शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस-राकाँ व भाजप शिवसेना स्वतंत्र लढणार

By admin | Updated: August 3, 2014 00:52 IST

महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्षात आगामी विधानसभा निवडणुकीत युती किंवा आघाडी होण्याबाबत शंका आहे. त्यामुळे काँग्रेस-राकाँ व भाजप शिवसेना हे प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे निवडणुका लढतील

प्रकाश आंबेडकरांचे भाकीत : युती-आघाडीबाबत शंका नागपूर : महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्षात आगामी विधानसभा निवडणुकीत युती किंवा आघाडी होण्याबाबत शंका आहे. त्यामुळे काँग्रेस-राकाँ व भाजप शिवसेना हे प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे निवडणुका लढतील आणि निवडणुकीच्या निकालानंतरच युती किंवा आघाडीबाबत निर्णय घेतील, असे भाकीत भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी येथे पत्रपरिषदेत वर्तविले. महाराष्ट्रातील सध्याची एकूणच राजकीय परिस्थिती पाहता त्यांनी उपरोक्त मत व्यक्त केले आहे. भाजप केंद्रात पूर्ण बहुमतात असल्याने ते शिवसेनेला कुठलाही भाव देताना दिसून येत नाही. शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनाही त्यांनी अनेकदा महत्त्व दिलेले नाही. याची सल शिवसेनेला आहे. यातच महाराष्ट्रात भाजपकडे फडणवीस सोडले तर प्रामाणिक चेहरा नाही. तसेच काँग्रेस राष्ट्रवादी पार्टीला एकही जागा वाढवून देण्यास तयार नाही. एक जागाही वाढवून दिली तर ते त्यांचे अपयश असल्याचे संकेत जातील. असे संकेत काँग्रेस कदापि देणार नाही. त्यामुळे चारही जण आपापल्या भूमिकांवर अडून बसले तर निवडणुकांपूर्वी युती किंवा आघाडी होणार नाही. निवडणुकांच्या निकालानंतरच नवीन समीकरणे तयार होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. आपण स्वत: महाराष्ट्र लोकशाही आघाडी अंतर्गत निवडणुका लढणार आहोत. या आघाडीत ५ राजकीय पक्ष व ७ विविध संघटनांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये युतीला भरघोस यश आले. परंतु नरेंद्र मोदी यांची लहर आता ओसरली आहे. महाराष्ट्रात ज्या-ज्या पक्षांची कमिटेड मते त्या-त्या पक्षाला मिळाली तर विधानसभा निवडणूकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेत पक्षाचे ज्येष्ठ नेते मिलिंद पखाले, नगरसेवक राजू लोखंडे, डॉ. संदीप नंदेश्वर उपस्थित होते. (प्रतिनिधी)मुस्लिमांच्या आरक्षणातील तांत्रिक अडचण दूर व्हावीराज्य सरकारने मराठा व मुस्लिमांना आरक्षण जाहीर केले आहे. परंतु त्यात एक अडचण आहे. आरक्षणाची अधिसूचना जारी करताना मुस्लीम समाजाला आरक्षण असे जाहीर करण्यात आले आहे. परंतु मुस्लीम समाजातील विद्यार्थी हे त्यांच्या जात प्रमाणपत्रांवर मुस्लीम असा उल्लेख करीत नाही. ते इस्लाम हा शब्द वापरतात. तेव्हा ही तांत्रिक अडचण निर्माण करून शासनाने मुस्लिमांच्या अडचणी वाढविल्या आहेत. त्या तातडीने दूर कराव्यात. तसेच अ‍ॅग्रीकल्चर लॅण्डबाबत शासनाने घेतलेला निर्णय चुकीचा असून त्यामुळे शहराचा नियोजित विकास रखडेल, अशी भीती व्यक्त करीत हा निर्णय मागे घेण्याची मागणी त्यांनी केली.