शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
2
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
3
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
4
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
5
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
6
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
7
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
8
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
9
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
10
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
11
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
12
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
13
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
14
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
15
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
16
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
17
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
18
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
19
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
20
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!

कॉँग्रेस-राष्ट्रवादीने ओढवून घेतले आव्हान!

By admin | Updated: February 17, 2017 01:03 IST

कोल्हापूर, सांगली, सातारा या दक्षिण महाराष्ट्रातील राजकीय म्हणजे कॉँग्रेस किंवा राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षातील गटा-तटाचे, कुरघोड्यांचे राजकारण

वसंत भोसले कोल्हापूर, सांगली, सातारा या दक्षिण महाराष्ट्रातील राजकीय म्हणजे कॉँग्रेस किंवा राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षातील गटा-तटाचे, कुरघोड्यांचे राजकारण अनेक दशके चालत आले आहे. देश किंवा राज्य पातळीवर कोणत्याही राजकीय प्रवाहाने कॉँग्रेसच्या वर्चस्वाला आजवर आव्हान दिलेले नाही. स्थानिक स्वराज्य संस्था किंवा सहकारी संस्थांच्या पातळीवर कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसची एकहाती सत्ता कायम आहे. सध्या चालू असलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका मात्र त्याला अपवाद ठरू लागल्या आहेत. या दोन्ही मित्र पक्षांच्या वर्चस्वाला आव्हान देण्यात आले आहे, असे म्हणण्यापेक्षा या पक्षांनीच ते ओढवून घेतले आहे. भारतीय जनता पक्ष ही नवी ताकद गावपातळीवरील राजकारणात उदयास येऊ पाहत आहे. यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा संपणार तर आहेच, पण दक्षिण महाराष्ट्र एक नवे राजकीय वळण घेणार आहे. कोल्हापूरची जिल्हा परिषद कायमच कॉँग्रेसच्या ताब्यात आहे. सातारा आणि सांगलीच्या जिल्हा परिषदा त्यांच्या स्थापनेपासून कॉँग्रेसकडे होत्या. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या स्थापनेपासून त्या या पक्षाकडे बहुमतासह आहेत. त्यांच्या वर्चस्वाला आव्हान देण्याइतपत ताकद कोणत्याही राजकीय पक्षात नाही. त्यामुळेच या दोन पक्षांव्यतिरिक्त इतर पक्षांच्या सदस्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजता येण्याजोगी आहे. सातारा आणि सांगली जिल्हा परिषदांच्या इतिहासात भाजपला प्रवेश करता आलेला नाही. मात्र, या निवडणुकीत साताऱ्याचा अपवाद वगळता कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत भाजपने मित्रपक्ष तसेच स्थानिक आघाड्यांच्या सहकार्याने आव्हान उभे केले आहे. याचे एकमेव कारण म्हणजे कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडी केंद्र तसेच राज्यातून सत्तेवरून फेकली गेली असतानाही गटबाजीची ईर्षा करण्याची मस्ती अजूनही करीत आहे. याला कंटाळून दोन्ही कॉँग्रेसचे दुसऱ्या फळीतील असंख्य कार्यकर्ते, नेते भाजपच्या वळचणीला जाऊन बसले आहेत. सांगलीची भाजपची टीम म्हणजे कालची राष्ट्रवादी कॉँग्रेसची फळीच आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यात भाजपची नवी फळी बहुतांश कॉँग्रेसची नेतेमंडळी आहेत. साताऱ्यातही काही प्रमाणात असेच घडले आहे. अशाही परिस्थितीत कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसला राज्यातील स्पर्धक गावा-गावांत आला असतानाही नेत्यांची अंतर्गत भांडणाची हौस काही संपली नाही. परिणामी या तिन्ही जिल्ह्यांतील राजकारण दोन्ही कॉँग्रेसच्या भोवती फिरते, त्याचे तीनतेरा वाजले आहेत. त्याच्या परिणामी, अजितदादा पवार, रामराजे नाईक-निंबाळकर, पृथ्वीराज चव्हाण, डॉ. पतंगराव कदम, जयंत पाटील, प्रतीक पाटील, पी. एन. पाटील, जयवंतराव आवळे, प्रकाश आवाडे, सतेज डी. पाटील, हसन मुश्रीफ, आदींची अप्रतिष्ठाच होणार आहे. एकही पक्ष एकसंघपणे निवडणूक लढवीत नाही. सर्वच जिल्ह्यांत या पक्षांना गटबाजीने पोखरले आहे. याचा लाभ उठवीत भाजपने आव्हान निर्माण करण्याचे अवसान आणले आहे. कोल्हापूरमध्ये जवळपास एकहाती सत्ता कॉँग्रेस पक्षाकडे आहे; पण जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील आणि माजी मंत्री आ. सतेज पाटील यांच्यात संघर्ष आहे. पी. एन. पाटील यांचे जवळचे संबंध भाजपला सक्रिय मदत करणारे माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याशी आहेत. त्यावरून सतेज पाटील यांच्याशी संघर्ष होतो आहे. परिणामी, अनेक तालुक्यांत कॉँग्रेसला उमेदवारही मिळालेले नाहीत. सत्तारूढ पक्षाची ही दयनीय अवस्था केवळ गटबाजीमुळे झाली आहे.