शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
3
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
4
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
5
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
6
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
7
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
8
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
9
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
10
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
11
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
12
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
13
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
14
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
15
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
16
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
17
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
18
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
19
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
20
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?

राष्ट्रवादीसाठीचा खड्डा काँग्रेसला भारी ठरला

By admin | Updated: October 20, 2014 05:22 IST

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीला कायम पाण्यात पाहिले. त्यांना अडचणीत आणण्याची संधी त्यांनी सोडली नाही.

अतुल कुलकर्णी, मुंबई माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीला कायम पाण्यात पाहिले. त्यांना अडचणीत आणण्याची संधी त्यांनी सोडली नाही. याच राष्ट्रवादीला संपविण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात तेच पडले आणि स्वत:च्या पक्षालाही त्यात लोटून दिले. त्यांच्या या व्यक्तिगत भांडणाची जबर किंमत काँग्रेसला मोजावी लागली आहे. सगळे निर्णय स्वत:च घ्यायचे, स्वत:शिवाय कोणालाही मोठे होऊ द्यायचे नाही आणि येणाऱ्याकडे संशयाने पाहत दुसऱ्याला पाण्यात पाहण्याचे राजकारण करण्याची त्यांची वृत्ती महाराष्ट्रात काँग्रेसला हानिकारक ठरली. शिवाय निर्णय न घेण्याच्या त्यांच्या स्वभावाचे मोठे दूरगामी आर्थिक परिणाम महाराष्ट्रावर होतील ते वेगळेच. जलसिंचनावर श्वेतपत्रिका काढण्याची भूमिका घेत त्यांनी राष्ट्रवादीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. त्यामुळे राज्यभर संशयाचे वातावरण गडद झाले. कोणत्याही प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाल्याशिवाय काम करायचे नाही असे आदेश काढले. पर्यायाने आधीच बदनाम अधिकाऱ्यांनीदेखील हात वरती करत जे काय निर्णय घ्यायचे ते मंत्रिमंडळाने घ्यावेत अशी भूमिका घेतली. परिणामी राज्यात तीन वर्षांत जलसिंचनाची कामेच ठप्प झाली. प्रत्येक निर्णयाच्या बाबतीत हेच घडले. वरळी ते हाजीअली सी-लिंकऐवजी कोस्टल रोड कमी खर्चाचा अशी भूमिका चव्हाणांनी घेतली. मात्र ना कोस्टल रोड केला ना सी-लिंक केला. पर्यायाने याही प्रकल्पाची किंमत हजारो कोटींनी वाढून गेली. चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या दोन-तीन वर्षे पूर्ण होण्याच्या आत केल्या गेल्या मात्र आघाडी सरकार स्थापन करण्याच्या आधीपासून वीज खात्यात काम करणारे अजय मेहता सरकार गेले तरीही अजून त्याच जागेवर आहेत.दुसऱ्या पक्षातीलच नाही, तर स्वपक्षातील सहकारी नेतेदेखील कसे अडचणीत येतील अशाच भूमिका त्यांनी कायम घेतल्या. मतदान काही तासांवर आलेले असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी स्व. विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे आणि अशोक चव्हाण या माजी मुख्यमंत्र्यांवर आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ज्या पद्धतीने आक्षेप घेतले तो कळसाध्याय होता.जाता जाता त्यांनी बिल्डरांच्या सोयीचे अनेक निर्णय घेतले. राष्ट्रपतींनी सही करूनही हाउसिंग रेग्यूलेटर बिल्डरांच्या दबावामुळे चव्हाणांनी लागू केले नाही. सिडको विमानतळ केंद्रात काँग्रेसचे सरकार असतानाही त्यांना मार्गी लावता आले नाही. एकही मोठा उद्योग यावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले नाहीत. उलट उद्योगमंत्री नारायण राणे यांनी उद्योगधोरण तयार केले तेदेखील वर्षभर पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडेच पडून राहिले. या सगळ्याचा परिपाक आघाडी तुटण्यात झाला. त्यानंतरही पक्षाने ज्यांना तिकिटे दिली त्यांच्यासाठी जी मदत लागते तीदेखील देण्यात पुढाकार घेतला नाही. पक्षाच्या जाहिरातीदेखील त्यांनी स्वत:भोवतीच ठेवल्या. स्वत:ची स्वच्छ प्रतिमा निर्माण करण्याच्या नादात त्यांनी चांगले काम करणाऱ्या सहकारी मंत्र्यांच्या कामांच्या जाहिराती कधी केल्या नाहीत. या सगळ्या प्रकारामुळे नारायण राणे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, सुशीलकुमार शिंदे यांनी आपापल्या मतदारसंघातच स्वत:ला मर्यादित करून घेतले. माणिकराव ठाकरे यांना तर पुत्रप्रेमापुढे राज्यातील २८७ मतदारसंघ परके झाले. या सगळ्यात अनेक चांगले निर्णय घेणारे मंत्री, सरकारसोबत असतानाही काँग्रेसचा दारुण पराभव झाला. याचे विश्लेषण आता अनेक दिवस चालेलही... हाती काहीच उरलेले नाही.