शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

चार दिवसांपासून पाण्याविना रुग्णांचे हाल

By admin | Updated: July 23, 2016 02:16 IST

महापालिकेच्या उपनगरीय एम. टी. अग्रवाल रुग्णालयातील पाण्याचे दोन्ही पंप गेल्या चार दिवसांपासून बंद आहेत.

मुंबई: महापालिकेच्या उपनगरीय एम. टी. अग्रवाल रुग्णालयातील पाण्याचे दोन्ही पंप गेल्या चार दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे रुग्ण, त्यांचं नातेवाइकांचे आणि कर्मचाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. पाण्याअभावी या आठवड्यात कपड्यांची धुलाई होऊ शकली नाही. त्याचबरोबर फरशी पुसायलाही पाणी नसल्याने रुग्णालय परिसर कमालीचा अस्वच्छ बनला आहे. परिसरात दुर्गंधी देखील पसरली आहे. गुरुवारी रात्री रुग्णालयात पाणी आले, पण शुक्रवारी पाणी पुन्हा गायब झाल्यामुळे रुग्ण आणखीनच त्रस्त झाले.मुलुंड येथील अग्रवाल रुग्णालयात रोजच्या रोज बाह्यरुग्ण विभागात सुमारे ३०० रुग्ण येतात. तर, सध्या रुग्णालयात सुमारे १०० हून अधिक रुग्ण दाखल आहेत. पण, सोमवारपासून रुग्णालयात पाणी वर चढत नसल्यामुळे टाक्या कोरड्या पडल्या होत्या. रुग्णालयातील जुन्या इमारतीतून वॉर्डबॉय पाणी भरत आहेत. वॉर्डमध्येदेखील पाण्याचा ठणठणाट आहे. या परिस्थितीत हात धुवायला तरी पाणी असावे, म्हणून वॉर्डबॉय पाणी भरतात. पण, हे पाणी पुरेसे नसल्याची खंत रुग्णालयाती कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. रुग्णांना पिण्याच्या पाण्यासाठी बाहेरुन पाणी विकत आणावे लागते. विकत आणलेले पाणी अन्य गोष्टींसाठी वापरले जाते. रुग्णालयात पाण्याचे दोन पंप आहेत. एक बंद पडल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून दुसरा पंप बसवण्यात आला. तथापि, एक पंप गेल्या चार महिन्यांपासून बिघडलेला आहे. तरीही रुग्णालय प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे रुग्णालयावर पाणीबाणीची वेळ ओढावली आहे. रुग्णालयात दर मंगळवारी सर्व कपड्यांची धुलाई होते. पण, या मंगळवारी पाणी नसल्यामुळे धुलाई झाली नाही. पाणीच नसल्यामुळे रुग्णालयात अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे रुग्णांना संसर्ग होण्याचा धोका वाढला असल्याची माहिती गोल्डी शर्मा यांनी दिली.पाणी गुरुवारी रात्रीच आले. शुक्रवारीही होते. पंप बंद पडल्यावर तत्काळ टी वॉर्डला तक्रार नोंदवण्यात आली. आता पाण्याचा प्रश्न नाही. हा प्रश्न हा महापालिकेच्या वॉर्डचा आहे, रुग्णालय प्रशासनाचा नाही. काल टाक्यांमध्ये पाणी भरले गेले, असे रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. >पाण्याअभावी शस्त्रक्रिया रद्द अग्रवाल रुग्णालयात गेल्या चार दिवसांपासून पाणी नसल्यामुळे शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या आहेत. रुग्णांना आदल्या दिवशी दाखल करून उद्या शस्त्रक्रिया असल्याचे सांगितले जाते. पण दुसऱ्या दिवशी पाणी नसल्यामुळे शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्यामुळे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक त्रस्त झाले आहेत. शस्त्रक्रिया कधी करणार, याविषयी देखील रुग्णालय प्रशासन माहिती देत नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांकडून संतापाची भावना व्यक्त करण्यात आली.