शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

पंतप्रधानांच्या समितीला विरोध हा देशाच्या सार्वभौमत्वावर घाला

By admin | Updated: December 24, 2014 23:39 IST

मुंबईच्या विकासासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली नाही तर तशी विनंती केंद्र सरकारकडे केली आहे. पण यासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते

नागपूर : मुंबईच्या विकासासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली नाही तर तशी विनंती केंद्र सरकारकडे केली आहे. पण यासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना चुकीची माहिती देण्यात आली. त्यामुळे त्यांनी पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रात त्रुटी राहिल्या. मात्र मुंबईच्या विकासात पंतप्रधानांनी लक्ष घालूच नये, असे जर कोणाला वाटत असेल तो देशाच्या सार्वभौमत्वारच घाला ठरेल, अशी घणाघाती टीका बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली.मुंबईच्या प्रश्नावरील अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी हा खुलासा केला. मुख्यमंत्र्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने विरोधकांनी सभात्याग केला.प्रस्तावावरील चर्चेदरम्यान समितीच्या मुद्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. त्याचा उल्लेख करीत मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी राज्य सरकारला केंद्राच्या विविध प्राधिकरणांची मंजुरी घ्यावी लागते. त्यासाठी अनेक वर्षे जातात हा आजवरचा अनुभव आहे. हा कालापव्यय टाळण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली तर हा त्रास दूर होईल. म्हणून समिती असावी अशी विनंती केली होती. या समितीमुळे मुंबई महापालिका किंवा राज्य सरकारच्या कुठल्याही अधिकारावर अतिक्रमण होणार नाही, मात्र पंतप्रधानांनी मुंबईच्या विकासात लक्षच घालू नये असे जर कोणाला वाटत असेल तर तो देशाच्या सार्वभौमत्वावरच घाला ठरेल.यासंदर्भात शरद पवार यांनी पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्राचा उल्लेख करताना मुख्यमंत्री म्हणाले की, कोणत्याही गोष्टीची पुरेशी माहिती न घेता त्यावर लगेच प्रतिक्रिया देण्याची आपली सवय आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनाही चुकीची माहिती दिल्या गेली. त्यामुळेच त्यांच्या पत्रात त्रुटी राहून गेल्या. पवार हे कधीही चुकीचे मार्गदर्शन करणार नाही, याची आम्हाला खात्री आहे. झोपी गेलेल्यांना जागे करता येते, पण झोपेचे सोंग घेणाऱ्यांना जागे करता येत नाही.मुंबईचा विकास शांघाय किंवा सिंगापूर या शहराप्रमाणे नव्हे तर मुंबईची ओळख कायम ठेवूनच हे शहर जागाचा मानबिंदू ठरेल अशा पद्धतीने विकसित करू, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. (प्रतिनिधी)