शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

काँग्रेससोबत आघाडी हवी पण सन्मानजनक - सुनील तटकरे

By admin | Updated: January 24, 2017 16:46 IST

केंद्रात व राज्यात सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाचा कारभार हा आराजकतेकडे जाणारा आहे, या पक्षाच्या जातीयवादी विचारधारे विरोधात

ऑनलाइन लोकमतअकोला, दि. 24 - केंद्रात व राज्यात सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाचा कारभार हा आराजकतेकडे जाणारा आहे, या पक्षाच्या जातीयवादी विचारधारे विरोधात धर्मनिरपेक्ष विचारांनी एकत्र आले पहिजे; ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे त्यामुळे आगामी महानगरपालिका तसेच जिल्हा परिषदांच्या निवडणूकांमध्ये काँग्रेस सोबत आघाडी करण्यास आम्ही तयार आहोत. याचा अर्थ काँग्रेस व समविचारी पक्षांनी राष्ट्रवादी कमकुवत आहे असा काढू नये, आम्हाला आघाडी हवीच आहे पण सन्माजनक अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी मांडली.  अकोला येथील खुले नाट्यगृहामध्ये माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश सोहळया निमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर  आमदार प्रकाश गजभिये, राष्टÑवादीचे ज्येष्ठ नेते वसंतराव धोत्रे, माजी आमदार तुकाराम बिरकड, राष्ट्र काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय देशमुख, अकोला महानगर अध्यक्ष अजय तापडीया, वाशीम जिल्हा राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, विदर्भ संघटक रामेश्वर पवळ, संतोष कोरपे आदी उपस्थित होते. तटकरे म्हणाले की, भाजपा-सेनेच्या सत्तेने सामान्यांचा भ्रमनिरास केला आहे. अच्छे दिन, बॅक खात्यामध्ये १५ लाख असे स्वप्न सर्वसामान्य जनतेला दाखविले, हे स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकत नाही हे याच पक्षाचे ज्येष्ठ मंत्री आता खुले आम सांगत आहे. तर दूसरीकडे शेतकरी उध्वस्त करण्याचे धोरण या सरकारचे आहे. काँग्रेसमुक्त भारत अशी घोषणा करणारे आता मुसलमान मुक्त भारत अशी वल्गना करून लागले आहेत. यावरून त्यांच्यामधील जातीयवादी विचार स्पष्टपणे समोर येतो.  हा देश लोकशाही विचारांचा देश असल्याने अशा धर्मांध शक्तींना जागा दाखविण्यासाठी धर्मनिरपेक्ष विचारांच्या पक्षाची मोट बांधणे आवश्यक आहे त्यामुळेच आघाडीसाठी आम्ही सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगीतले. माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी शिवसेना सोडण्यामागील कारणे विषद करतांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली. उद्धवांच्या आजूबाजुला हुजºयांची फौज आहे, त्यांना शेतीमधील काही कळत नाही; शेतकरी हिताचा एखादा प्रस्ताव त्यांच्याकडे घेऊन गेलो तर ते आपला पक्ष व्यापाºयांच्या भरवशावर चालतो अशी भूमिका मांडतात या शब्दात गावंडे यांनी आरोप केले. यावेळी जिल्हाध्यक्ष देशमुख यांचीही भाषण झाले. महानगर अध्यक्ष तापडीया  यांनी प्रस्तावना केली. या मेळाव्याला जिल्हाभरातून मोठी उपस्थिती होती. गावंडे यांच्या अनेक समर्थकांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश घेतला.