शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
5
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
6
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
7
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
8
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
9
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
10
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
11
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
12
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
13
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
14
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
15
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
16
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
17
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
18
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
19
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
20
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा

शेतकऱ्यांच्या संपाला काँग्रेस-राष्ट्रवादीची फूस- शायना एनसी

By admin | Updated: June 10, 2017 16:00 IST

काँग्रेस-राष्ट्रवादी शेतकऱ्यांना फूस देऊन आंदोलन करायला भाग पाडते आहे, असा आरोप भाजपाच्या प्रवक्त्या शायना एनसी यांनी केला आहे.

ऑनलाइन लोकमत

पिंपरी, दि. 10- शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाजपा सरकारने तोडगा काढूनही शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. त्यांच्या प्रश्नांवर राजकारण खेळण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी शेतकऱ्यांना फूस देऊन आंदोलन करायला भाग पाडते आहे, असा आरोप भाजपाच्या प्रवक्त्या शायना एनसी यांनी केला आहे. शेतकरी,कष्टकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत, अशी भाजपाची भूमिका असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
भाजप सरकारला सत्तेत येऊन तीन वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने भाजपा प्रवक्ते विविध शहरांमध्ये विकासकामांची माहिती देत आहेत. याचाच एक भाग म्हणून पिंपरीत प्रवकत्या शायना एन सी आणि प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाच्या कार्याची महिती दिली. 
शेतकऱ्यांना अनुदान देणं, शेतीमालाला भाववाढ हे तात्पुरते उपाय आहेत. अशीच आश्वासनं आधीच्या सरकारनेसुद्धा दिली होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी भाजपा अडीच वर्षांपासून काम करतं आहे, असंही पत्रकार परिषदे दरम्यान शायना एन सी म्हणाल्या आहेत. 
 
भाजपाच्या काळात शेतकऱ्यांना अच्छेदिन
भाजपाच्या आधी जे पक्ष सत्तेत होते, त्यांनी शेतकऱ्यांना फक्त आश्वासनं दिली. भाजपा सत्तेत येऊन तीन वर्षे झाली. या काळात शेतकऱ्यांच्या  शेतीमालाला योग्य हमी भाव दिल्याचं दिसून येतं आहे. मागील आकडेवारी पाहिल्यास सर्वाधिक तूर भाजपाच्या काळात खरेदी केली. खऱ्या अर्थाने भाजपाच्या काळात शेतकऱ्यांना अच्छे दिन आले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात युरिया खत शेतकऱ्यांना काळ्या बाजाराने घ्यावे लागत होते. महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकारच्या कारकिर्दीत ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा झाला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सरकार चर्चेस तयार आहे. शेतकऱ्यांच्या कृती समितीत शेतकऱ्यांचे नेते म्हणवून घेणारे जे लोक आहेत, त्यांच्यातच मतभेद असल्याने चर्चा होत नाही. ही शोकांतिका आहे. असं भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी नमूद केलं.