शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

गोंधळातच वाया जात आहे विधिमंडळाचा वेळ : राजेंद्र दर्डा

By admin | Updated: December 20, 2015 02:10 IST

सध्या संसद व विधिमंडळात अभ्यासपूर्ण भाषणांची उणीव जाणवते आहे. विकासावर चर्चा होण्याऐवजी गोंधळातच वेळ वाया जात आहे. जनहिताच्या विधेयकांना चर्चेशिवाय मंजुरी देण्यात येत आहे.

नागपूर : सध्या संसद व विधिमंडळात अभ्यासपूर्ण भाषणांची उणीव जाणवते आहे. विकासावर चर्चा होण्याऐवजी गोंधळातच वेळ वाया जात आहे. जनहिताच्या विधेयकांना चर्चेशिवाय मंजुरी देण्यात येत आहे. योजनांच्या अंमलबजावणीबाबत आग्रही भूमिका घेतली जात नाही. सरकार व विरोधी पक्ष ही लोकशाहीची दोन चाकं आहेत. त्यामुळे सरकारने विरोधकांना विश्वासात घेतलेच पाहिजे आणि विरोधी पक्षांनीही जनहिताच्या विधेयकांसाठी सहकार्य करायला हवे, असे मत लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी व्यक्त केले.पां.वा. गाडगीळ, बाबा दळवी स्मृती पत्रकारिता प्रदान समारंभातील अध्यक्षीय भाषणात राजेंद्र दर्डा यांनी लोकशाही समृद्ध करण्यावर भर दिला. ते म्हणाले, संस्थापक संपादक ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा यांची लोकमत दैनिक सुरू करण्यामागची भावना शोषित वंचितांना न्याय देण्याची आणि लोकशाहीला अधिक मजबूत करण्याची होती. लोकमतचे पहिले संपादक पत्रपंडित पद्मश्री पां.वा. गाडगीळ यांनी आर्थिक आणि सामाजिक विषयावर विपुल लेखन केले. साम्यवाद आणि समाजवादाचे मध्यसूत्र सर्वसामान्य माणसाला सोप्या भाषेत त्यांनी समजावून सांगितले. त्यामुळे लोकमतने गाडगीळ यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ १९८८ मध्ये सामाजिक-आर्थिक विकास लेखन पुरस्कार सुरू केला. त्यांच्यानंतर लोकमतची धुरा सांभाळलेले म.य. उपाख्य बाबा दळवी यांच्या लेखनीला सामाजिक भान होते. त्यांना परिवर्तनाचा ध्यास होता. त्यांनी महाराष्ट्रातील वृत्तपत्र सृष्टीला समतेचा डोळा दिला. त्यांनी शोषितांना लढण्याचे बळ आणि मुक्यांना शब्द दिले. त्यामुळे १९९६ साली बाबांच्या नावाने लोकमतने राज्यस्तरीय शोधपत्रकारिता पुरस्कार सुरु केला. वाचक हाच केंद्रबिंदू मानून एक परिपूर्ण वृत्तपत्र म्हणून लोकमतची वाटचाल यापुढेही सुरू राहील, असे राजेंद्र दर्डा यांनी शेवटी सांगितले.