शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

वाढत्या उष्णतेचा पक्ष्यांच्या आरोग्यावर होतोय परिणाम

By admin | Updated: May 19, 2016 03:11 IST

दिवसेंदिवस वाढणाऱ्या उष्णतेमुळे मानवी जीवनाबरोबरच पक्ष्यांनाही शारीरिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

नवी मुंबई : दिवसेंदिवस वाढणाऱ्या उष्णतेमुळे मानवी जीवनाबरोबरच पक्ष्यांनाही शारीरिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील पशुपक्ष्यांवर उपचार करणाऱ्या वाशीतील भूमी जीवदया या सामाजिक संस्थेच्या वतीने उष्णतेमुळे पक्ष्यांवर होणाऱ्या आजारांवर मोफतपणे उपचार केले जात आहेत. उष्णतेच्या लाटेबरोबरच पाणीटंचाईची समस्या असल्याने पाणी न मिळाल्याने अनेक चिमण्यांना जीव गमवावा लागत आहे, तर पुरेसे पाणी न मिळाल्याने आकाशात झेप घेणारे हे पक्षी खाली कोसळल्याने दुखापत होण्याचे प्रमाणही वाढले आहे. शहरीकरणामुळे जंगल नष्ट झाले असून, पक्ष्यांना हक्काचा निवारा मिळत नाही. त्यामुळे इमारतीच्या जंगलात राहणा-या या पक्ष्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पाण्याची तहान भागविण्यासाठी भूमी जीवदया संस्थेच्या वतीने शहरात ठिकठिकाणी भांडी ठेवली जात असून, अनेक सामाजिक कार्यकर्त्यांमध्येही या भांड्यांचे वाटप करण्यात आले आहे. पंखांना इजा होणे, पायाला दुखापत होणे, अशक्तपणा आदींवर इलाज केले जात असल्याची माहिती भूमी जीवदया संस्थेचे सागर सावला यांनी सांगितले. कबुतर, कोंबडी यासारख्या पक्ष्यांमध्ये राणीखेत (मानमोडी)सारखे आजार पाहायला मिळत असून, यामध्ये पक्ष्यांच्या अंगावर पुरळ उठणे तसेच ३६० अंशात मान मोडणे अशी लक्षणे पाहायला मिळतात. वाढत्या उष्णतेमुळे ती सहन न झाल्याने अशा प्रकारच्या आजारांचे प्रमाण पाहायला मिळत असल्याची माहिती डॉ. महेंद्र चौधरी यांनी दिली. पक्ष्यांनाही मोठ्या प्रमाणात डीहायड्रेशनचा त्रास सहन करावा लागत असल्याचे डॉ. महेंद्र चौधरी यांनी सांगितले. नागरिकांनी घराच्या खिडकीत, गॅलरीमध्ये, कार्यालयात छोटेसे भांडे ठेवावे. त्यात पाणी ठेवल्यास पक्ष्यांची तहान भागवता येईल, यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याचे आवाहान पर्यावरणप्रेमींकडून करण्यात आले आहे. उडता उडताच बेशुद्ध दिवसेंदिवस कमी होणार हरीत पट्टे, पाण्याच्या शोधात दूरवर उडणाऱ्या या पक्ष्याच्या शरीरातील पाणी कमी झाल्याने उडता उडता बेशुद्ध पडण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असून, भूमी जीवदयाचे स्वयंसेवक स्वत: तिथे जाऊन या पक्ष्यांवर इलाज करीत आहेत. यामध्ये घारी, कबुतर, पोपट, बगळे आदी पक्ष्यांचा समावेश असून, या पक्ष्यांना मल्टिव्हिटॅमिन्स, ग्लुकोजचे पाणी तसेच अ‍ॅण्टिबायोटिक्स देऊन ते बरे झाल्यानंतर त्यांना पुन्हा स्वच्छंदीपणे झेप घेण्यासाठी सोडले जाते.