शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

महापालिका निवडणुकीसाठी मतदार याद्यांमध्ये गोंधळ

By admin | Updated: February 22, 2017 18:06 IST

गोंधळाचा फटका शेकडो मतदारांना

नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी मतदार याद्यांमध्ये झालेल्या गोंधळाची जबाबदारी घेण्यास मनपा प्रशासन तयार नाही, याउलट या गोंधळाला मतदारच जबाबदार असून प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यात योग्य त्या सुधारणा- दुरुस्त्या करून घेण्याची जबाबदारी मतदारांची होती, असा पवित्रा मनपा प्रशासनाने घेतला आहे. महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.२१) मतदान घेण्यात आले. यंदा मतांचा टक्का वाढून मतदान विक्रमी ६२ टक्के नोंदविले गेले असले तरी जवळपास सर्वच प्रभागांमध्ये मतदार याद्यांमधील गोंधळाचा फटका शेकडो मतदारांना बसल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले. असंख्य मतदारांना त्यांची नावे मतदार यादीत शोधूनही सापडली नाहीत, तर शेकडो मतदारांचे वास्तव्य एका प्रभागात तर मतदान दुसऱ्या प्रभागात, अशी स्थिती निदर्शनास आली. एकाच कुटुंबातील सदस्यांना वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर मतदान करावे लागले, तर अनेकांना नेहमीच्या मतदान केंद्रांऐवजी दूर अंतरावर पायपीट करत मतदानासाठी जावे लागले. मतदार यादीत नावे गायब झाल्याने पंचवटीतील म्हसरूळ याठिकाणी मतदारांकडून रास्ता रोकोचा प्रयत्न झाला, तर नाशिकरोड विभागातही मतदार यादीवरून गोंधळ उडाला. या साऱ्या गोंधळाबाबत महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी अभिषेक कृष्ण यांनी मात्र, मतदारांनाच जबाबदार धरले आहे. ज्या मतदारांची तक्रार आहे त्यांनी तशी लेखी तक्रार करावी. वास्तविक प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केल्यानंतर त्यावर रीतसर हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्याचवेळी मतदारांनी आपले नाव यादीत आहे किंवा नाही, याची खात्री करून घेणे आवश्यक होते. त्यावेळी प्राप्त ६५० हरकतींवर कार्यवाही करत प्रशासनाने त्या निकालीही काढल्या होत्या. मात्र, स्वत: जागृत न राहता ऐन मतदानाच्या वेळी ओरड करणे उचित नसल्याचेही आयुक्तांनी सांगितले. उलट मतांचा टक्का वाढावा यासाठी महापालिका प्रशासन सातत्याने प्रयत्न करत आली आहे. त्यातूनच मतदानाची काही प्रमाणात टक्केवारी वाढण्यास मदत झाल्याचा दावाही त्यांनी केला.