शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

‘शेतकऱ्यांच्या दुर्दशेला काँग्रेसच जबाबदार’

By admin | Updated: June 9, 2017 05:37 IST

देशातील शेतकऱ्यांच्या आजच्या दुर्दशेला केवळ काँग्रेसच जबाबदार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशातील शेतकऱ्यांच्या आजच्या दुर्दशेला केवळ काँग्रेसच जबाबदार आहे. सर्वाधिक काळ देशाची सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेसला शेतकऱ्यांचा, कामगारांचा व गरिबांचा विसर पडल्याने ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी केला.केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल वांद्रे येथील रंगशारदा येथे आयोजित पत्रकार परिषदेत राजनाथ सिंह बोलत होते. या वेळी मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार, प्रदेश प्रवक्ते माधव भांडारी उपस्थित होते. शेतकऱ्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकार संवेदनशील असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.शेतकऱ्यांच्या सध्या सुरू असलेल्या आंदोलनाबद्दल विचारले असता ते म्हणाले, मीदेखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे, मला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची पूर्ण जाणीव आहे. मध्य प्रदेशात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान व महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चांगले काम करत आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी अनेक पावलेही उचलली आहेत. त्यांच्या पाठीशी शेतकऱ्यांनी उभे राहिले पाहिजे. शेतकरी किंवा देशातील सर्वसामान्य, गरीबांच्या विश्वासाला तडा जाईल, असा कोणताही निर्णय आमचे सरकार घेणार नसल्याचे ते म्हणाले. तसेच सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या समस्यांना प्राधान्य देत असून यापुढेही देतच राहणार, असेही त्यांनी सांगितले.स्वतंत्र भारताच्या इतिहासात कोणत्याही सरकारने आर्थिक आघाडीवर चांगली स्थिती असताना आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम राबविला नव्हता. हे धाडस मोदी सरकारने दाखविले. वस्तू व सेवा कराच्या निमित्ताने स्वतंत्र भारतातील सर्वांत मोठी आर्थिक सुधारणा मोदी सरकारने राबविली आहे. जीएसटीमुळे ‘कर दहशतवाद’ संपणार असल्याचा दावा राजनाथ सिंह यांनी केला.>शिवसेना आमचा मित्रपक्षशिवसेनेशी आमचे जुने नाते आहे. शिवसेना आमचा मित्रपक्ष आहे. आता कुटुंबात एखाद्या मुद्द्यावर मतभेद असतात, मात्र त्याचा अर्थ संबंध वाईट आहेत असा होत नाही. त्यांच्याशी आमचे संबंध चांगले असल्याचेही सिंह म्हणाले.