शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
5
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
6
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
7
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
8
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
9
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
10
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
11
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
12
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
13
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
14
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
15
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
16
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
17
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

अविश्वासाच्या वातावरणात ‘विश्वास’ मंजूर, विरोधक पक्षांची राज्यपालांकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 05:22 IST

विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावर विरोधी पक्षांनी दिलेल्या अविश्वास ठरावावर निर्णय होण्याआधीच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारीे अध्यक्षांवर विश्वासदर्शक ठराव मांडून शिवसेनेच्या साहाय्याने आवाजी मतदानाने मंजूरही करवून घेतला. सत्तापक्षाच्या या कृतीने लोकशाहीचा खून झाला असून, आम्ही यापूर्वी दाखल केलेला अविश्वास ठराव डावलण्यात आल्याची तक्रार विरोधकांनी राज्यपालांकडे केली आहे.

मुंबई : विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावर विरोधी पक्षांनी दिलेल्या अविश्वास ठरावावर निर्णय होण्याआधीच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारीे अध्यक्षांवर विश्वासदर्शक ठराव मांडून शिवसेनेच्या साहाय्याने आवाजी मतदानाने मंजूरही करवून घेतला. सत्तापक्षाच्या या कृतीने लोकशाहीचा खून झाला असून, आम्ही यापूर्वी दाखल केलेला अविश्वास ठराव डावलण्यात आल्याची तक्रार विरोधकांनी राज्यपालांकडे केली आहे.मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना गाफील ठेवून, अचानक अध्यक्षांवर चार ओळींचा विश्वासदर्शक ठराव आणला. शिवसेनेचे सभागृह नेते एकनाथ शिंदे यांनी त्यास अनुमोदन दिले. तालिका अध्यक्ष सुधाकर देशमुख यांनी चर्चेविना तो मतदानास टाकला आणि विरोधकांच्या गोंधळाततो आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला.त्यानंतर, विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाज तहकूब करण्यात आले. पुन्हा कामकाज सुरू होताच, भाजपाच्या सदस्यांनी ‘भारत माता की जय’ अशा जोरदार घोषणा सुरू केल्या. काँग्रेस, राष्ट्रवादीचे सदस्य शांत होते. तालिका अध्यक्षांनी कामकाज पुन्हा तहकूब केले. ते पुन्हा सुरू होताच, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील बोलायला उभे राहिले व विरोधकांचा अध्यक्षांवरील अविश्वास ठराव वाचू लागताच मुख्यमंत्र्यांनी त्यांना बोलण्यापासून रोखले.विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे यांनी अध्यक्षांवरील अविश्वासदर्शक ठरावाची कार्यपद्धती वाचून दाखविण्यास सुरुवात केली. त्यावर मंत्री गिरीश बापट यांनी हरकत घेत, तोच विषय पुन्हा मांडता येणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर, सत्ताधारी बाकावरील सदस्यांनी विरोधकांचा धिक्कार करत घोषणाबाजी केली. गदारोळात तालिका अध्यक्ष अशोक साबणे यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. त्यानंतर सत्ताधारी बाकावरील सदस्य निघून गेले. मात्र, विरोधी बाकावरील सर्व सदस्य विधानसभेत, तसेच सायंकाळी४ वाजेपर्यंत ठाण मांडून होते.राज्यपालांसमोर मांडली कैफियतविरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने सायंकाळी राजभवनावर जाऊन राज्यपाल सी.विद्यासागर राव यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. विरोधकांचा हक्क डावलून अचानक विश्वासदर्शक ठराव आणणे ही लोकशाहीची हत्या असल्याचा आरोप विरोधकांनी केला आणि तशी कैफियत त्यांनी राज्यपालांसमोर मांडली.सत्ताधाऱ्यांनी गोंधळ करून कामकाज उरकून घेणे ही लोकशाहीला काळिमा फासणारी गोष्ट आहे. सभागृहात मंत्री येत नाहीत, लक्षवेधीची उत्तरे आली नाही, म्हणून कामकाज पुढे ढकलले जाते.- दिलीप वळसे पाटील, माजी अध्यक्ष, विधानसभाआम्ही कायदा सुव्यवस्थेवर चर्चा करणार होतो. सरकारच्या कारभाराचे आम्ही धिंडवडे काढले असते, पण ते सरकारला नको होते, म्हणून सरकारने कामकाज गुंडाळले. बहुमत असूनही सरकार मतदानास घाबरले.- राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते, विधानसभा

टॅग्स :Haribhau Bagadeहरिभाऊ बागडेVidhan Bhavanविधान भवन