शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
4
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
6
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
7
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
8
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
9
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
10
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
11
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
12
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
13
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
14
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
15
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
16
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
17
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
18
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
19
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
20
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

चार दिवसांपासून पाण्याविना रुग्णांचे हाल

By admin | Updated: July 23, 2016 02:16 IST

महापालिकेच्या उपनगरीय एम. टी. अग्रवाल रुग्णालयातील पाण्याचे दोन्ही पंप गेल्या चार दिवसांपासून बंद आहेत.

मुंबई: महापालिकेच्या उपनगरीय एम. टी. अग्रवाल रुग्णालयातील पाण्याचे दोन्ही पंप गेल्या चार दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे रुग्ण, त्यांचं नातेवाइकांचे आणि कर्मचाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. पाण्याअभावी या आठवड्यात कपड्यांची धुलाई होऊ शकली नाही. त्याचबरोबर फरशी पुसायलाही पाणी नसल्याने रुग्णालय परिसर कमालीचा अस्वच्छ बनला आहे. परिसरात दुर्गंधी देखील पसरली आहे. गुरुवारी रात्री रुग्णालयात पाणी आले, पण शुक्रवारी पाणी पुन्हा गायब झाल्यामुळे रुग्ण आणखीनच त्रस्त झाले.मुलुंड येथील अग्रवाल रुग्णालयात रोजच्या रोज बाह्यरुग्ण विभागात सुमारे ३०० रुग्ण येतात. तर, सध्या रुग्णालयात सुमारे १०० हून अधिक रुग्ण दाखल आहेत. पण, सोमवारपासून रुग्णालयात पाणी वर चढत नसल्यामुळे टाक्या कोरड्या पडल्या होत्या. रुग्णालयातील जुन्या इमारतीतून वॉर्डबॉय पाणी भरत आहेत. वॉर्डमध्येदेखील पाण्याचा ठणठणाट आहे. या परिस्थितीत हात धुवायला तरी पाणी असावे, म्हणून वॉर्डबॉय पाणी भरतात. पण, हे पाणी पुरेसे नसल्याची खंत रुग्णालयाती कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. रुग्णांना पिण्याच्या पाण्यासाठी बाहेरुन पाणी विकत आणावे लागते. विकत आणलेले पाणी अन्य गोष्टींसाठी वापरले जाते. रुग्णालयात पाण्याचे दोन पंप आहेत. एक बंद पडल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून दुसरा पंप बसवण्यात आला. तथापि, एक पंप गेल्या चार महिन्यांपासून बिघडलेला आहे. तरीही रुग्णालय प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे रुग्णालयावर पाणीबाणीची वेळ ओढावली आहे. रुग्णालयात दर मंगळवारी सर्व कपड्यांची धुलाई होते. पण, या मंगळवारी पाणी नसल्यामुळे धुलाई झाली नाही. पाणीच नसल्यामुळे रुग्णालयात अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे रुग्णांना संसर्ग होण्याचा धोका वाढला असल्याची माहिती गोल्डी शर्मा यांनी दिली.पाणी गुरुवारी रात्रीच आले. शुक्रवारीही होते. पंप बंद पडल्यावर तत्काळ टी वॉर्डला तक्रार नोंदवण्यात आली. आता पाण्याचा प्रश्न नाही. हा प्रश्न हा महापालिकेच्या वॉर्डचा आहे, रुग्णालय प्रशासनाचा नाही. काल टाक्यांमध्ये पाणी भरले गेले, असे रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. >पाण्याअभावी शस्त्रक्रिया रद्द अग्रवाल रुग्णालयात गेल्या चार दिवसांपासून पाणी नसल्यामुळे शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या आहेत. रुग्णांना आदल्या दिवशी दाखल करून उद्या शस्त्रक्रिया असल्याचे सांगितले जाते. पण दुसऱ्या दिवशी पाणी नसल्यामुळे शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्यामुळे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक त्रस्त झाले आहेत. शस्त्रक्रिया कधी करणार, याविषयी देखील रुग्णालय प्रशासन माहिती देत नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांकडून संतापाची भावना व्यक्त करण्यात आली.