शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

भाजपाच्या विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र, दुरावा झाला कमी, शरद पवारांचा राहुल गांधींना फोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 06:17 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना केलेल्या एका फोनने दुरावा दूर झाला आणि हे पक्ष पुन्हा भाई-भाई म्हणून एका व्यासपीठावर आले. प्रजासत्ताक दिनी मुंबईत झालेल्या ‘संविधान बचाव रॅली’च्या निमित्ताने भाजपाच्या विरोधात विरोधी पक्षांना एकत्र आणण्यात शरद पावर यांनी घेतलेल्या पुढाकारास यश आले.

हरीश गुप्तानवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना केलेल्या एका फोनने दुरावा दूर झाला आणि हे पक्ष पुन्हा भाई-भाई म्हणून एका व्यासपीठावर आले. प्रजासत्ताक दिनी मुंबईत झालेल्या ‘संविधान बचाव रॅली’च्या निमित्ताने भाजपाच्या विरोधात विरोधी पक्षांना एकत्र आणण्यात शरद पावर यांनी घेतलेल्या पुढाकारास यश आले.काँग्रेस पक्षातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले की, शरद पवार यांनी स्वत: राहुल गांधी यांना फोन केल्याने दोन्ही पक्षांमधील दुरावा दूर झाला. देश आणि राज्यघटना वाचविण्यासाठी भाजपाच्या विरोधातएकत्र येण्याची गरज पवार यांनी राहुल गांधींना पटवून दिल्यावर या रॅलीच्या निमित्ताने दोन्ही काँग्रेस इतर विरोधी पक्षांसोबत एका व्यासपीठावर येण्याचा मार्ग मोकळा झाला. पवार यांनी राहुल गांधी यांना फोन केला तेव्हा तेथे हजर असलेल्या काँग्रेसच्या एका वरिष्ठ पदाधिकाºयाने सांगितले की, पवार यांनी असा पुढाकार घेणे विरळाच म्हणावे लागेल.भंडारा-गोंदियाचा तिढानव्याने होत असलेल्या जवळिकीने या दोन पक्षांमधील सर्व प्रश्न सुटतील असे नाही, असे सांगून या सूत्रांनी भंडारा-गोंदिया मतदारसंघात होणाºया लोकसभा पोटनिवडणुकीचा संदर्भ दिला. तेथून निवडून आलेले भाजपा खासदार नाना पटोले काँग्रेसमध्ये गेले आहेत. सन २०१४ मध्ये आघाडी मोडण्याआधी ही जागा राष्ट्रवादीकडे होती. पटोले पुन्हा तेथून पोटनिवडणूक लढविण्याची शक्यता नाही. त्यामुळे दोन्ही काँग्रेस एकत्र आल्यास ही जागा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्यात जाऊ शकेल.पवार यांचे म्हणणे पटल्यावर राहुल गांधी यांनी लगेच सांप्रदायिक शक्तींना रोखण्यासाठी आपला पक्ष नेहमीच पाठिंबा देईल, असे सांगून टाकले. एवढेच नव्हे तर ‘संविधान बचाव रॅली’मध्ये एकदिलाने सहभागी होण्याचे निर्देशही महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना दिले.यानुसार सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण व सध्या प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष असलेले अशोक चव्हाण असे राज्याचे तिन्ही माजी काँग्रेस मुख्यमंत्री या रॅलीमध्ये सहभागी झाले.या वृत्ताला दुजोरा देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, या रॅलीच्या निमित्ताने सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे, असे पवार यांचे प्रयत्न होते व त्याच संदर्भात त्यांनी राहुल गांधींनाही फोन केला.संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारच्या विरोधात विरोधकांची एकत्रित रणनीती ठरविण्यात राहुल गांधी जो काही पुढाकार घेतील त्यास साथ देण्याचे पवार यांनी ठरविले असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस