शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

पुरस्कार मागे घेईपर्यंत वैचारिक लढा सुरूच

By admin | Updated: August 9, 2015 02:34 IST

बाबासाहेब पुरंदरे यांनी चुकीचा इतिहास लिहिला आहे. त्यांना विरोध म्हणजे एका विशिष्ट जातीला केलेला विरोध असे समजू नये. आम्ही सत्य इतिहास मांडत असून त्यासाठी पडेल ती किंमत

पुणे : बाबासाहेब पुरंदरे यांनी चुकीचा इतिहास लिहिला आहे. त्यांना विरोध म्हणजे एका विशिष्ट जातीला केलेला विरोध असे समजू नये. आम्ही सत्य इतिहास मांडत असून त्यासाठी पडेल ती किंमत मोजायला तयार आहोत. पुरंदरे यांना देण्यात आलेला ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार मागे घेईपर्यंत ही वैचारिक लढाई सुरूच राहील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी येथे दिला.छत्रपती शिवाजी महाराज बदनामीविरोधी कृती समितीच्या वतीने लाल महाल येथे आयोजित शिवसन्मान जागर महिला परिषदेत ते बोलत होते. या वेळी कॉ. गोविंद पानसरे यांच्या कन्या स्मिता पानसरे, प्रा. प्रतिमा परदेशी, श्रीमंत कोकाटे आदी उपस्थित होते. तसेच सत्यशोधक प्रबोधन महासभा, संभाजी ब्रिगेड या संघटनांचाही सहभाग होता. डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांचे विचार मान्य नाहीत, म्हणून त्यांच्यावर गोळ््या घालण्यात आल्या. इतिहासातही अनेकांना अशाप्रकारे विरोध करण्यात आला. पुरंदरे राजमाता जिजामातांचे चारित्र्य हनन करत असतील तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा आव्हाड यांनी दिला. खोटे शिवचरित्र लिहिणाऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते आणि खरे शिवचरित्र लिहिणाऱ्यांना गोळ््या घातल्या जातात. पानसरे यांच्या हत्येमागे हिंदुत्ववादी संघटनेचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे स्मिता पानसरे म्हणाल्या.पानसरे यांचे मारेकरी सापडले, पण...पानसरे यांचे मारेकरी सापडले असून त्यांचे फोन नंबर्सही ट्रेस झाले आहेत. पण केवळ राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळे आणि राजकीय दबावामुळे मारेकऱ्यांना पकडले जात नाही. त्यामुळे पानसरे यांच्या कुटुंबातील सदस्य सांगतील ते दोन पोलीस अधिकारी एसआयटीत घ्यावेत, अशी मागणी आव्हाड यांनी केली.