शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

“PM मोदींनी महात्मा गांधींबाबत केलेले विधान म्हणजे देशाचे दुर्दैव”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 14:59 IST

Prithviraj Chavan News: पंतप्रधान मोदींनी महात्मा गांधी यांच्यावर राग काढला. जगात महात्मा गांधी यांचे महत्व मोदींना माहिती नाही, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

Prithviraj Chavan News: लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या सातव्या टप्प्यातील मतदान ०१ जून रोजी होणार आहे. तर, ०४ जून रोजी मतमोजणी आहे. शेवटच्या टप्प्यातील प्रचाराला चांगलाचा वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या एका विधानावरून आता विरोधकांकडून टीका केली जात आहे. पंतप्रधान मोदी यांनी महात्मा गांधींबाबत केलेले विधान हे देशाचे दुर्दैव असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. 

जगाला महात्मा गांधी यांच्याविषयी सिनेमाच्या माध्यमातून माहिती मिळाली. १९८२ मध्ये रिचर्ड एटनबरो यांनी 'गांधी' हा सिनेमा बनवला. त्यानंतर जगभरातील लोकांना महत्मा गांधींविषयी माहिती मिळाली. तोपर्यंत जगाला गांधींबाबत जास्त माहिती नव्हते. महात्मा गांधी जगातील महान आत्मा होते. या ७५ वर्षात गांधीजींबद्दल जगाला माहिती देण्याची जबाबदारी आपली नव्हती का, अशी विचारणा पंतप्रधान मोदी यांनी केली. तसेच जर जग मार्टिन ल्युथर किंग, नेल्सन मंडेला आणि अन्य नेत्यांबाबत जाणते. पण गांधीजी त्यांच्यापेक्षा कमी नव्हते. तुम्हाला हे स्वीकारावे लागेल. जगभरात फिरल्यानंतर हे सांगत आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले होते. यावरून आता पृथ्वीराज चव्हाण यांनी हल्लाबोल केला.

PM मोदींनी महात्मा गांधींबाबत केलेले विधान म्हणजे देशाचे दुर्दैव

पंतप्रधान मोदी यांचे काय वाटेल ते बोलणे सुरु आहे . त्यांनी महात्मा गांधी यांच्यावर राग काढला. जगात महात्मा गांधी यांचे महत्व मोदींना माहिती नाही. त्यांचे वक्तव्य म्हणजे देशाचे दुर्दैव आहे, या शब्दांत पृथ्वीराज चव्हाण यांनी टीकास्त्र सोडले. तसेच महाराष्ट्रमध्ये भ्रष्टाचार सरकार कार्यरत आहेत. अधिकारी पैसे देऊन खुर्चीवर बसलेत. भ्रष्टाचार करून हे सरकार सत्तेत आले आहे. श्रीमंत लोकांसाठी वेगळा कायदा सुरु आहे पण जनता आता स्वतः न्याय देईल. हे सरकार जनता उलथावून टाकेल, या शब्दांत पृथ्वीराज चव्हाण यांनी संताप व्यक्त केला.

दरम्यान, महात्मा गांधी हे सूर्य आहेत. ज्यांनी संपूर्ण जगाला अंधाराशी लढण्याची ताकद दिली. जगाला सत्य आणि अहिंसेच्या रूपात एक मार्ग दाखवला, जो दुर्बल माणसालाही अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची हिंमत देतो. त्यांना कोणत्याही ‘शाखा शिक्षित’ प्रमाणपत्राची गरज नाही. शाखांमध्ये ज्यांचा जागतिक दृष्टीकोन बनतो, ते गांधीजींना समजू शकत नाहीत. ते गोडसेला समजतात. ते गोडसेंच्या रस्त्याने चालतात. गांधीजी संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी होते. मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअर, नेल्सन मंडेला, अल्बर्ट आइनस्टाइन या सर्वांनी गांधींपासून प्रेरणा घेतली. हिंदुस्तानातील कोट्यवधी लोक गांधींजींच्या मार्गावर चालतात. अहिंसा आणि सत्याच्या मार्गावर चालतात. लढाई सत्य आणि असत्यामध्ये आहे. हिंसा आणि अहिंसेमध्ये लढाई आहे, असा पलटवार राहुल गांधी यांनी सोशल मिडिया पोस्टमधून केला. 

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणNarendra Modiनरेंद्र मोदीMahatma Gandhiमहात्मा गांधीMahatma Gandhiमहात्मा गांधी