शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

शरद पवारांमुळेच काँग्रेस कमकुवत !

By admin | Updated: September 14, 2015 02:01 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्तेसाठी काँग्रेसचा वापर करुन घेतल्यानेच आज पक्ष कमकुवत झाला आहे. अलीकडच्या काळात तर काँग्रेस पक्ष त्यांच्या इशाऱ्यावर चालत होता

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्तेसाठी काँग्रेसचा वापर करुन घेतल्यानेच आज पक्ष कमकुवत झाला आहे. अलीकडच्या काळात तर काँग्रेस पक्ष त्यांच्या इशाऱ्यावर चालत होता, असे परखड मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे-पाटील यांनी केले. मराठवाड्याने यापुढील निवडणुका केवळ पाण्याच्या मुद्यावरच लढवाव्यात, असे आवाहन त्यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत केले.बारामतीकरांची पाठिंब्याची चाल नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांनी वेळीच ओळखली. त्यामुळे पवारांना प्रयत्न करूनही सत्तेबाहेर बसावे लागले, असा टोला विखे- पाटील यांनी लगावला. गेल्याच आठवड्यात विखे यांनी राज्यातील दुष्काळाला पवार जबाबदार असल्याचा आरोप केला होता. त्यावर विखे- पाटील यांनी कोणाचा मुखवटा घातला आहे, असा सवाल राष्ट्रवादीने केला होता. विखे- पाटील यांनी मात्र त्याला उत्तर न देता रविवारी पुन्हा पवारांवर आरोपांची सरबत्ती केली. बारामतीकरांनी सत्ता पूर्णपणे त्यांच्या इच्छेनुसार राबवली. त्यात काँग्रेस कार्यकर्त्यांची ससेहोलपट झाली. सत्ता अनुकूल असूनही पवारांनी तेव्हा पाणीप्रश्न प्रलंबित ठेवला. फडणवीस सरकार पाडण्यासाठी त्यांनी सेनेला तोडण्याचा प्रयत्न केला. त्यात यश न आल्याने ते निराश झाले असावेत. सत्तेत भागीदारी मिळाली असती तर त्यांनी मोर्चा काढला असता का, असा प्रश्न विखे-पाटील यांनी केला. एवढी वर्षे पाटबंधारे खाते सांभाळूनही सिंचनाचा प्रश्न कासुटला नाही, हे काम अनावधानाने राहून गेले का, असा सवाल त्यांनी केला. वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील आज असते तर त्यांनी पश्चिमेचे पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्यासाठी जीवाचे रान केले असते. सरकारने केंद्राचा निधी व कर्जरोख्यातून हा प्रश्न मार्गी लावावा, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)