शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

काँग्रेस नेत्यांमुळे आघाडी अडचणीत

By admin | Updated: May 4, 2017 05:51 IST

भिवंडीच्या राजकारणात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष असला, तरी त्यांच्या स्थानिक नेत्यांनी जागावाटपात निम्म्यापेक्षा जास्त जागांवर

भिवंडी : भिवंडीच्या राजकारणात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष असला, तरी त्यांच्या स्थानिक नेत्यांनी जागावाटपात निम्म्यापेक्षा जास्त जागांवर दावा केल्याने समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी आहे. काँग्रेस नेत्यांच्या हट्टामुळे आघाडीच्या चर्चेत खोडा घातला गेला असून दोन दिवसांत त्यांनी धोरण न बदललल्यास समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेस नेत्यांच्या या हट्टामुळे भाजपाचा फायदा होणार असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.भिवंडी पालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस शनिवारी आहे. त्यामुळे भाजपाने कोणार्क आघाडीशी समझोता करत बेरजेच्या राजकारणात पुढचे पाऊल टाकले आहे. शिवसेना स्वतंत्र लढणार हे आधीपासूनच स्पष्ट होते. त्यामुळे तिसरा मोठा पर्याय देण्यासाठी काँग्रेस, समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील, असे जाहीर करणत आले होते. समाजवादी पक्ष, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तसे जाहीर केल्यानतंरही काँग्रेसने त्याबाबत अद्याप भूमिका जाहीर केलेली नाही. वरिष्ठ नेत्यांकडून आघाडीचा निर्णय घेतला जाणार असला, तरी स्थानिक नेते त्याला अनुकूल नाहीत. त्यामुळेच काँग्रेस शहराध्यक्षांमुळे आघाडी अडचणीत आल्याची थेट चर्चा सुरू झाली आहे.चार वॉर्डांचा एक प्रभाग होणार असल्याने पक्षीय पातळीवर निवडणूक लढल्यास ते सोपे जाणार आहे. बहुतांश प्रभागात ६० टक्के मुस्लिम तर ४० टक्के हिंदू लोकसंख्या आहे. उरलेल्या प्रभागांत याउलट चित्र आहे. त्यांचा विचार करून उमेदवारी द्यावी लागणार आहे. काँग्रेसने मित्र पक्षांसाठी जागा सोडताना आपल्याला सोईचे नसलेले प्रभाग त्यांच्या वाट्याला देण्याचा प्रस्ताव मांडल्याने हे दोन्ही पक्ष नाराज झाले आहेत. काँग्रेसचे नेते फारसा प्रतिसाद देत नसल्याने समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रत लढतील. त्याची घोषणा गुरूवारपर्यंत होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)काँग्रेसकडून तिकिटांची खरेदीविक्री : खालीद गुड्डूज्या वॉर्डात मी स्वत: निवडून आलो आहे. तसेच जेथे सध्या राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत किंवा समाजवादी पक्षाचे नगरसेवक आहेत, त्यावरही काँग्रेस दावा करते आहे. काँग्रेसचे गेल्यावेळी २७ नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे तीस जागांची मागणी केली, तर ती न्यायाला धरून आहे. मात्र त्यांनी तिकीटाची खरेदी-विक्री सुरू केल्याने ही आघाडी करण्याची त्यांची इच्छा नाही, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष खालीद गुड्डू यांनी केला. या बाबत आणि आघाडीबाबतची भूमिका समजून घेण्यासाठी काँग्रेसचे शहराध्यक्ष शोएब खान गुड्डू यांच्याशी संपर्क साधला, पण तो होऊ शकला नाही.काँग्रेस उद्या करणार एबी फॉर्मवाटपठाणे : महापालिका निवडणुकीत दगाफटका होऊ नये, यासाठी काँग्रेसने सावध पाऊल टाकत. उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक दिवस आदी (५ मे रोजी) उमेदवारांना एबी फॉर्म वाटण्याचा निर्णय घेतला आहे. लगेचच दुसऱ्या दिवशी उमेदवारी यादी जाहीर केली जाणार आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत जवळपास ७० टक्के उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आल्याची माहिती काँग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली. या बैठकीत आघाडी केल्यास होणारा फायदा आणि आघाडी न करता लढल्यास होणारा लाभ या दोन्हीवर चर्चा झाली.भिवंडीत आघाडी न करता स्वतंत्र लढावे अशी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची भूमिका आहे. तसेच काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर इतर पक्षातील इच्छुक निवडणूक लढविण्यास तयार आहेत. त्यामुळा काँग्रेसला आघाडीत मोठा वाटा हवा आहे. भिवंडीत उमेदवारी देताना, इच्छुक उमेदवारांची शैक्षणिक पात्रता आणि त्या उमेदवाराची लोकप्रियता या गोष्टीही पक्षाने डोळ्यासमोर ठेवल्या आहेत. (प्रतिनिधी)काँग्रेसने आघाडीत घातला खोडा : नोमानी ही आघाडी व्हावी, असे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या, शहराध्यक्षांच्या मनात नाही. काँग्रेसने इच्छा दाखवली नाही, तरी समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी करतीलच. मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेला कमजोर करीत भाजपा शहरात वर्चस्व निर्माण करीत असताना सेक्युलर मतांचे विभाजन होऊ नये, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. इच्छुक उमेदवारांना काँग्रेस शहराध्यक्षाने दिलेल्या आश्वासनामुळे आघाडीत खोडा घातला गेला आहे, असे समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष अब्दुस्सलाम नोमानी यांनी सांगितले.