शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: “पहाटेचा शपथविधी जर शरद पवारांना विचारुन झाला असता तर मग ते सरकार पडलेच नसते”

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 17:47 IST

Maharashtra News: भाजपकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी टीका करण्यात आली आहे.

Maharashtra Politics: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा गौप्यस्फोट केल्यानंतर यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवार यांच्याशी चर्चा झाली होती, असा मोठा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. यानंतर महाविकास आघाडीचे नेत्यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. यातच आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही यावर भाष्य केले आहे. 

मीडियाशी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, पहाटेचा शपथविधी शरद पवार यांना विचारून झालेला नव्हता असे माझे मत आहे. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणेज ते शरद पवार आहेत. पहाटेचा शपथविधी शरद पवार यांना विचारून झाला असता तर ते सरकार पडलेच नसते. पहाटेचा शपथविधी शरद पवार यांना विचारून झालेला नाही, या मताचा मी आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्टपणे सांगितले.

विकासाच्या मुद्द्याकडे लक्ष केंद्रीत करण्याऐवजी वेगळे वाद निर्माण करायचे

काहीतरी वाद निर्माण करण्याचे काम केले जात आहे. त्यांच्याकडे बोलण्यासाठी दुसरे काहीही नाही. विकासाच्या मुद्द्याकडे लक्ष केंद्रीत करण्याऐवजी वेगळे वाद निर्माण करायचे, हे भाजपच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. भाजपकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी टीका थोरात यांनी केली. 

दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे सहा महत्त्वाच्या पदांची जबाबदारी आहे. अर्थमंत्रीपदही त्यांच्याकडे आहे, त्यामुळे अर्थसंकल्पाची जबाबदारीही त्यांच्याकडे आहे. असे असूनही कंड्या पिकवायला त्यांना वेळ कसा मिळतो? असा खोचक सवाल करत, उपमुख्यमंत्रीपद असणे आणि सहा-सहा खाती सांभाळणे, हे खूप जबाबदारीचे काम आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवार