शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

अविश्वासाच्या वातावरणात ‘विश्वास’ मंजूर, विरोधक पक्षांची राज्यपालांकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 05:22 IST

विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावर विरोधी पक्षांनी दिलेल्या अविश्वास ठरावावर निर्णय होण्याआधीच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारीे अध्यक्षांवर विश्वासदर्शक ठराव मांडून शिवसेनेच्या साहाय्याने आवाजी मतदानाने मंजूरही करवून घेतला. सत्तापक्षाच्या या कृतीने लोकशाहीचा खून झाला असून, आम्ही यापूर्वी दाखल केलेला अविश्वास ठराव डावलण्यात आल्याची तक्रार विरोधकांनी राज्यपालांकडे केली आहे.

मुंबई : विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावर विरोधी पक्षांनी दिलेल्या अविश्वास ठरावावर निर्णय होण्याआधीच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारीे अध्यक्षांवर विश्वासदर्शक ठराव मांडून शिवसेनेच्या साहाय्याने आवाजी मतदानाने मंजूरही करवून घेतला. सत्तापक्षाच्या या कृतीने लोकशाहीचा खून झाला असून, आम्ही यापूर्वी दाखल केलेला अविश्वास ठराव डावलण्यात आल्याची तक्रार विरोधकांनी राज्यपालांकडे केली आहे.मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना गाफील ठेवून, अचानक अध्यक्षांवर चार ओळींचा विश्वासदर्शक ठराव आणला. शिवसेनेचे सभागृह नेते एकनाथ शिंदे यांनी त्यास अनुमोदन दिले. तालिका अध्यक्ष सुधाकर देशमुख यांनी चर्चेविना तो मतदानास टाकला आणि विरोधकांच्या गोंधळाततो आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला.त्यानंतर, विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाज तहकूब करण्यात आले. पुन्हा कामकाज सुरू होताच, भाजपाच्या सदस्यांनी ‘भारत माता की जय’ अशा जोरदार घोषणा सुरू केल्या. काँग्रेस, राष्ट्रवादीचे सदस्य शांत होते. तालिका अध्यक्षांनी कामकाज पुन्हा तहकूब केले. ते पुन्हा सुरू होताच, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील बोलायला उभे राहिले व विरोधकांचा अध्यक्षांवरील अविश्वास ठराव वाचू लागताच मुख्यमंत्र्यांनी त्यांना बोलण्यापासून रोखले.विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे यांनी अध्यक्षांवरील अविश्वासदर्शक ठरावाची कार्यपद्धती वाचून दाखविण्यास सुरुवात केली. त्यावर मंत्री गिरीश बापट यांनी हरकत घेत, तोच विषय पुन्हा मांडता येणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर, सत्ताधारी बाकावरील सदस्यांनी विरोधकांचा धिक्कार करत घोषणाबाजी केली. गदारोळात तालिका अध्यक्ष अशोक साबणे यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. त्यानंतर सत्ताधारी बाकावरील सदस्य निघून गेले. मात्र, विरोधी बाकावरील सर्व सदस्य विधानसभेत, तसेच सायंकाळी४ वाजेपर्यंत ठाण मांडून होते.राज्यपालांसमोर मांडली कैफियतविरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने सायंकाळी राजभवनावर जाऊन राज्यपाल सी.विद्यासागर राव यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. विरोधकांचा हक्क डावलून अचानक विश्वासदर्शक ठराव आणणे ही लोकशाहीची हत्या असल्याचा आरोप विरोधकांनी केला आणि तशी कैफियत त्यांनी राज्यपालांसमोर मांडली.सत्ताधाऱ्यांनी गोंधळ करून कामकाज उरकून घेणे ही लोकशाहीला काळिमा फासणारी गोष्ट आहे. सभागृहात मंत्री येत नाहीत, लक्षवेधीची उत्तरे आली नाही, म्हणून कामकाज पुढे ढकलले जाते.- दिलीप वळसे पाटील, माजी अध्यक्ष, विधानसभाआम्ही कायदा सुव्यवस्थेवर चर्चा करणार होतो. सरकारच्या कारभाराचे आम्ही धिंडवडे काढले असते, पण ते सरकारला नको होते, म्हणून सरकारने कामकाज गुंडाळले. बहुमत असूनही सरकार मतदानास घाबरले.- राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते, विधानसभा

टॅग्स :Haribhau Bagadeहरिभाऊ बागडेVidhan Bhavanविधान भवन