शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

महापालिका निवडणुकीसाठी मतदार याद्यांमध्ये गोंधळ

By admin | Updated: February 22, 2017 18:06 IST

गोंधळाचा फटका शेकडो मतदारांना

नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी मतदार याद्यांमध्ये झालेल्या गोंधळाची जबाबदारी घेण्यास मनपा प्रशासन तयार नाही, याउलट या गोंधळाला मतदारच जबाबदार असून प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यात योग्य त्या सुधारणा- दुरुस्त्या करून घेण्याची जबाबदारी मतदारांची होती, असा पवित्रा मनपा प्रशासनाने घेतला आहे. महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.२१) मतदान घेण्यात आले. यंदा मतांचा टक्का वाढून मतदान विक्रमी ६२ टक्के नोंदविले गेले असले तरी जवळपास सर्वच प्रभागांमध्ये मतदार याद्यांमधील गोंधळाचा फटका शेकडो मतदारांना बसल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले. असंख्य मतदारांना त्यांची नावे मतदार यादीत शोधूनही सापडली नाहीत, तर शेकडो मतदारांचे वास्तव्य एका प्रभागात तर मतदान दुसऱ्या प्रभागात, अशी स्थिती निदर्शनास आली. एकाच कुटुंबातील सदस्यांना वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर मतदान करावे लागले, तर अनेकांना नेहमीच्या मतदान केंद्रांऐवजी दूर अंतरावर पायपीट करत मतदानासाठी जावे लागले. मतदार यादीत नावे गायब झाल्याने पंचवटीतील म्हसरूळ याठिकाणी मतदारांकडून रास्ता रोकोचा प्रयत्न झाला, तर नाशिकरोड विभागातही मतदार यादीवरून गोंधळ उडाला. या साऱ्या गोंधळाबाबत महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी अभिषेक कृष्ण यांनी मात्र, मतदारांनाच जबाबदार धरले आहे. ज्या मतदारांची तक्रार आहे त्यांनी तशी लेखी तक्रार करावी. वास्तविक प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केल्यानंतर त्यावर रीतसर हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्याचवेळी मतदारांनी आपले नाव यादीत आहे किंवा नाही, याची खात्री करून घेणे आवश्यक होते. त्यावेळी प्राप्त ६५० हरकतींवर कार्यवाही करत प्रशासनाने त्या निकालीही काढल्या होत्या. मात्र, स्वत: जागृत न राहता ऐन मतदानाच्या वेळी ओरड करणे उचित नसल्याचेही आयुक्तांनी सांगितले. उलट मतांचा टक्का वाढावा यासाठी महापालिका प्रशासन सातत्याने प्रयत्न करत आली आहे. त्यातूनच मतदानाची काही प्रमाणात टक्केवारी वाढण्यास मदत झाल्याचा दावाही त्यांनी केला.