शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

‘शेतकऱ्यांच्या दुर्दशेला काँग्रेसच जबाबदार’

By admin | Updated: June 9, 2017 05:37 IST

देशातील शेतकऱ्यांच्या आजच्या दुर्दशेला केवळ काँग्रेसच जबाबदार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशातील शेतकऱ्यांच्या आजच्या दुर्दशेला केवळ काँग्रेसच जबाबदार आहे. सर्वाधिक काळ देशाची सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेसला शेतकऱ्यांचा, कामगारांचा व गरिबांचा विसर पडल्याने ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी केला.केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल वांद्रे येथील रंगशारदा येथे आयोजित पत्रकार परिषदेत राजनाथ सिंह बोलत होते. या वेळी मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार, प्रदेश प्रवक्ते माधव भांडारी उपस्थित होते. शेतकऱ्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकार संवेदनशील असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.शेतकऱ्यांच्या सध्या सुरू असलेल्या आंदोलनाबद्दल विचारले असता ते म्हणाले, मीदेखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे, मला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची पूर्ण जाणीव आहे. मध्य प्रदेशात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान व महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चांगले काम करत आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी अनेक पावलेही उचलली आहेत. त्यांच्या पाठीशी शेतकऱ्यांनी उभे राहिले पाहिजे. शेतकरी किंवा देशातील सर्वसामान्य, गरीबांच्या विश्वासाला तडा जाईल, असा कोणताही निर्णय आमचे सरकार घेणार नसल्याचे ते म्हणाले. तसेच सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या समस्यांना प्राधान्य देत असून यापुढेही देतच राहणार, असेही त्यांनी सांगितले.स्वतंत्र भारताच्या इतिहासात कोणत्याही सरकारने आर्थिक आघाडीवर चांगली स्थिती असताना आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम राबविला नव्हता. हे धाडस मोदी सरकारने दाखविले. वस्तू व सेवा कराच्या निमित्ताने स्वतंत्र भारतातील सर्वांत मोठी आर्थिक सुधारणा मोदी सरकारने राबविली आहे. जीएसटीमुळे ‘कर दहशतवाद’ संपणार असल्याचा दावा राजनाथ सिंह यांनी केला.>शिवसेना आमचा मित्रपक्षशिवसेनेशी आमचे जुने नाते आहे. शिवसेना आमचा मित्रपक्ष आहे. आता कुटुंबात एखाद्या मुद्द्यावर मतभेद असतात, मात्र त्याचा अर्थ संबंध वाईट आहेत असा होत नाही. त्यांच्याशी आमचे संबंध चांगले असल्याचेही सिंह म्हणाले.