अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवडणूक : राकाँ एक, जनसंग्राम दोन, प्रहार एक तर अपक्षांचा दोन पालिकांवर झेंडाअमरावती/वर्धा : जिल्ह्यातील चिखलदरा वगळता दहापैकी नऊ नगरपालिकांमध्ये नगराध्यक्षपदासाठी मंगळवार दि. २२ जुलै रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली. दोन ठिकाणी नगराध्यक्ष निवडणुकीवर स्थगानादेश असून चार नगराध्यक्षांची यापूर्वीच अविरोध निवड झाली आहे. उर्वरित तीन म्हणजे अंजनगाव सुर्जी, चांदूररेल्वे व शेंदुरजनाघाट पालिकेत आज नगराध्यक्षपदासाठी हात उंचावून मतदान घेण्यात आले. तर वर्धा जिल्ह्यात सहा पालिकांच्या निवडणुकीत भाजप व काँग्रेसचा प्रत्येकी दोन पालिकांवर झेंडा फडकला, तर राष्ट्रवादी काँग्रेसला एका पालिकेवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादीला जबर हादरा देत हिंगणघाट पालिकेवर अपक्षांनी बाजी मारली.नवनिर्वाचित नगराध्यक्ष व उपाध्यक्षांमध्ये चांदूर रेल्वे-अंजली अग्रवाल(काँग्रेस),उपाध्यक्ष श्रुतिका आठवले (राष्ट्रवादी), शेंदुरजनाघाट-सरिता खेरडे (विदर्भ जनसंग्राम), उपाध्यक्ष देवानंद झोगेकर (काँग्रेस), अंजनगाव सुर्जी-हनिफाबी मो. शरीफ (काँग्रेस), उपाध्यक्ष देविदास नेमाडे (काँग्रेस), चांदूरबाजार-शुुभांगी देसमुख (प्रहार), उपाध्यक्ष मुजफ्फर हुसैन (प्रहार), वरूड - रवींद्र थोरात (विदर्भ जनसंग्राम), उपाध्यक्ष लिलाधर बेलसरे (शिवसेना), अचलपूर-रंगलाल नंदवंशी (अपक्ष,) उपाध्यक्ष मो. गनी शेख रूस्तम (अपक्ष), धामणगाव रेल्वे - अर्चना राऊत (भाजप), उपाध्यक्ष हेमकरण कांकरिया (भाजप)यांचा समावेश आहे. दर्यापूर पालिकेच्या उपाध्यक्षपदी शहादत खाँ पठाण (काँग्रेस) व मोर्शी पालिकेच्या उपाध्यक्षपदी महादेव वाघमारे (विदर्भ जनसंग्राम) यांची निवड करण्यात आली.चिखलदरा येथील नगराध्यक्ष-उपाध्यक्षांचा कार्यकाळ संपायला अवधी असल्याने याठिकाणी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला नाही. दर्यापूर व मोर्शी येथे नगराध्यक्ष निवडीवर न्यायालयाचा स्थगनादेश असल्याने याठिकाणी केवळ उपाध्यक्षांचीच निवड करण्यात आली. चांदूरबाजार, वरूड, अचलपूर व धामणगाव येथे यापूर्वीच नगराध्यक्षांची अविरोध निवड झाली आहे. वर्धा जिल्ह्यात देवळीत खासदार रामदास तडस यांच्या अर्धांगिनी भाजपाच्या शोभा तडस व उपाध्यक्षपदी विजय गोमासे यांची अविरोध निवड झाली. वर्धा पालिकेत आधीच भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, बसपा आणि अपक्षांची सत्ता होती. यंदा नगराध्यक्षपद राकाँच्या वाट्याला आले. यात राकाँच्या त्रिवेणी कुत्तरमारे यांनी ३९ पैकी २० मते घेत काँग्रेसच्या वर्षा खैरकार यांचा पराभव केला. काँग्रेसच्या १३ पैकी नऊ सदस्यांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याने खैरकार यांना केवळ चार मतेच मिळाली. बहिष्कारात काँग्रेसच्या उमेदवार योगिता बागडे यांचाही समावेश होता. त्यांना शून्य मते मिळाली, तर अपक्ष सदस्य इकबाल शेख यांना निवडणुकीवर बंदी घालण्यात आली होती. उपाध्यक्षपदासाठी भाजपाचे कमल कुलधरीया, काँग्रेसचे शरद आडे आणि बसपाच्या शेख शबनम निवडणूक रिंगणात होते. कुलधरिया यांनी २१ मते घेऊन विजय संपादन केला. हिंगणघाट पालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसला जबर हादरा देत अपक्षांनी बाजी मारली. अपक्ष उमेदवार पंढरीनाथ कापसे यांनी ३३ पैकी १८ मते घेत राकाँचे उमेदवार अॅड. सुधीर कोठारी यांचा पराभव केला. अॅड. कोठारी यांना केवळ १४ मते मिळाली. राष्ट्रवादीच्या सहा सदस्यांनी अॅड. कोठारी यांना राकाँला घरचा अहेर देत अपक्षांशी हातमिळवणी केली. उपाध्यक्षपदही अपक्षांनीच बळकावले. अपक्ष उमेदवार निलेश ठोंबरे यांनी १८ मते घेत काँग्रेसचे बलराज अवचट यांचा पराभव केला. अवचट यांना १४ मते मिळाली.आर्वीत भाजप आणि काँग्रेसमध्ये झालेल्या सरळ लढतीत भाजपाच्या मयुरेश पुरोहित यांनी २३ पैकी १४ मते घेत काँग्रेसच्या वनमाला निखाडे यांचा पराभव केला. निखाडे यांना केवळ नऊ मते मिळाली. उपाध्यक्षपदी भाजपाचे अशोक जिरापुरे निवडून आले. त्यांनी काँग्रेसच्या प्रेमराज पालिवाल यांचा पराभव केला. जिरापुरे यांना १४ तर पालिवाल यांना नऊ मते मिळाली.पुलगावात काँग्रेसने निर्विवाद यश संपादन केले. काँग्रेसचे मनीष साहू यांनी १९ पैकी १४ मते घेत भाजपाच्या रंजना कडू यांचा पराभव केला. कडू यांना केवळ पाच मते मिळाली. उपाध्यक्षपदीही कॉग्रेसच्या कांचन कोटांगळे यांची वर्णी लागली. त्यांनी भाजपाच्या सोनाली गोदणे यांचा पराभव केला. कोटांगळे १४ तर गोदणे यांना पाच मते मिळाली.सिंदी (रेल्वे) पालिकेवर काँग्रेसने अपक्षाच्या मदतीने सत्ता हस्तगत केली. काँग्रेसच्या सुनीता कलोडे यांनी ९ मते घेत भाजप व राकाँ युतीच्या जिजा तळवेकर यांचा पराभव केला. तळवेकर यांना सात मतेच मिळाली. भाजपाचे एक सदस्य तटस्थ होते, तर उपाध्यक्षपदी अपक्ष उमेदवार अशोक कलोडे हे अविरोध निवडून आले. (प्रतिनिधी)
काँग्रेस चार तर भाजपाचे तीन नगराध्यक्ष
By admin | Updated: July 23, 2014 00:50 IST