शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
3
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
4
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
5
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
6
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
7
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
8
UPI युजर्ससाठी मोठी बातमी! ट्रान्झॅक्शन फेल झालं तर लगेच मिळणार रिफंड; 'या' तारखेपासून लागू होणार नियम
9
पंतचा पराक्रम, एकाच कसोटीत दोन शतकं ठोकताना केले १० विक्रम, अशी आहे संपूर्ण यादी
10
पावसाने पाठ फिरवल्याने विदर्भासह मराठवाड्यात अत्यंत भीषण अवस्था !
11
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'
12
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
13
"म्हाताऱ्याला वेड लागलंय", चाहत्याची कमेंट पाहून भडकले अमिताभ बच्चन, म्हणाले- "तुम्हाला..."
14
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
15
Health Tips: एक लवंग दूर करेल दाताचे, तोंडाचे, पोटाचे विकार; पण जाणून घ्या 'अचूक' वेळ!
16
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
17
धक्कादायक! विठ्ठल दर्शनाचा बोगस टोकन पास घेऊन पंढरपूर मंदिरात ७ जणांचा घुसण्याचा प्रयत्न
18
अरे का, मी पूजेला एकटी बसू शकत नाही? ट्रोल झाल्यावर अमृता खानविलकरने थेट विचारला प्रश्न
19
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
20
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?

शेतकऱ्यांच्या संपाला काँग्रेस-राष्ट्रवादीची फूस- शायना एनसी

By admin | Updated: June 10, 2017 16:00 IST

काँग्रेस-राष्ट्रवादी शेतकऱ्यांना फूस देऊन आंदोलन करायला भाग पाडते आहे, असा आरोप भाजपाच्या प्रवक्त्या शायना एनसी यांनी केला आहे.

ऑनलाइन लोकमत

पिंपरी, दि. 10- शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाजपा सरकारने तोडगा काढूनही शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. त्यांच्या प्रश्नांवर राजकारण खेळण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी शेतकऱ्यांना फूस देऊन आंदोलन करायला भाग पाडते आहे, असा आरोप भाजपाच्या प्रवक्त्या शायना एनसी यांनी केला आहे. शेतकरी,कष्टकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत, अशी भाजपाची भूमिका असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
भाजप सरकारला सत्तेत येऊन तीन वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने भाजपा प्रवक्ते विविध शहरांमध्ये विकासकामांची माहिती देत आहेत. याचाच एक भाग म्हणून पिंपरीत प्रवकत्या शायना एन सी आणि प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाच्या कार्याची महिती दिली. 
शेतकऱ्यांना अनुदान देणं, शेतीमालाला भाववाढ हे तात्पुरते उपाय आहेत. अशीच आश्वासनं आधीच्या सरकारनेसुद्धा दिली होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी भाजपा अडीच वर्षांपासून काम करतं आहे, असंही पत्रकार परिषदे दरम्यान शायना एन सी म्हणाल्या आहेत. 
 
भाजपाच्या काळात शेतकऱ्यांना अच्छेदिन
भाजपाच्या आधी जे पक्ष सत्तेत होते, त्यांनी शेतकऱ्यांना फक्त आश्वासनं दिली. भाजपा सत्तेत येऊन तीन वर्षे झाली. या काळात शेतकऱ्यांच्या  शेतीमालाला योग्य हमी भाव दिल्याचं दिसून येतं आहे. मागील आकडेवारी पाहिल्यास सर्वाधिक तूर भाजपाच्या काळात खरेदी केली. खऱ्या अर्थाने भाजपाच्या काळात शेतकऱ्यांना अच्छे दिन आले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात युरिया खत शेतकऱ्यांना काळ्या बाजाराने घ्यावे लागत होते. महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकारच्या कारकिर्दीत ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा झाला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सरकार चर्चेस तयार आहे. शेतकऱ्यांच्या कृती समितीत शेतकऱ्यांचे नेते म्हणवून घेणारे जे लोक आहेत, त्यांच्यातच मतभेद असल्याने चर्चा होत नाही. ही शोकांतिका आहे. असं भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी नमूद केलं.