शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
3
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
4
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
5
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
6
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
7
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
8
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
9
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
10
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!
11
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
12
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
13
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
14
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
15
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
16
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
17
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
18
MSRTC: ...तरच जेष्ठ नागरिकांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, नियमात बदल!
19
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
20
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक

आघाडीचा चेंडू आता काँग्रेसच्या कोर्टात!

By admin | Updated: January 28, 2017 01:08 IST

पुढील कोणत्याही निवडणुकांमध्ये भाजपासोबत जायचे नाही, असे शिवसेनेने ठरविल्यानंतर, तरी या संधीचा फायदा घेण्यासाठी दोन्ही कॉँग्रेस एकत्र येणार की,

अतुल कुलकर्णी / मुंबईपुढील कोणत्याही निवडणुकांमध्ये भाजपासोबत जायचे नाही, असे शिवसेनेने ठरविल्यानंतर, तरी या संधीचा फायदा घेण्यासाठी दोन्ही कॉँग्रेस एकत्र येणार की, व्यक्तिगत दुराग्रहापायी जिल्हा परिषद, महापालिकांवरही पाणी सोडणार, असा प्रश्न काँग्रेस कार्यकर्ते विचारत आहेत. कोणत्याही स्थितीत भाजपा सेनेसोबत जाणार नाही, असे राष्ट्रवादीने जाहीर करून आघाडीचा चेंडू काँग्रेसच्या कोर्टात टाकला आहे.युती तुटल्याचे समजताच, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रतिक्रिया बोलकी होती. ‘ज्यांनी आत्तापर्यंत एकत्र काम केले, त्यांची युती तुटल्याचे वाचून अतीव दु:ख झाले,’ असे पवारांनी सांगितले, पण ते सांगताना, त्यांनी चेहऱ्यावरचे हास्य लपवले नाही. शिवसेनेने पाठिंबा काढून घेतला, तर तुम्ही सरकारला पाठिंबा देणार का? असे काहींनी विचारले, तेव्हा पवारांनी जर तरच्या प्रश्नांना आपण उत्तर देत नाही, असे सांगून टाकले.गेल्या काही दिवसांमधली पवारांची विधाने आणि घटनाक्रम पाहिला, तर राजकीय वाऱ्याची दिशा त्यांना सगळ््यात आधी समजली होती, हे स्पष्ट होते. एकीकडे युतीच्या बैठकांचे गोडवे गायले जात असताना दोन्ही काँग्रेसनी एकत्र आले पाहिजे, असे विधान सगळ््यात आधी पवारांनी केले होते. त्यानंतर, अजित पवारांनी नांदेडला बंद दाराआड प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा केली, तर मुंबईत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी राज्यात कोठेही भाजपा शिवसेनेसोबत युती करणार नाही, जर कोणी केली, तर त्यांचे एबी फॉर्मसुद्धा पक्ष रद्द करेल, अशी स्पष्ट भूमिका जाहीर केली.राष्ट्रवादी भाजपासोबत हातमिळवणी करेल, असे पृथ्वीराज चव्हाण बोलत असताना, या घटना-घडामोडी घडल्या आहेत, हे विशेष. युती तुटल्याची घोषणा झाल्यानंतर, गुरुवारी आणि शुक्रवारी दोन्ही दिवस खा. अशोक चव्हाण यांच्याशी मी स्वत: बोललो, असे सांगून तटकरे म्हणाले, आघाडी करण्याच्या बाजूने आम्ही असलो, तरी आता काँग्रेसने घाई करण्याची गरज आहे. राष्ट्रवादीने आघाडीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली असली, तरी काँग्रेस मात्र, यावर मौन बाळगून असल्याचे चित्र उभे करण्यातही राष्ट्रवादी यशस्वी झाली आहे. दुसरीकडे विधानसभेनंतर पहिल्यांदा भाजपा सेना एकमेकांसमोर दंड थोपटून उभी असताना, त्याचा फायदा घेण्यासाठी दोन्ही काँग्रेसना एवढी चांगली संधी पुन्हा मिळणार नाही. दोघांच्या भांडणात जर का जिल्हा परिषदाही दोन्ही काँग्रेसच्या हातून गेल्या, तर दोघांचाही राजकीय पायाच ठिसूळ होईल, याचे भान दोन्ही कॉँग्रेसच्या नेत्यांनी वेळीच बाळगण्याची गरज असल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने बोलून दाखवले.