शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

कॉँग्रेसच्या बैठकीत स्थानिक नेत्यांची खरडपट्टी- अपुरी तयारी

By admin | Updated: January 28, 2017 21:23 IST

महापालिका निवडणुकीसाठी कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील आघाडीची बैठक जितेंद्र आव्हाड यांच्या सोलापूर दौऱ्यामुळे होऊ शकलेली नाही.

नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील आघाडीची बैठक जितेंद्र आव्हाड यांच्या सोलापूर दौऱ्यामुळे होऊ शकलेली नाही. ती आता रविवारी (दि.२९) ठाणे येथे होणार आहे. तथापि, काँग्रेस अंतर्गतच गोंधळाचे वातावरण असून, आधी पूर्वतयारी न करताच कोणत्याही जागांवर दावे ठोकण्याच्या प्रकारावरून श्रेष्ठींनी शुक्रवारी मुंबईत चांगलीच खरडपट्टी काढल्याचे वृत्त आहे.नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेने कंबर कसली असून, त्या तुलनेत कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीची अवस्था फारशी चांगली आहे. त्यामुळे आघाडीशिवाय पर्याय नाही अशा स्थितीत काँग्रेसकडून राष्ट्रवादीकडे मागणी करण्यासाठी ज्या प्रभागांविषयी शुक्रवारी मुंबईत चर्चा झाली, त्यात काही ठिकाणी कॉँग्रेसकडे सक्षम उमेदवार नाही त्यामुळे अशा ठिकाणी कशाला जागा मागतात? असा प्रश्न करण्यात आला. विशेष म्हणजे दोन प्रभागांत कॉँग्रेसचा एक किंवा दोन उमेदवार आणि पुन्हा तडजोड करण्यासाठी मनसे तसेच अपक्षांशी युती करण्याचा प्रस्ताव असल्याने त्याविषयीदेखील श्रेष्ठींनी नाराजी व्यक्त केली. कुठे मनसेची आघाडी, तर कुठे अपक्षांबरोबर आघाडी हा काय प्रकार आहे. प्रत्येक प्रभागानिहाय वेगवेगळ्या पक्षांशी आघाडी करायची काय? असा प्रश्न करण्यात आल्याचे समजते. महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचे श्रेष्ठी मेहनत घेत असताना स्थानिक पातळीवर कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी व्यवस्थित झालेली नसल्याने प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे समजते. कॉँग्रेस पक्षाची ज्याला साथ हवी त्यांनी थेट कॉँग्रेस पक्षात प्रवेश करावा आणि पक्षचिन्हावर निवडणूक लढवावी, असेही मत त्यांनी व्यक्त केल्याचे सांगण्यात आले. त्यातच निष्ठावानांच्या गटातूनही अगोदरच उमेदवारीसाठी व्यूहरचना सुरू असल्याने त्याचे बैठकीत पडसाद उमटल्याचे समजते. प्रभाग १३ मधील सेवादल कार्यकर्त्या महिलेस उमेदवारी मिळावी म्हणून सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष मदन दायमा यांनी आग्रह धरला. तेथे अगोदरच कॉँग्रेस, मनसे आणि अपक्ष युतीचा प्रस्ताव होता. त्यामुळे श्रेष्ठींनी त्याविषयीही विचारणा करण्यात केल्याचे कळते.