शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

'मागील 5 वर्षांतील गोंधळ उघड होऊ नये म्हणूनच विधीमंडळात विरोधकांचा गोंधळ'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 10:53 IST

भाजप नेत्यांनी मागील पाच वर्षाच्या सत्ताकाळात घातलेला गोंधळ जगासमोर येऊ नये म्हणून विरोधक गोंधळ घालत आहेत. यावेळी सुप्रिया सुळे यांनी जामिया विद्यापीठात विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा निषेध केला.

मुंबई - मागील पाच वर्षांच्या सत्ताकाळात देशात आणि राज्यात घातलेला गोंधळ जगासमोर येऊ नये म्हणून राज्याच्या विधानसभेत विरोधक आणि संसदेत केंद्रातील मोदी सरकार गोंधळ घालत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती येथे केला. 

नागपूर येथे विधीमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. विधीमंडळात पहिल्या दिवशी विरोधकांनी वि.दा. सावरकर यांच्याविषयी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून रान उठवले होते. त्यामुळे पहिल्या दिवशीचे कामकाज होण्यास अडचण निर्माण झाली होती. दुसऱ्या दिवशी विरोधकांनी शेतकरी प्रश्नी गोंधळ घातला. त्यामुळे कामकाज करण्यात अडचणी आल्या होत्या. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात विरोधक आक्रमक झाले होते. त्यावर शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

दरम्यान भाजप नेत्यांनी मागील पाच वर्षाच्या सत्ताकाळात घातलेला गोंधळ जगासमोर येऊ नये म्हणून विरोधक गोंधळ घालत आहेत. यावेळी सुप्रिया सुळे यांनी जामिया विद्यापीठात विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा निषेध केला. देशाची खालावत चाललेल्या आर्थिक स्थितीची राज्यातील विरोधी पक्षाला आणि केंद्रातील मोदी सरकारला चिंता नसल्याचे त्यांनी नमूद केले. देशातील उद्योग बंद पडत असून बेरोजगारी वाढत असल्याकडे सुळे यांनी यावेळी लक्ष वेधले.