शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

काँग्रेसने नारायण राणेंना बारा वर्ष सडवले, आता भाजपवाले कुजवून कुजवून मारतील - सुभाष देसाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2017 18:31 IST

काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन स्वत:चा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष काढणा-या नारायण राणेंवर शिवसेनेचे नेते आणि मंत्री सुभाष देसाई यांनी सडकून टीका केली.

रत्नागिरी - काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन स्वत:चा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष काढणा-या नारायण राणेंवर शिवसेनेचे नेते आणि मंत्री सुभाष देसाई यांनी सडकून टीका केली. जो पक्ष सत्तेत असेल त्यांच्यासमोर नारायण राणे लोटांगण घालतात. आता कुठे गेला तुमचा स्वाभिमान ? असा सवाल त्यांनी राणेंना विचारला.  काँग्रेसने नारायण राणेंना बारा वर्ष सडवले, आता भाजपवाले कुजवून कुजवून मारतील अशी आगपाखड देसाई यांनी केली. 

दरम्यान नारायण राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभागी होणार आहे. नारायण राणेंनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. नारायण राणे यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर १ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केला. रायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची घोषणा केल्यापासून त्यांचा पक्ष एनडीएमध्ये दाखल होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. 

राणेंनी आपला पक्ष एनडीएमध्ये सहभागी होत असल्याची घोषणा केली. त्यावेळी आमदार नितेश राणेंसह अनेक आमदार आपल्या पक्षात येतील, असा दावा केला. मात्र मंत्रिपदाबाबत विचारले असता, आपल्या मंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच अंतिम निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले. त्याबरोबरच ग्रामपंचायत निवडणुकींत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे 29 सरपंच बिनविरोध निवडून आल्याचा त्यांनी आवर्जुन उल्लेख केला.

नीतेश राणेंसह अन्य आमदारही सामिल होतीलआपण एनडीएला पाठिंबा दिला असून आता आपल्या मंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री आणि भाजप पक्षश्रेष्ठी योग्य निर्णय घेतील. असे राणे यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच स्वाभिमान पक्षात आमदार नीतेश राणेंसह राज्यातील अनेक आमदार सामिल होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

स्वाभिमानचे २९ सरपंच बिनविरोधआपण स्थापन केलेल्या नव्या स्वाभिमान पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात २९ सरपंच बिनविरोध निवडून आल्याचे राणे यांनी यावेळी स्पष्ट केले. काँग्रेस, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी या कोणत्याही पक्षाचा अजून एकही सरपंच निवडून आलेला नसताना केवळ स्वाभिमान पक्षाचे २९ सरपंच निवडून आल्यामुळे आपली विजयी पताका रोवण्यात आली आहे. आगामी काळात स्वाभिमान पक्ष असेच उज्वल यश संपादन करेल.राणे यांनी काँग्रेसमध्ये असतानाच समर्थ विकास पॅनेलचे स्थापना केली आहे. या पॅनेलच्या माध्यमातून राणे समर्थक सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीला सामोरे जात आहेत. गुरूवारी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा दिवस होता. या दिवसापर्यंत सिंधुदुर्गात निवडणुका होत असलेल्या ३२५ ग्रामपंचायतींपैकी २९ ठिकाणचे सरपंच हे समर्थ विकास पॅनेलकडून बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे राणेंच्या स्वाभिमान पक्षाला सिंधुदुर्गातून यश मिळण्यास सुरूवात झाली आहे. असे राणे यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे