शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

काँग्रेस 15 वर्षानंतर स्वबळावर लढणार

By admin | Updated: September 28, 2014 03:09 IST

काँग्रेस आणि समाजवादी पार्टीची शुक्रवारी झालेली आघाडी शनिवारी तुटली. 1999नंतर प्रथमच काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असून, 288 जागा लढविणार आहे.

कवाडे गट सोबत : समाजवादी पार्टीशी आघाडी नाही
नवी दिल्ली/मुंबई : काँग्रेस आणि समाजवादी पार्टीची शुक्रवारी झालेली आघाडी शनिवारी तुटली. 1999नंतर प्रथमच काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असून, 288 जागा लढविणार आहे. 
शुक्रवारी रात्री उशिरार्पयत समाजवादी पार्टीसाठी 8 जागा सोडण्याच्या प्रस्तावासह राज्यात आघाडी करण्याचा निर्णय जवळपास पक्का झाला होता. परंतु दिल्लीतील चर्चेनंतर तो बदलून स्वबळावर लढण्याचे ठरले. शुक्रवारी रात्री राहुल गांधी, मधुसूदन मिस्त्री, मोहन प्रकाश आणि अन्य नेते 143 जागांचे उमेदवार ठरविण्यासाठी चर्चा करीत असताना मिस्त्री यांनी सपासोबत आघाडी करण्याचा मुद्दा उपस्थित केला. परंतु उत्तर प्रदेशात काँग्रेस सपाशी लढत असल्याने महाराष्ट्रात जर आघाडी केली तर त्यातून चुकीचे संकेत जातील. असे संकेत पक्षाच्या हिताचे नाहीत, असे पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांना सांगितले. सपाने ज्या 8 जागांची मागणी केली होती, त्या जागा सोडण्याची काँग्रेसची तयारी नव्हती. या आठही जागा विजय मिळवून देणा:या आहेत, असे काँग्रेसला वाटत आहे. त्यामुळे सपाशी आघाडी तोडण्याचे आणि त्या जागांवर आपले उमेदवार उभे करण्याचे निर्देश राहुल गांधी यांनी मोहन प्रकाश यांना दिले आणि दुस:याच क्षणी ही आघाडी तुटली. आम्ही मागत होतो त्या जागा द्यायलाही काँग्रेस तयार नसल्याने  आघाडी करणो शक्य नव्हते. त्यामुळे आम्ही स्वबळावर लढू, असे आझमी म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)
 
कवाडेंचे उमेदवार पंजावर
पीपल्स रिपब्लिकन पार्टीला काँग्रेसने पाच जागा दिल्या असून तेथील उमेदवार काँग्रेसच्या पंजा चिन्हावर लढतील, असे पक्षाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी सांगितले. देवळाली, भुसावळ, अंबरनाथ, भंडारा आणि अजरुनी मोरगाव या त्या जागा आहेत. प्रचाराला वेळ कमी असल्याने आम्ही आमचे उमेदवार पंजावर उभे करीत आहोत, असे ते म्हणाले.
 
 
भाजपाने स्वाशेसं, राष्ट्रीय समाज पक्ष आणि रिपाइंशी युती केली आहे. काँग्रेसने पीपल्स रिपब्लिकन पार्टीशी आघाडी केली. 
 
राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि बहुजन समाज पार्टीने कोणाशीही आघाडी केलेली नाही.