शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

काँग्रेस विधिमंडळाची बैठक दिवाळीनंतर - पृथ्वीराज चव्हाण

By admin | Updated: October 24, 2014 03:54 IST

काँग्रेसच्या निराशाजनक कामगिरीचा आढावा घेण्यासाठी पक्षाच्या विधिमंडळ सदस्यांची बैठक दीपावलीनंतर घेण्याचे ठरले आहे़

कराड : काँग्रेसच्या निराशाजनक कामगिरीचा आढावा घेण्यासाठी पक्षाच्या विधिमंडळ सदस्यांची बैठक दीपावलीनंतर घेण्याचे ठरले आहे़ ही बैठक सोमवारी किंवा मंगळवारी होईल़, अशी माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली़राज्यातील प्रमुख काँग्रेस नेत्यांची प्राथमिक बैठक झाली असून, या बैठकीत अजित पवार यांनी काँग्रेस नेत्यांच्या फोनबाबत केलेल्या वक्तव्याबाबत चर्चा झाली़ त्या वेळी विधिमंडळ पक्षाची बैठक दीपावलीनंतर बोलावण्याचे ठरले आहे. राज्यात अजूनही अस्थिर परिस्थिती आहे. सरकार कसे बनणार, यावर बरेच काही अवलंबून आहे़ काँग्रेसने मात्र सकारात्मक भूमिका घेतली आहे़ कोलकात्याच्या एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीनंतर काही ‘आॅफ रेकॉर्ड’ चर्चा झाली होती़ ती चर्चाही प्रसिद्ध करण्यात आली़ वास्तविक संबंधितांचे महाराष्ट्राच्या राजकारणाचे ज्ञान कमी पडले असावे़ त्यामुळे त्यांनी ही मुलाखत वेगळ्या पद्धतीने प्रसिद्ध केली़ त्यातही मी न बोललेले मुद्दे आहेत़ या मुलाखतीनंतर आपण दिलगिरीही व्यक्त केली़ मात्र, माझ्या सहकाऱ्यांना त्याचा त्रास झाला. मला जर कोणाविषयी बोलायचेच असते, तर मी कोलकात्याच्या दैनिकाला मुलाखत दिली नसती़ महाराष्ट्रातील प्रमुख वृत्तपत्रांना दिली असती, असे स्पष्टीकरणही चव्हाण यांनी दिले. मुख्यमंत्रिपदाच्या कालावधीत कऱ्हाडच्या विकासासाठी निधी आणला़ आता नव्या सरकारच्या माध्यमातून व बाहेरूनही निधी आणून कऱ्हाडच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. चव्हाण म्हणाले, कऱ्हाड दक्षिणची निवडणूक ऐतिहासिक झाली़ मला दिल्लीला जाण्यात कोणताही रस नसून, कऱ्हाड व मुंबई हे आपले कार्यक्षेत्र असणार आहे़ कऱ्हाड शहरासह ग्रामीण भागात आपल्याला चांगले मतदान झाले़, त्यामुळे विजय शक्य झाला़ कऱ्हाडशी नियमित संपर्क ठेवणार असून, पाडव्यापसून संपर्क मोहीम सुरू करणार आहे. (प्रतिनिधी)