शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

लादलेल्या उमेदवारींमुळेच काँग्रेसचे ‘बुरे दिन’

By admin | Updated: July 20, 2014 01:22 IST

शहरात एकेकाळी काँग्रेसचे सर्वच्या सर्व आमदार निवडून येत होते. काही मतदारसंघ हे काँग्रेसचा गड होते. लोकसभा निवडणुकीत ज्या विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पुढे राहते त्याच मतदारसंघात

कार्यकर्ता मेळावा : शहराध्यक्षांनी प्रदेशाध्यक्षांना दाखविला आरसा नागपूर : शहरात एकेकाळी काँग्रेसचे सर्वच्या सर्व आमदार निवडून येत होते. काही मतदारसंघ हे काँग्रेसचा गड होते. लोकसभा निवडणुकीत ज्या विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पुढे राहते त्याच मतदारसंघात विधानसभेत काँग्रेस का हरते, यावर चिंतन करण्याची गरज आहे. प्रामाणिक कार्यकर्त्याला उमेदवारी देताना डावलले जाते. दिल्ली दरबारी वजन वापरून उमेदवारी आणली जाते. अशा लादलेल्या उमेदवारीमुळे काँग्रेसचे ‘बुरे दिन’ आले आहेत, असे परखड मत शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी शनिवारी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या समक्ष काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केले. शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने शनिवारी जुना काटोल रोड चौक स्थित बचत सभागृहात पश्चिम नागपूर कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, वित्त व ऊर्जा राज्यमंत्री राजेंद्र मुळक, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, विनोद गुडधे पाटील, आ. दीनानाथ पडोळे, माजी खा. गेव्ह आवारी, यादवराव देवगडे, प्रदेश सचिव जयप्रकाश गुप्ता, शेख हुसेन, सरचिटणीस अतुल कोटेचा उपस्थित होते. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक हरीश ग्वालबंशी, नितीश ग्वालबंशी यांच्यासह तन्हा नागपुरी, अनिल परतेकी आदींनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. विकास ठाकरे यांनी मेळाव्याची भूमिका स्पष्ट करताना आक्रमक भूमिका मांडली. काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांवर सातत्याने जो अन्याय सुरूआहे, त्यावरून कदाचित नक्षलवादी असेच तयार होत असतील, असे परखड मत त्यांनी मांडले. राज्यमंत्री राजेंद्र मुळक म्हणाले, पश्चिम नागपूर काँग्रेसचा गड होता. परंतु २० वर्षांपासून तिथे काँग्रेस नाही. पश्चिमचा आमदार कोण हे सुद्धा जनतेला माहिती नाही. विधानसभेत त्यांनी मतदारसंघातील प्रश्न उपस्थित केला नाही. येत्या निवडणुकीत आम्ही सर्व एकसंघ होऊन काँग्रेसला विजयी करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संचालन घनश्याम मांगे तर आभार संजय सरायकर यांनी मानले. या वेळी सुनील चोपडा, दीपक वानखेडे, ईश्वर बरडे, अरुण डवरे, शिला मोहोड, सरस्वती सलामे, पदमा उइके, सुनील चोपडा आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)कितीही शहा आले तरी चिंता नाही - माणिकराव काँग्रेसचे विचार आणि शाहू, फुले आंबेडकरांचे विचार या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे कितीही शहा (भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा) आले तरी महाराष्ट्राची जनता आरएसएसला भीक घालणार नाही, त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही, असे मत प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केले. सत्तेसाठी संघाने काँग्रेसच्या विरोधात विषारी प्रचार केला. महात्मा गांधीजींची हत्या कोणत्या विचारांनी केली, हे लोकांना माहीत आहे. भाजपाचा खोटारडेपणा जनतेसमोर उघड झाला आहे. तेव्हा काँग्रेसच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी आपसी मतभेद विसरावे. काँग्रेस वटवृक्ष आहे. सर्वांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. सर्वांचाच मान राखला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. लोकमतच्या पोलखोलचा उल्लेखनागपूर महापालिका सामान्यजनांना मूलभूत सेवा देण्यास अपयशी ठरली आहे. अनेक योजना रखडलेल्या आहेत. याबाबत लोकमतने ‘ नो उल्लू बनाविंग’ हे विशेष पान काढून मनपाची पोलखोल केली, असा उल्लेख वित्त व ऊर्जा राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी यावेळी केला.