शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

जिल्हा परिषदांमध्ये कॉंग्रेस - राष्ट्रवादी एकत्र येणार

By admin | Updated: February 24, 2017 22:13 IST

राज्यातील २५ जिल्हा परिषदांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करून सत्ता स्थापन करण्यास काँग्रेस पक्ष अनुकूल असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - राज्यातील २५ जिल्हा परिषदांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करून सत्ता स्थापन करण्यास काँग्रेस पक्ष अनुकूल असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेबाबत चर्चा करण्यासाठी शुक्रवारी दुपारी गांधी भवन येथे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, जिल्हा परिषदेत आघाडी करून सत्ता स्थापन करण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेस पक्षाशी संपर्क साधला आहे. २५ पैकी बहुतांश जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून सत्ता स्थापन करतील, असे सूतोवाचही त्यांनी केले.
मुंबई महानगरपालिकेतील त्रिशंकू परिस्थितीबाबत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, शिवसेना-भाजप मित्रपक्ष असून, केंद्रात व राज्यात ते एकत्रितपणे सरकार चालवत आहेत. मुंबई महानगरपालिकेत शिवसेना व भाजपकडे बहुमताइतके संख्याबळ आहे. त्यामुळे मुंबई मनपात शिवसेना-भाजपने मिळून सत्ता स्थापन करायची की नाही, हा निर्णय त्यांनाच घ्यायचा आहे. या संदर्भात काँग्रेसची भूमिका त्रयस्थाची असून, काँग्रेस या परिस्थितीकडे ‘वेट अँड वॉच’नुसार केवळ‘वॉच’ करीत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला अशोक चव्हाणांसह माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, नारायण राणे,विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम,माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात, आ. नसीम खान, खा. हुसेन दलवाई, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे, आ. भाई जगताप, महिला प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा चारुलता टोकस आदी नेते यावेळी उपस्थित होते.