शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
6
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
7
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
8
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
9
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
10
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
11
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
12
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
13
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
14
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
15
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
16
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
17
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
18
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
19
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
20
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान

पंतप्रधानांच्या समितीला विरोध हा देशाच्या सार्वभौमत्वावर घाला

By admin | Updated: December 24, 2014 23:39 IST

मुंबईच्या विकासासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली नाही तर तशी विनंती केंद्र सरकारकडे केली आहे. पण यासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते

नागपूर : मुंबईच्या विकासासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली नाही तर तशी विनंती केंद्र सरकारकडे केली आहे. पण यासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना चुकीची माहिती देण्यात आली. त्यामुळे त्यांनी पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रात त्रुटी राहिल्या. मात्र मुंबईच्या विकासात पंतप्रधानांनी लक्ष घालूच नये, असे जर कोणाला वाटत असेल तो देशाच्या सार्वभौमत्वारच घाला ठरेल, अशी घणाघाती टीका बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली.मुंबईच्या प्रश्नावरील अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी हा खुलासा केला. मुख्यमंत्र्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने विरोधकांनी सभात्याग केला.प्रस्तावावरील चर्चेदरम्यान समितीच्या मुद्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. त्याचा उल्लेख करीत मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी राज्य सरकारला केंद्राच्या विविध प्राधिकरणांची मंजुरी घ्यावी लागते. त्यासाठी अनेक वर्षे जातात हा आजवरचा अनुभव आहे. हा कालापव्यय टाळण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली तर हा त्रास दूर होईल. म्हणून समिती असावी अशी विनंती केली होती. या समितीमुळे मुंबई महापालिका किंवा राज्य सरकारच्या कुठल्याही अधिकारावर अतिक्रमण होणार नाही, मात्र पंतप्रधानांनी मुंबईच्या विकासात लक्षच घालू नये असे जर कोणाला वाटत असेल तर तो देशाच्या सार्वभौमत्वावरच घाला ठरेल.यासंदर्भात शरद पवार यांनी पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्राचा उल्लेख करताना मुख्यमंत्री म्हणाले की, कोणत्याही गोष्टीची पुरेशी माहिती न घेता त्यावर लगेच प्रतिक्रिया देण्याची आपली सवय आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनाही चुकीची माहिती दिल्या गेली. त्यामुळेच त्यांच्या पत्रात त्रुटी राहून गेल्या. पवार हे कधीही चुकीचे मार्गदर्शन करणार नाही, याची आम्हाला खात्री आहे. झोपी गेलेल्यांना जागे करता येते, पण झोपेचे सोंग घेणाऱ्यांना जागे करता येत नाही.मुंबईचा विकास शांघाय किंवा सिंगापूर या शहराप्रमाणे नव्हे तर मुंबईची ओळख कायम ठेवूनच हे शहर जागाचा मानबिंदू ठरेल अशा पद्धतीने विकसित करू, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. (प्रतिनिधी)