शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या उष्णतेचा पक्ष्यांच्या आरोग्यावर होतोय परिणाम

By admin | Updated: May 19, 2016 03:11 IST

दिवसेंदिवस वाढणाऱ्या उष्णतेमुळे मानवी जीवनाबरोबरच पक्ष्यांनाही शारीरिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

नवी मुंबई : दिवसेंदिवस वाढणाऱ्या उष्णतेमुळे मानवी जीवनाबरोबरच पक्ष्यांनाही शारीरिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील पशुपक्ष्यांवर उपचार करणाऱ्या वाशीतील भूमी जीवदया या सामाजिक संस्थेच्या वतीने उष्णतेमुळे पक्ष्यांवर होणाऱ्या आजारांवर मोफतपणे उपचार केले जात आहेत. उष्णतेच्या लाटेबरोबरच पाणीटंचाईची समस्या असल्याने पाणी न मिळाल्याने अनेक चिमण्यांना जीव गमवावा लागत आहे, तर पुरेसे पाणी न मिळाल्याने आकाशात झेप घेणारे हे पक्षी खाली कोसळल्याने दुखापत होण्याचे प्रमाणही वाढले आहे. शहरीकरणामुळे जंगल नष्ट झाले असून, पक्ष्यांना हक्काचा निवारा मिळत नाही. त्यामुळे इमारतीच्या जंगलात राहणा-या या पक्ष्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पाण्याची तहान भागविण्यासाठी भूमी जीवदया संस्थेच्या वतीने शहरात ठिकठिकाणी भांडी ठेवली जात असून, अनेक सामाजिक कार्यकर्त्यांमध्येही या भांड्यांचे वाटप करण्यात आले आहे. पंखांना इजा होणे, पायाला दुखापत होणे, अशक्तपणा आदींवर इलाज केले जात असल्याची माहिती भूमी जीवदया संस्थेचे सागर सावला यांनी सांगितले. कबुतर, कोंबडी यासारख्या पक्ष्यांमध्ये राणीखेत (मानमोडी)सारखे आजार पाहायला मिळत असून, यामध्ये पक्ष्यांच्या अंगावर पुरळ उठणे तसेच ३६० अंशात मान मोडणे अशी लक्षणे पाहायला मिळतात. वाढत्या उष्णतेमुळे ती सहन न झाल्याने अशा प्रकारच्या आजारांचे प्रमाण पाहायला मिळत असल्याची माहिती डॉ. महेंद्र चौधरी यांनी दिली. पक्ष्यांनाही मोठ्या प्रमाणात डीहायड्रेशनचा त्रास सहन करावा लागत असल्याचे डॉ. महेंद्र चौधरी यांनी सांगितले. नागरिकांनी घराच्या खिडकीत, गॅलरीमध्ये, कार्यालयात छोटेसे भांडे ठेवावे. त्यात पाणी ठेवल्यास पक्ष्यांची तहान भागवता येईल, यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याचे आवाहान पर्यावरणप्रेमींकडून करण्यात आले आहे. उडता उडताच बेशुद्ध दिवसेंदिवस कमी होणार हरीत पट्टे, पाण्याच्या शोधात दूरवर उडणाऱ्या या पक्ष्याच्या शरीरातील पाणी कमी झाल्याने उडता उडता बेशुद्ध पडण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असून, भूमी जीवदयाचे स्वयंसेवक स्वत: तिथे जाऊन या पक्ष्यांवर इलाज करीत आहेत. यामध्ये घारी, कबुतर, पोपट, बगळे आदी पक्ष्यांचा समावेश असून, या पक्ष्यांना मल्टिव्हिटॅमिन्स, ग्लुकोजचे पाणी तसेच अ‍ॅण्टिबायोटिक्स देऊन ते बरे झाल्यानंतर त्यांना पुन्हा स्वच्छंदीपणे झेप घेण्यासाठी सोडले जाते.