शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

संघर्ष यात्रावाल्यांची संपाला चिथावणी

By admin | Updated: June 2, 2017 04:10 IST

संघर्ष यात्रेला अजिबात प्रतिसाद न मिळालेले लोक आता शेतकऱ्यांना संपासाठी चिथावणी देत असून, या संपाला हिंसेचे गालबोट

विशेष प्रतिनिधी/लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : संघर्ष यात्रेला अजिबात प्रतिसाद न मिळालेले लोक आता शेतकऱ्यांना संपासाठी चिथावणी देत असून, या संपाला हिंसेचे गालबोट लागावे, असा त्यांचा प्रयत्न असल्याची टीका करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काँग्रेस-राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. मुख्यमंत्री म्हणाले की, संपाच्या निमित्ताने शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. हा संप स्वयंस्फूर्त नाही. शेतकऱ्यांची जाणीवपूर्वक अडवणूक केली जात आहे. ज्यांच्या संघर्ष यात्रेला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही ते लोक संपाच्या आड हिंसाचार पसरविण्याचा आणि शेतकऱ्यांची अडवणूक करण्याचा प्रयत्न करीत आहेत. एकरी उत्पादकता अधिक असेल तर स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींचा फायदा होतो. महाराष्ट्रात उत्पादकता कमी असल्याने या शिफारशींचा किती फायदा होईल, याचा विचार करावा लागेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. शेतकऱ्यांचा पोलिसांशी संघर्ष व्हावा, संपाला गालबोट लागावे, तो चिघळावा असेही प्रयत्न होत आहेत. दूध, भाजीपाला रस्त्यावर फेकून शेतकऱ्यांचेच नुकसान आहे. अहमदनगर जिल्ह्यातील काही दूध संघांनी दुधाचे संकलन केले नाही. त्यांना माझे आवाहन आहे की, शेतकऱ्यांकडून २० रुपयांत दूध खरेदी करून मुंबईत ते ७० रुपयांना विकणाऱ्या नेत्यांनी शेतकऱ्यांना अधिकचा भाव द्यावा. संपकरी शेतकऱ्यांशी चर्चेची सरकारची कोणत्याही क्षणी तयारी आहे. आज त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यांच्या पूर्ततेसाठी शासनाने आधीच उपाययोजना हाती घेतलेल्या आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. राजू शेट्टी यांनी संपाला पाठिंबा दिला आहे, याकडे लक्ष वेधले असता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणी राजकारण करू नये, असेही मुख्यमंत्री म्हणाले. कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर आणि सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख या वेळी उपस्थित होते.दुधाचा प्रश्न हा गेल्या १५-२० वर्षांमधील धोरणाचा परिपाक आहे. नेत्यांचे दुधाचे ब्रँड मजबूत झाले आणि सरकारचा ब्रँड कमकुवत करण्यात आला. शेतकऱ्यांची पिळवणूक करून नेत्यांचे दूध संघ तेजीत आले.