शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
6
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
7
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
8
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
9
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
10
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
11
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
12
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
13
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
15
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
16
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
17
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
18
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
19
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
20
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण

शरद पवारांमुळेच काँग्रेस कमकुवत !

By admin | Updated: September 14, 2015 02:01 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्तेसाठी काँग्रेसचा वापर करुन घेतल्यानेच आज पक्ष कमकुवत झाला आहे. अलीकडच्या काळात तर काँग्रेस पक्ष त्यांच्या इशाऱ्यावर चालत होता

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्तेसाठी काँग्रेसचा वापर करुन घेतल्यानेच आज पक्ष कमकुवत झाला आहे. अलीकडच्या काळात तर काँग्रेस पक्ष त्यांच्या इशाऱ्यावर चालत होता, असे परखड मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे-पाटील यांनी केले. मराठवाड्याने यापुढील निवडणुका केवळ पाण्याच्या मुद्यावरच लढवाव्यात, असे आवाहन त्यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत केले.बारामतीकरांची पाठिंब्याची चाल नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांनी वेळीच ओळखली. त्यामुळे पवारांना प्रयत्न करूनही सत्तेबाहेर बसावे लागले, असा टोला विखे- पाटील यांनी लगावला. गेल्याच आठवड्यात विखे यांनी राज्यातील दुष्काळाला पवार जबाबदार असल्याचा आरोप केला होता. त्यावर विखे- पाटील यांनी कोणाचा मुखवटा घातला आहे, असा सवाल राष्ट्रवादीने केला होता. विखे- पाटील यांनी मात्र त्याला उत्तर न देता रविवारी पुन्हा पवारांवर आरोपांची सरबत्ती केली. बारामतीकरांनी सत्ता पूर्णपणे त्यांच्या इच्छेनुसार राबवली. त्यात काँग्रेस कार्यकर्त्यांची ससेहोलपट झाली. सत्ता अनुकूल असूनही पवारांनी तेव्हा पाणीप्रश्न प्रलंबित ठेवला. फडणवीस सरकार पाडण्यासाठी त्यांनी सेनेला तोडण्याचा प्रयत्न केला. त्यात यश न आल्याने ते निराश झाले असावेत. सत्तेत भागीदारी मिळाली असती तर त्यांनी मोर्चा काढला असता का, असा प्रश्न विखे-पाटील यांनी केला. एवढी वर्षे पाटबंधारे खाते सांभाळूनही सिंचनाचा प्रश्न कासुटला नाही, हे काम अनावधानाने राहून गेले का, असा सवाल त्यांनी केला. वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील आज असते तर त्यांनी पश्चिमेचे पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्यासाठी जीवाचे रान केले असते. सरकारने केंद्राचा निधी व कर्जरोख्यातून हा प्रश्न मार्गी लावावा, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)