नंदुरबार : राज्यातील सरकार हे टिष्ट्वटरवर चालणारे सरकार आहे़ टीव्ही कलावंताच्या टिष्ट्वटची दखल तत्काळ घेऊन कारवाई करण्यात येते, मात्र सामान्य माणूस आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या जात नाहीत़ हे सरकार झोपी गेले आहे़ त्याला जाग आली तर ठिक, अन्यथा काँग्रेस पक्ष सरकारला जागे करेल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिला़नंदुरबारमध्ये छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात मंगळवारी झालेल्या शेतकरी मेळाव्यात खा. चव्हाण म्हणाले, काँग्रेसची पाळेमुळे मजबूत करण्यात जिल्ह्यातील सर्वच नेत्यांचा सहभाग राहिला आहे़ धुळे व नंदुरबार जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे़ देशातील ‘आधार’सारख्या अनेक महत्त्वपूर्ण योजनांची सुरूवात नंदुरबार जिल्ह्यात करण्यात आली. नंदुरबारसह राज्यातील आदिवासी बांधवांच्या वनजमिनी उद्योगपतींच्या घशात घालण्याचा या सरकारचा डाव आहे़ त्यासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पुढाकार घेत, आदिवासी बांधवांना न्याय देण्याच्या सूचना केल्या आहेत़ त्यानुसार अनुसूचित जमाती सेलचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री पद्माकर वळवी यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे़ आदिवासींंना वनजमिनीतून उत्पन्न मिळून ती जमीन त्यांच्या मालकीची असावी, असा काँग्रेसचा आग्रह आहे़ त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे़ त्याला यश येईलच, असा आशावादही चव्हाण यांनी व्यक्त केला़ मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, माजी केंद्रीय मंत्री तुषार चौधरी, माणिकराव गावीत, आ. के.सी.पाडवी, अमरिशभाई पटेल, डी. एस.अहिरे, कुणाल पाटील, माजी मंत्री पद्माकर वळवी, आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिरीष नाईक आदी उपस्थित होते़
झोपलेल्या सरकारला काँग्रेस जागे करणार!
By admin | Updated: September 14, 2016 06:41 IST