शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

काँग्रेसची राष्ट्रवादीसह आघाडी अशक्य

By admin | Updated: October 24, 2016 05:34 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांच्या वाटपाचे घोडे अडून बसल्याने या निवडणुकीसह राज्यात होऊ घातलेल्या

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांच्या वाटपाचे घोडे अडून बसल्याने या निवडणुकीसह राज्यात होऊ घातलेल्या पालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होण्याची शक्यता मावळली आहे.

विधान परिषदेच्या पुणे, भंडारा-गोंदिया, जळगाव, यवतमाळ, नांदेड आणि सांगली-सातारा अशा सहा जागांसाठी निवडणूक होत असून यापैकी नांदेड, यवतमाळ आणि सांगली अशा तीन जागा काँग्रेसने मागितल्या आहेत. मात्र, यापैकी नांदेड वळगता एकही जागा सोडण्याची राष्ट्रवादीची तयारी नाही. नांदेडमध्ये अमर राजुरकर हे काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत. तर यवतमाळ-संदीप बाजोरिया आणि सांगलीत प्रभाकर घारगे हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. जागावाटपासाठी झालेल्या दोन बैठकांमध्ये तोडगा निघालेला नाही.

राज्यातील नगरपालिका, नगरपंचायती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीशी आघाडी न करता या निवडणुका स्वतंत्रपणलढवाव्यात, असा सूर काँग्रेसमध्ये उमटत असून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी घेतलेल्या विभागावार मेळाव्यात कार्यकर्त्यांनी या मागणीवर जोर दिल्याचे दिसून आले.

स्वत: खा. चव्हाण हेदेखील राष्ट्रवादीशी आघाडी करण्यास फारशे उत्सुक नाहीत. नुकतीच त्यांनी पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेऊन आपले हे मत त्यांच्या कानी घातल्याचे समजते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि ज्येष्ठ नेते नारायण राणे हे तर पूर्वीपासूनच राष्ट्रवादीशी आघाडी करण्याच्या विरोधात आहेत. सांगली-सातारा विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला सोडण्यास माजी मंत्री पतंगराव कदम यांनी ठाम विरोध दर्शविला आहे. काँग्रेसकडून मोहनराव कदम यांची उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले- २०१४च्या विधानसभा निवडणुकीत जागावाटप अंतिम टप्प्यात असताना राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी तोडली. त्यामुळे ऐनवेळी उमेदवारांची शोधाशोध करावी लागली. त्याची जबर किंमत पक्षाला मोजावी लागली. त्यामुळे किमान आतातरी पक्षाने वेळीच सावध होऊन राष्ट्रवादीशी संगत करू नये, असे मत एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.