शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

काँग्रेसवर वैयक्तिक मालकी नाही, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2022 18:47 IST

डिसेंबरमध्ये आम्ही सोनिया गांधींसोबत ५ तास चर्चा केली. त्यात चिंतन शिबीर, निवडणुका घेण्याचं मान्य केले. परंतु त्यालाही बराच वेळ झाला. केरळ, आसाम, यूपी, पंजाबच्या निवडणुकीत पराभव झाला. पंजाबचा मुख्यमंत्री बदलण्याचा निर्णय कुणी घेतला? असा सवालही चव्हाणांनी उपस्थित केला.

मुंबई - काँग्रेस पक्ष वैयक्तिक मालकीचा नाही. निवडणूक आयोगाकडे घटनेची नोंद आहे. गांधी कुटुंबाने दिले. त्यात समाधान मानले पाहिजे. ही मुघल सलतन आहे का? लोकशाहीपद्धतीने नेमणुका होत नाही याचा गांभीर्याने विचार करणार आहोत का? सोनिया गांधी होत्या विजय मिळत गेला. आमची चूक झाली याआधी आम्ही हे बोलायला हवं होतं. निवडणूक घेऊन जे निवडून येईल ते मान्य केले पाहिजे. एकाच कुटुंबातील जास्त नको. मग राहुल गांधी कोणत्या कुटुंबातील आहेत. काँग्रेस पक्षाला वाचवायचं असेल निवडणूक घ्यायला हवी अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. 

गुलाब नबी आझाद यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर आता विविध प्रतिक्रिया येऊ लागल्यात. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की,  गुलाब नबी आझाद यांच्या राजीनाम्याचं दु:ख आहे. अनेक वर्ष ते काँग्रेससोबत होते. पक्ष संघटनेत त्यांनी अनेक वर्ष काम केले आहे. या नेत्याला पक्ष सोडून जावं लागतं तेव्हा वाईट वाटतं. कोविड काळात काँग्रेस अध्यक्षांशी आमची भेट होत नव्हती. आम्ही गोपनीय पत्र सोनिया गांधींना लिहिलं. दुर्दैवाने हे पत्र माध्यमांमध्ये लिक झाले. मोदी-शाह यांच्याविरोधात लढण्यासाठी काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष हवा अशी मागणी आम्ही केली होती. राहुल गांधी तयार असतील तर ठीक अन्यथा निवडणुका घेऊन अध्यक्षांची नेमणूक करावी असं आम्ही म्हटलं होते. काँग्रेसच्या पराभवाची कारणे काय याचं आत्मचिंतन करण्याची मागणी होती. काँग्रेसच्या संविधानात्मक रचनेनुसार पक्षांतर्गत निवडणूक होणे गरजेचे आहे. ते झाले नाही असं चव्हाणांनी म्हटलं. 

डिसेंबरमध्ये आम्ही सोनिया गांधींसोबत ५ तास चर्चा केली. त्यात चिंतन शिबीर, निवडणुका घेण्याचं मान्य केले. परंतु त्यालाही बराच वेळ झाला. केरळ, आसाम, यूपी, पंजाबच्या निवडणुकीत पराभव झाला. पंजाबचा मुख्यमंत्री बदलण्याचा निर्णय कुणी घेतला? चिंतन नको, नवसंकल्प शिबीर घेतले. राहुल गांधी अध्यक्ष असतील तर काय हरकत नाही. परंतु ते निवडणुकीतून समोर यावं. जी-२३ लोकांनी जे पत्र दिले ते गोपनीय पत्र लीक झाले. त्यानंतर राजकारण सुरू झाले. आमची बंडखोरी करण्याचा विषय नव्हता. त्यानंतर ज्येष्ठ नेत्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू झाला असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणRahul Gandhiराहुल गांधी