शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

हिंदीची सक्ती म्हणजे  मराठी भाषेवरचे अतिक्रमण; साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 12:38 IST

"भाषेला विरोध नाही तर तिची सक्ती करण्यास विरोध आहे."

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : मराठीची अवस्था बिकट असताना, हिंदीची सक्ती करणे योग्य नाही. सक्तीमुळे मराठी भाषेवर आक्रमण होईल. म्हणून महाराष्ट्रात हिंदी सक्तीचा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे, असे मत  अ. भा. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांनी रविवारी व्यक्त केले.

भाषेला विरोध नाही तर तिची सक्ती करण्यास विरोध आहे. इंग्रजी सक्ती केली, तेव्हा साहित्यिकांनी भूमिका घेतली होती, असे ते म्हणाले. ग्रंथ संग्रहालयाच्या १३२ व्या वार्षिकोत्सवानिमित्त ललित गटातून रामदास खरे यांच्या ‘द लॉस्ट बॅलन्स’, तर ललितेतर गटातून सदाशिव टेटवीलकर यांच्या सह्याद्री परिक्रमा या पुस्तकांना ॲड. वा. अ. रेगे जिल्हास्तरीय पुरस्काराने, तर श्यामला ठाणेकर यांना उत्कृष्ट सेविका पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

पुनर्लेखनाची गरज 

हल्ली सुचले की लिहून टाकतात, पण साहित्यनिर्मिती ही दुधाची दही होण्याइतकी सोपी गोष्ट नाही. प्रतिभा आणि शब्द सामर्थ्य असले म्हणून लिहिता येतेच असे नाही. त्या जोडीला अनुभवही असावा लागतो. आपले सोडून इतरांचे न वाचणे ही मराठी साहित्यिकांसाठी चांगली गोष्ट नाही. नव्या लेखकांनी वाचनाबरोबर पुनर्लेखन करण्याचीही गरज आहे, असे ते म्हणाले. 

लाइक आणि कमेंट म्हणजे अभिप्राय नव्हे...

समाजमाध्यमांमुळे साहित्याचे लोकशाहीकरण झाले. लेखक होण्याची संधी मिळाली; पण संपादन ही गोष्ट हद्दपार झाली. लाइक आणि कमेंट म्हणजे अभिप्राय नाही. हल्ली स्वत:च स्वत:चे पुस्तक प्रकाशित करण्याची पद्धत सुरू झाली आहे. त्यामुळे प्रकाशित साहित्याला वेगळा आकार देणाऱ्या मधल्या प्रक्रियाच गळून पडतात, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :marathiमराठीhindiहिंदी