहांत नेण्यासंदर्भात याचिकाकर्ते जनेंद्र बक्सी यांनी काही सूचना गुरुवारी न्यायालयात सादर केल्या. त्यांच्याही विचार करण्याची सूचना न्या. आर. एम. बोर्डे व न्या. राजेश केतकर यांच्या खंडपीठाने गृहविभागाला केली. बाहेरचे खाद्यपदार्थ चित्रपटगृहांत नेण्यास बंदी घालण्यासंदर्भात कोणतीही कायदेशीर तरतूद नसतानाही प्रेक्षकांना बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास बंदी घालण्यात येते. वास्तविक, महाराष्ट्र सिनेमा (रेग्युलेशन) रुल्स नुसार, चित्रपटगृहांत व आॅडिटोरियमध्ये खाद्यपदार्थ विकण्यास मनाई आहे, असे याचिकेत म्हटले आहे.गेल्या सुनावणीत न्यायालयाने याचिकाकर्त्यांना यासंबंधी सूचना करण्याचे निर्देश दिले होते. त्याचे पालन करत याचिकाकर्त्यांचे वकील आदित्य प्रताप यांनी न्यायालयात सूचनांची यादीच सादर केली. बाहेरील खाद्यपदार्थांना व पाणी नेण्यास बंदी घालण्याविरुद्ध परवान्यामध्येच बंधनकारक तरतूद करण्याचे निर्देश राज्य सरकारला द्यावेत, अशी सूचना याचिकाकर्त्यांनी केली आहे.दरम्यान, या याचिकेत एफआयसीसीआय या मल्टिप्लेक्स मालकांच्या संघटनांनी मध्यस्थी याचिका केली आहे. या याचिकेमुळे मल्टिप्लेक्सच्या मालकांच्या अधिकारांवर गदा येणार आहे. त्यामुळे या याचिकेत मध्यस्थी करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती संघटनेने उच्च न्यायालयाला केली. त्यावर सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, राज्य सरकार सर्व पक्षांची बाजू ऐकून त्यानुसार निर्णय घेण्यास तयार आहे. न्यायालयाने सरकारचे म्हणणे मान्य करत दोन आठवड्यांनी या याचिकेवर सुनावणी ठेवली आहे.

टॅग्स :Courtन्यायालय