शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

'मागील 5 वर्षांतील गोंधळ उघड होऊ नये म्हणूनच विधीमंडळात विरोधकांचा गोंधळ'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 10:53 IST

भाजप नेत्यांनी मागील पाच वर्षाच्या सत्ताकाळात घातलेला गोंधळ जगासमोर येऊ नये म्हणून विरोधक गोंधळ घालत आहेत. यावेळी सुप्रिया सुळे यांनी जामिया विद्यापीठात विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा निषेध केला.

मुंबई - मागील पाच वर्षांच्या सत्ताकाळात देशात आणि राज्यात घातलेला गोंधळ जगासमोर येऊ नये म्हणून राज्याच्या विधानसभेत विरोधक आणि संसदेत केंद्रातील मोदी सरकार गोंधळ घालत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती येथे केला. 

नागपूर येथे विधीमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. विधीमंडळात पहिल्या दिवशी विरोधकांनी वि.दा. सावरकर यांच्याविषयी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून रान उठवले होते. त्यामुळे पहिल्या दिवशीचे कामकाज होण्यास अडचण निर्माण झाली होती. दुसऱ्या दिवशी विरोधकांनी शेतकरी प्रश्नी गोंधळ घातला. त्यामुळे कामकाज करण्यात अडचणी आल्या होत्या. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात विरोधक आक्रमक झाले होते. त्यावर शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

दरम्यान भाजप नेत्यांनी मागील पाच वर्षाच्या सत्ताकाळात घातलेला गोंधळ जगासमोर येऊ नये म्हणून विरोधक गोंधळ घालत आहेत. यावेळी सुप्रिया सुळे यांनी जामिया विद्यापीठात विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा निषेध केला. देशाची खालावत चाललेल्या आर्थिक स्थितीची राज्यातील विरोधी पक्षाला आणि केंद्रातील मोदी सरकारला चिंता नसल्याचे त्यांनी नमूद केले. देशातील उद्योग बंद पडत असून बेरोजगारी वाढत असल्याकडे सुळे यांनी यावेळी लक्ष वेधले.