शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

‘शेतकऱ्यांच्या दुर्दशेला काँग्रेसच जबाबदार’

By admin | Updated: June 9, 2017 05:37 IST

देशातील शेतकऱ्यांच्या आजच्या दुर्दशेला केवळ काँग्रेसच जबाबदार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशातील शेतकऱ्यांच्या आजच्या दुर्दशेला केवळ काँग्रेसच जबाबदार आहे. सर्वाधिक काळ देशाची सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेसला शेतकऱ्यांचा, कामगारांचा व गरिबांचा विसर पडल्याने ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी केला.केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल वांद्रे येथील रंगशारदा येथे आयोजित पत्रकार परिषदेत राजनाथ सिंह बोलत होते. या वेळी मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार, प्रदेश प्रवक्ते माधव भांडारी उपस्थित होते. शेतकऱ्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकार संवेदनशील असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.शेतकऱ्यांच्या सध्या सुरू असलेल्या आंदोलनाबद्दल विचारले असता ते म्हणाले, मीदेखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे, मला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची पूर्ण जाणीव आहे. मध्य प्रदेशात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान व महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चांगले काम करत आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी अनेक पावलेही उचलली आहेत. त्यांच्या पाठीशी शेतकऱ्यांनी उभे राहिले पाहिजे. शेतकरी किंवा देशातील सर्वसामान्य, गरीबांच्या विश्वासाला तडा जाईल, असा कोणताही निर्णय आमचे सरकार घेणार नसल्याचे ते म्हणाले. तसेच सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या समस्यांना प्राधान्य देत असून यापुढेही देतच राहणार, असेही त्यांनी सांगितले.स्वतंत्र भारताच्या इतिहासात कोणत्याही सरकारने आर्थिक आघाडीवर चांगली स्थिती असताना आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम राबविला नव्हता. हे धाडस मोदी सरकारने दाखविले. वस्तू व सेवा कराच्या निमित्ताने स्वतंत्र भारतातील सर्वांत मोठी आर्थिक सुधारणा मोदी सरकारने राबविली आहे. जीएसटीमुळे ‘कर दहशतवाद’ संपणार असल्याचा दावा राजनाथ सिंह यांनी केला.>शिवसेना आमचा मित्रपक्षशिवसेनेशी आमचे जुने नाते आहे. शिवसेना आमचा मित्रपक्ष आहे. आता कुटुंबात एखाद्या मुद्द्यावर मतभेद असतात, मात्र त्याचा अर्थ संबंध वाईट आहेत असा होत नाही. त्यांच्याशी आमचे संबंध चांगले असल्याचेही सिंह म्हणाले.