शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

लादलेल्या उमेदवारींमुळेच काँग्रेसचे ‘बुरे दिन’

By admin | Updated: July 20, 2014 01:22 IST

शहरात एकेकाळी काँग्रेसचे सर्वच्या सर्व आमदार निवडून येत होते. काही मतदारसंघ हे काँग्रेसचा गड होते. लोकसभा निवडणुकीत ज्या विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पुढे राहते त्याच मतदारसंघात

कार्यकर्ता मेळावा : शहराध्यक्षांनी प्रदेशाध्यक्षांना दाखविला आरसा नागपूर : शहरात एकेकाळी काँग्रेसचे सर्वच्या सर्व आमदार निवडून येत होते. काही मतदारसंघ हे काँग्रेसचा गड होते. लोकसभा निवडणुकीत ज्या विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पुढे राहते त्याच मतदारसंघात विधानसभेत काँग्रेस का हरते, यावर चिंतन करण्याची गरज आहे. प्रामाणिक कार्यकर्त्याला उमेदवारी देताना डावलले जाते. दिल्ली दरबारी वजन वापरून उमेदवारी आणली जाते. अशा लादलेल्या उमेदवारीमुळे काँग्रेसचे ‘बुरे दिन’ आले आहेत, असे परखड मत शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी शनिवारी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या समक्ष काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केले. शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने शनिवारी जुना काटोल रोड चौक स्थित बचत सभागृहात पश्चिम नागपूर कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, वित्त व ऊर्जा राज्यमंत्री राजेंद्र मुळक, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, विनोद गुडधे पाटील, आ. दीनानाथ पडोळे, माजी खा. गेव्ह आवारी, यादवराव देवगडे, प्रदेश सचिव जयप्रकाश गुप्ता, शेख हुसेन, सरचिटणीस अतुल कोटेचा उपस्थित होते. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक हरीश ग्वालबंशी, नितीश ग्वालबंशी यांच्यासह तन्हा नागपुरी, अनिल परतेकी आदींनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. विकास ठाकरे यांनी मेळाव्याची भूमिका स्पष्ट करताना आक्रमक भूमिका मांडली. काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांवर सातत्याने जो अन्याय सुरूआहे, त्यावरून कदाचित नक्षलवादी असेच तयार होत असतील, असे परखड मत त्यांनी मांडले. राज्यमंत्री राजेंद्र मुळक म्हणाले, पश्चिम नागपूर काँग्रेसचा गड होता. परंतु २० वर्षांपासून तिथे काँग्रेस नाही. पश्चिमचा आमदार कोण हे सुद्धा जनतेला माहिती नाही. विधानसभेत त्यांनी मतदारसंघातील प्रश्न उपस्थित केला नाही. येत्या निवडणुकीत आम्ही सर्व एकसंघ होऊन काँग्रेसला विजयी करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संचालन घनश्याम मांगे तर आभार संजय सरायकर यांनी मानले. या वेळी सुनील चोपडा, दीपक वानखेडे, ईश्वर बरडे, अरुण डवरे, शिला मोहोड, सरस्वती सलामे, पदमा उइके, सुनील चोपडा आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)कितीही शहा आले तरी चिंता नाही - माणिकराव काँग्रेसचे विचार आणि शाहू, फुले आंबेडकरांचे विचार या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे कितीही शहा (भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा) आले तरी महाराष्ट्राची जनता आरएसएसला भीक घालणार नाही, त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही, असे मत प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केले. सत्तेसाठी संघाने काँग्रेसच्या विरोधात विषारी प्रचार केला. महात्मा गांधीजींची हत्या कोणत्या विचारांनी केली, हे लोकांना माहीत आहे. भाजपाचा खोटारडेपणा जनतेसमोर उघड झाला आहे. तेव्हा काँग्रेसच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी आपसी मतभेद विसरावे. काँग्रेस वटवृक्ष आहे. सर्वांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. सर्वांचाच मान राखला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. लोकमतच्या पोलखोलचा उल्लेखनागपूर महापालिका सामान्यजनांना मूलभूत सेवा देण्यास अपयशी ठरली आहे. अनेक योजना रखडलेल्या आहेत. याबाबत लोकमतने ‘ नो उल्लू बनाविंग’ हे विशेष पान काढून मनपाची पोलखोल केली, असा उल्लेख वित्त व ऊर्जा राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी यावेळी केला.